शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

खरं सांगा...शहराला वाढीव पाणी मिळणार कधी? एप्रिलचा पहिला आठवडा उजाडणार ?

By मुजीब देवणीकर | Updated: March 27, 2024 18:54 IST

कार्यकारी अभियंता दीपक कोळी म्हणतात, एप्रिलचा पहिला आठवडा ((लोकमत विशेष))

छत्रपती संभाजीनगर : शहराला ७५ एमएलडी वाढीव पाणी देण्याचे गाजर सहा महिन्यांपासून दाखविण्यात येत होते. प्रत्यक्षात भ्रमाचा भोपळा रविवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडूनच फुटला. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात फक्त २५ एमएलडी वाढीव पाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. एवढेच अतिरिक्त पाणी शहराला मिळेल. तेसुद्धा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. मनपाची जुनी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे बंद केली तरच शहराला ७५ एमएलडी वाढीव पाणी मिळेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक काेळी यांनी सांगितले.

२०० कोटी खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीद्वारे शहराला २४ तासात ७५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेल, शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होईल, असे स्वप्न १८ लाख नागरिकांना दाखविण्यात आले. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिकेने २० फेब्रुवारीला अतिरिक्त पाणी येईल, अशी घोषणा केली होती. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न- खरं सांगा, शहराला अतिरिक्त पाणी कधी आणि किती मिळेल?कोळी- ९०० मिमी जलवाहिनी टाकण्यासाठी टेंडर काढले तेव्हाच ठरले होते की, ७०० मिमीची जुनी जलवाहिनी बंद केली तरच ७५ एमएलडी पाणी मिळेल. ही जलवाहिनी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवीन जलवाहिनीतून तूर्त फक्त २५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेल. कारण फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची सध्या क्षमता नाही.

प्रश्न- फारोळा येथील नवीन जलशुद्धीकरणाचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल?कोळी- फारोळ्यात २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम २०० कोटीतच आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून, काम पूर्ण होण्यास किमान जून महिना उजाडेल. हे केंद्र सुरू झाल्यावर शहराला ४० ते ४५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळू शकेल.

प्रश्न- ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रोलिक टेस्टिंग कधी पूर्ण होईल?कोळी- टेस्टिंगचे काम सुरू आहे. चार दिवसात पूर्ण होईल. पावसाळ्यात जलवाहिनी टाकली असल्याने दूषित पाणी जास्त येते. जलवाहिनी पूर्णपणे स्वच्छ करावी लागेल. फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत टेस्टिंगला एक दिवस लागेल.

प्रश्न- ४ हजार अश्वशक्तीचे पंप कधी सुरू होतील?कोळी- ४ हजार अश्वशक्तीचे पंप बसविले. या पंपांचा वापर १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीसाठी करता येईल का, या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी