शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

सांगा, छत्रपती संभाजीनगरातून नव्या रेल्वे कधी? पीटलाइनच्या कामाची वर्षपूर्ती, तरी काम सुरूच 

By संतोष हिरेमठ | Updated: April 10, 2024 18:11 IST

जालन्यातून नव्या रेल्वेची घोषणा, शहराला नवी रेल्वे मिळण्याची प्रतीक्षाच

छत्रपती संभाजीनगर : जालन्यात पीटलाइनचे काम पूर्ण होऊन उद्घाटनही झाले आणि उद्घाटनाला जालन्याहून नव्या रेल्वे सुरू करण्याची घोषणाही झाली. पण छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वे कधी सुरू होणार? असा सवाल प्रवासी विचारत आहेत. वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही पीटलाइनचे काम सुरूच आहे.

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना गेल्या ११ वर्षांत जवळपास सहा नव्या रेल्वे मिळाल्या. यात दररोज धावणाऱ्या दोनच रेल्वे आहेत. गेली अनेक वर्षे पीटलाइन नसल्याने नव्या रेल्वे सुरू करण्यात येत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीटलाइनची मागणी होत असताना जालन्यातही पीटलाइन मंजूर झाली. दोन्ही ठिकाणच्या पीटलाइनचे उद्घाटन एकाच दिवशी झाले. मात्र, जालन्याच्या पीटलाइनचे उद्घाटनही झाले आणि छत्रपती संभाजीनगरातील पीटलाइनचे काम अजूनही सुरू आहे. या पीटलाइनच्या कामाला सुरूवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले. जालन्यालाच प्राधान्यक्रम राहणार? पीटलाइन कधी पूर्ण होणार आणि नव्या रेल्वे कधी मिळणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. जालन्यात पीटलाइन झाल्याने नव्या रेल्वे सुरू करण्यासाठी जालन्यालाच प्राधान्यक्रम राहणार का? असाही सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

गेल्या ११ वर्षांत सुरू झालेल्या रेल्वे- नगरसोल - चेन्नई एक्स्प्रेस (साप्ताहिक)- नांदेड - मुंबई सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस (दररोज)- मराठवाडा संपर्कक्रांती एक्स्प्रेस (साप्ताहिक)- छत्रपती संभाजीनगर - तिरूपती एक्स्प्रेस (साप्ताहिक)- छत्रपती संभाजीनगर - नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस (साप्ताहिक)- तिरूपती - शिर्डी एक्स्प्रेस (साप्ताहिक)- जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस

या रेल्वेंची मागणी: १. छत्रपती संभाजीनगर-नागपूर (परभणी-हिंगोली-अकोला-बडनेरा-वर्धा मार्गे). २. छत्रपती संभाजीनगर-गोवा (मनमाड-कल्याण-पनवेल-पेण-चिपळूण-वैभववाडी मार्गे). ३. छत्रपती संभाजीनगर - मैसूर (परभणी-लातूर-पंढरपूर-बेळगाव-हुबळी-बंगळुरू मार्गे). ४. छत्रपती संभाजीनगर-राजकोट (मनमाड-जळगाव-सूरत-बडोदा-अहमदाबाद-सुरेंद्रनगरमार्गे) ५. छत्रपती संभाजीनगर-रायचूर-छत्रपती संभाजीनगर.

रेल्वे प्रवास करणे अवघडछत्रपती संभाजीनगरहून नागपूर, गोवा यासह विविध ठिकाणांसाठी रेल्वे सुरू झाली पाहिजे. अद्यापही छत्रपती संभाजीनगरहून लातूर, धाराशिव, पंढरपूर दरम्यान रेल्वे संपर्क नाहीत. सध्या उन्हाळी सुट्टीत सर्व गाड्यांना दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. देवगिरी, नंदीग्राम, पुणे, पनवेल आदी रेल्वेंत महिनाभरापूर्वीदेखील आरक्षण तिकीट उपलब्ध होत नाही. उन्हाळी सुट्टीत पुणे, मुंबई, नागपूर, गोवा, बिकानेर, कन्याकुमारीपर्यंत जोडणारी नवीन रेल्वे चालविण्यात यावी.- अरुण मेघराज, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन