शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

खरं सांगा, नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरात पाणी कधी येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 13:07 IST

‘खरं सांगा शहरात पाणी कधी येईल’ या विषयावर ‘लोकमत’ने औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, महापालिकेतील योजनेचे समन्वयक अधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सर्वांनी योजना तीन वर्षांत पूर्ण होईल असा दावा केला आहे.

ठळक मुद्दे जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्यापुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल.ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहराच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यास विद्यमान पाणीपुरवठा यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने २००८ मध्ये शहरासाठी समांतर जलवाहिनी योजना मंजूर केली होती. त्यानंतर आठ वर्षांनी समांतरने गाशा गुंडाळला. आता १६८० कोटी रुपयांच्या नव्या योजनेचे काम सुरू असून, ही योजना फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण होईल, असा दावा प्रशासन करते आहे. योजनेच्या घोषणा व गदारोळातच शहरवासीयांना एक तप चटके सहन करावे लागले. ही योजना पूर्ण होऊन किमान १६ वर्षांनी का होईना शहराला पुरेसे पाणी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

शहरातील अनेक वसाहतींना आजही आठव्या आणि नवव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये हे काम सुरू करण्यात आले. फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण काम संपेल असा दावा करण्यात येत आहे. ‘खरं सांगा शहरात पाणी कधी येईल’ या विषयावर ‘लोकमत’ने औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, महापालिकेतील योजनेचे समन्वयक अधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सर्वांनी योजना तीन वर्षांत पूर्ण होईल असा दावा केला आहे. नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण झाला तर शहराच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल.

सध्या शहराची गरज २०० एमएलडी पाण्याची आहे. १२० एमएलडी पाणी सध्या शहरात आणण्यात येते. पाणीपुरवठ्यात कोणतेही नियोजन नसल्यामुळे काही वसाहतींना पाचव्या दिवशी, तर काही वसाहतींना थेट नवव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. २०० पेक्षा अधिक वसाहतींना मागील दहा वर्षांपासून महापालिका टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होतो. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम सध्या सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले आहे त्या कंपनीने युद्धपातळीवर कामाला सुरुवातही केली. ज्या ठिकाणी रस्त्याची कामे मनपाकडून करण्यात येणार आहेत तेथे प्राधान्याने ३३ किमीच्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. शहरात ११ ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

नवीन पाणीपुरवठा योजनेचे स्वरूप२०५०-५२ पर्यंत औरंगाबादसह आसपासच्या खेड्यांची लोकसंख्या किमान ३५ ते ४० लाख होणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी योजनेचे डिझाइन तयार करण्यात आले आहे.नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. ही योजना दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षांचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. नवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा, देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागाचा समावेश करण्यात आला आहे.

तीन वर्षांत योजना पूर्ण होणार२०२४ पर्यंत योजना पूर्ण होईल त्या दृष्टीने सध्या काम सुरू आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार प्राधान्याने काही रस्त्यांवर जलवाहिन्या टाकण्यात येत आहे. नक्षत्रवाडी एमबीआरचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू करण्यात आले.- अजय सिंग, मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

नियोजनानुसार आतापर्यंत काम सुरूनवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आतापर्यंत काम सुरू आहे. कामात कोणताही अडथळा नाही. फेब्रुवारी २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. योजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्यही करण्यात येत आहे.- हेमंत कोल्हे, समन्वयक, नवीन पाणीपुरवठा योजना

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका