शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

दिव्यांगांच्या ई-रिक्षात तांत्रिक बिघाड, बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानाखाली काढला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 19:02 IST

ई -रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याची तक्रार दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली.

छत्रपती संभाजीनगर: दिव्यांग महामंडळाच्या मार्फत दिलेल्या रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याने आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात दिव्यांगांनी तक्रार करताच आमदार कडू यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांचा उद्या छत्रपती संभाजीनगरात आक्रोश मोर्चा आहे. यासाठी आमदार कडू शहरात दाखल झाले आहेत. आज दुपारी त्यांनी विश्रामगृहात विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी काही दिव्यांगांनी दिव्यांग महामंडळाच्या मार्फत देण्यात आलेल्या ई- रिक्षा बाबत केलेल्या तक्रारीवरून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. ई -रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याची तक्रार दिव्यांगांनी आमदार कडू यांच्याकडे केली. यामुळे आमदार कडू यांनी ई - रिक्षा देणाऱ्या तेजस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

दिव्यांगांनी आमदार कडू यांना संबंधित कंपनीचे कर्मचाऱ्यांच्या समोरच ई-रिक्षाबाबत तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. सदरील कंपनीने दिव्यांग महामंडळाच्या मार्फत दिलेल्या रिक्षात तांत्रिक बिघाड आहे. पहिल्याच दिवशी रिक्षा बंद पडल्या. रिक्षा चढावर चढत नाहीत. तसेच लवकर सुरू होत नाहीत. चेसीस आणि हँडल मध्ये बरंच अंतर आहे, रस्त्यामध्ये रिक्षा पलटी होत आहेत. कुठल्याही बॅलन्स नसल्यामुळे या रिक्षा अतिशय धोकादायक असल्याचे दिव्यांगांनी सांगितले. यामुळे आमदार कडू यांच्या रागाचा पारा चढला . यातच संबंधित अधिकाऱ्याने व्यवस्थित उत्तरं न दिल्यामुळे कडू यांनी त्याच्या थेट कानशिलात लगावली. 

प्रहारच्या आक्रोश मोर्चाला अद्याप परवानगी नाहीदिव्यांग, शेतकरी व शेतमजूर यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBacchu Kaduबच्चू कडू