शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दिव्यांगांच्या ई-रिक्षात तांत्रिक बिघाड, बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानाखाली काढला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 19:02 IST

ई -रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याची तक्रार दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली.

छत्रपती संभाजीनगर: दिव्यांग महामंडळाच्या मार्फत दिलेल्या रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याने आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात दिव्यांगांनी तक्रार करताच आमदार कडू यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांचा उद्या छत्रपती संभाजीनगरात आक्रोश मोर्चा आहे. यासाठी आमदार कडू शहरात दाखल झाले आहेत. आज दुपारी त्यांनी विश्रामगृहात विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी काही दिव्यांगांनी दिव्यांग महामंडळाच्या मार्फत देण्यात आलेल्या ई- रिक्षा बाबत केलेल्या तक्रारीवरून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. ई -रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याची तक्रार दिव्यांगांनी आमदार कडू यांच्याकडे केली. यामुळे आमदार कडू यांनी ई - रिक्षा देणाऱ्या तेजस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

दिव्यांगांनी आमदार कडू यांना संबंधित कंपनीचे कर्मचाऱ्यांच्या समोरच ई-रिक्षाबाबत तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. सदरील कंपनीने दिव्यांग महामंडळाच्या मार्फत दिलेल्या रिक्षात तांत्रिक बिघाड आहे. पहिल्याच दिवशी रिक्षा बंद पडल्या. रिक्षा चढावर चढत नाहीत. तसेच लवकर सुरू होत नाहीत. चेसीस आणि हँडल मध्ये बरंच अंतर आहे, रस्त्यामध्ये रिक्षा पलटी होत आहेत. कुठल्याही बॅलन्स नसल्यामुळे या रिक्षा अतिशय धोकादायक असल्याचे दिव्यांगांनी सांगितले. यामुळे आमदार कडू यांच्या रागाचा पारा चढला . यातच संबंधित अधिकाऱ्याने व्यवस्थित उत्तरं न दिल्यामुळे कडू यांनी त्याच्या थेट कानशिलात लगावली. 

प्रहारच्या आक्रोश मोर्चाला अद्याप परवानगी नाहीदिव्यांग, शेतकरी व शेतमजूर यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBacchu Kaduबच्चू कडू