शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अभियांत्रिकीच्या अधोगतीस तंत्रशिक्षण विभाग देखील जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:47 IST

अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे.

ठळक मुद्देशासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका खाजगी कंपनीतर्फे शिष्यवृत्ती वाटप समारंभाचे आयोजन केले होते.

औरंगाबाद : अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाला स्वत:मध्ये बदल करावा लागेल.  त्यासाठी उद्योगासोबतचा सहभाग महाविद्यालयांना वाढवावा लागणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले. 

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका खाजगी कंपनीतर्फे शिष्यवृत्ती वाटप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर एमएसबीटीचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्राचार्य डॉ. एफ. ए. खान उपस्थित होते. डॉ. वाघ यांच्या हस्ते तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. वाघ म्हणाले, आज जवळपास पन्नास टक्के जागा तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये रिक्त राहत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यवस्थेत देखील सुसूत्रता आणण्याची गरज आहे. तंत्रशिक्षणाविषयी आणि अभियांत्रिकीविषयी नकारात्मकता निर्माण होत आहे. व्यवस्थेतील मरगळ झटकून काम करायला हवे, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करताना तुम्हाला काय करायचे आहे. कुठे काम करायचे आहे. याबाबत स्पष्ट असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक डॉ. सीमा बोर्डे, आभार एल. आय. शेख यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. आर. एन. खडसे, प्रा. पी. टी. काळे, प्रा. एच. आर. शेख, प्रा. मकरंद भागवत, प्रा. सुदीन कुलकर्णी, एम. आर. मघाडे, प्रा. आर. एन. बुरकुल, डॉ. आर. जी. वाडेकर, प्रा. जे. एस. पाटील, प्रा. जे. डब्ल्यू. नेमाडे, प्रा. एस. एस. रगटे आदींनी प्रयत्न केले.

महाविद्यालयास एनबीए आवश्यकचपॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाने एनबीए मानांकन करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही महाविद्यालयास यापुढे सुविधा दिल्या जाणार नाहीत, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाtechnologyतंत्रज्ञान