शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अभियांत्रिकीच्या अधोगतीस तंत्रशिक्षण विभाग देखील जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:47 IST

अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे.

ठळक मुद्देशासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका खाजगी कंपनीतर्फे शिष्यवृत्ती वाटप समारंभाचे आयोजन केले होते.

औरंगाबाद : अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाला स्वत:मध्ये बदल करावा लागेल.  त्यासाठी उद्योगासोबतचा सहभाग महाविद्यालयांना वाढवावा लागणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले. 

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका खाजगी कंपनीतर्फे शिष्यवृत्ती वाटप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर एमएसबीटीचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्राचार्य डॉ. एफ. ए. खान उपस्थित होते. डॉ. वाघ यांच्या हस्ते तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. वाघ म्हणाले, आज जवळपास पन्नास टक्के जागा तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये रिक्त राहत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यवस्थेत देखील सुसूत्रता आणण्याची गरज आहे. तंत्रशिक्षणाविषयी आणि अभियांत्रिकीविषयी नकारात्मकता निर्माण होत आहे. व्यवस्थेतील मरगळ झटकून काम करायला हवे, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करताना तुम्हाला काय करायचे आहे. कुठे काम करायचे आहे. याबाबत स्पष्ट असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक डॉ. सीमा बोर्डे, आभार एल. आय. शेख यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. आर. एन. खडसे, प्रा. पी. टी. काळे, प्रा. एच. आर. शेख, प्रा. मकरंद भागवत, प्रा. सुदीन कुलकर्णी, एम. आर. मघाडे, प्रा. आर. एन. बुरकुल, डॉ. आर. जी. वाडेकर, प्रा. जे. एस. पाटील, प्रा. जे. डब्ल्यू. नेमाडे, प्रा. एस. एस. रगटे आदींनी प्रयत्न केले.

महाविद्यालयास एनबीए आवश्यकचपॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाने एनबीए मानांकन करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही महाविद्यालयास यापुढे सुविधा दिल्या जाणार नाहीत, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाtechnologyतंत्रज्ञान