शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
6
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
7
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
8
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
9
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

जिल्हा परिषद शाळांच्या अचानक तपासणीने लेटलतीफ शिक्षकांची उडाली धावपळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:19 IST

गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांची अचानक तपासणी करण्यात आली.

औरंगाबाद : शाळांमध्ये सकाळी वेळेत न येणारे शिक्षक न सांगता अनुपस्थितीत राहणारे, शाळा सुटण्याअगोदर निघून जाणे, टाचन न काढणारे व गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. तथापि, तपासणीची ही बातमी फुटल्यामुळे अनेक ‘लेटलतीफ’ शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली.

सर्वसाधारण सभा असेल, स्थायी समितीची बैठक असेल किंवा शिक्षण समितीच्या बैठकांमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांना लिहिता- वाचता येत नाही. शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत. गैरहजर असतात, अशा तक्रारींचा पाढा वाचला जातो. अनेक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्यादेखील याच तक्रारी आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांना याबाबत उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी दोन दिवस बसून शाळा तपासणीचा कार्यक्रम आखला. 

शाळा तपासणीची अत्यंत गोपनीयता बाळगत शिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ७.३० वाजता सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्रांतील साधन व्यक्ती आदी जवळपास २०० जणांना त्या त्या पंचायत समित्यांच्या साधन केंद्रांमध्ये बोलावून घेतले व एकाच वेळी दुर्गम भागातील शाळा तपासणीच्या सूचना केल्या. तरीही ही बातमी फुटली. त्यामुळे शाळा तपासणीसाठी अधिकारी-कर्मचारी शाळांवर पोहोचण्यापूर्वीच अनेक ‘लेटलतीफ’ शिक्षकांची धावपळ सुरू झाली.

सकाळी ८ वाजता तपासणी अधिकारी बाहेर पडले. ते ठरवून दिलेल्या शाळांमध्ये सकाळी ९ वाजता धडकले. तपासणी अधिकाऱ्यांनी शिक्षक हे शाळेत वेळेत येतात की नाही, शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, टाचण वह्यांमधील नोंदी, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय अभिलेख्यांची तपासणी केली. यामध्ये अनेक शिक्षक गैरहजर आढळून आले, तर अनेकजण शाळांमध्ये उशिरा दाखल झाल्याचेही आढळून आले. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. 

२०० पेक्षा जास्त शाळांची तपासणीशिक्षण विभागाने केलेल्या अचानक तपासणीमुळे आणि आपल्या शाळेत पथक येऊ शकते या भीतीपोटी शिक्षकांची धावपळ उडाली. दरम्यान, २०० वर शाळांना भेटी देण्यात आल्या असून, यामागे शिक्षकांना घाबरविण्याचा उद्देश नसल्याचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणाले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद