शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जिल्हा परिषद शाळांच्या अचानक तपासणीने लेटलतीफ शिक्षकांची उडाली धावपळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:19 IST

गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांची अचानक तपासणी करण्यात आली.

औरंगाबाद : शाळांमध्ये सकाळी वेळेत न येणारे शिक्षक न सांगता अनुपस्थितीत राहणारे, शाळा सुटण्याअगोदर निघून जाणे, टाचन न काढणारे व गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. तथापि, तपासणीची ही बातमी फुटल्यामुळे अनेक ‘लेटलतीफ’ शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली.

सर्वसाधारण सभा असेल, स्थायी समितीची बैठक असेल किंवा शिक्षण समितीच्या बैठकांमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांना लिहिता- वाचता येत नाही. शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत. गैरहजर असतात, अशा तक्रारींचा पाढा वाचला जातो. अनेक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्यादेखील याच तक्रारी आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांना याबाबत उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी दोन दिवस बसून शाळा तपासणीचा कार्यक्रम आखला. 

शाळा तपासणीची अत्यंत गोपनीयता बाळगत शिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ७.३० वाजता सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्रांतील साधन व्यक्ती आदी जवळपास २०० जणांना त्या त्या पंचायत समित्यांच्या साधन केंद्रांमध्ये बोलावून घेतले व एकाच वेळी दुर्गम भागातील शाळा तपासणीच्या सूचना केल्या. तरीही ही बातमी फुटली. त्यामुळे शाळा तपासणीसाठी अधिकारी-कर्मचारी शाळांवर पोहोचण्यापूर्वीच अनेक ‘लेटलतीफ’ शिक्षकांची धावपळ सुरू झाली.

सकाळी ८ वाजता तपासणी अधिकारी बाहेर पडले. ते ठरवून दिलेल्या शाळांमध्ये सकाळी ९ वाजता धडकले. तपासणी अधिकाऱ्यांनी शिक्षक हे शाळेत वेळेत येतात की नाही, शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, टाचण वह्यांमधील नोंदी, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय अभिलेख्यांची तपासणी केली. यामध्ये अनेक शिक्षक गैरहजर आढळून आले, तर अनेकजण शाळांमध्ये उशिरा दाखल झाल्याचेही आढळून आले. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. 

२०० पेक्षा जास्त शाळांची तपासणीशिक्षण विभागाने केलेल्या अचानक तपासणीमुळे आणि आपल्या शाळेत पथक येऊ शकते या भीतीपोटी शिक्षकांची धावपळ उडाली. दरम्यान, २०० वर शाळांना भेटी देण्यात आल्या असून, यामागे शिक्षकांना घाबरविण्याचा उद्देश नसल्याचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणाले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद