शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

जिल्हा परिषद शाळांच्या अचानक तपासणीने लेटलतीफ शिक्षकांची उडाली धावपळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:19 IST

गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांची अचानक तपासणी करण्यात आली.

औरंगाबाद : शाळांमध्ये सकाळी वेळेत न येणारे शिक्षक न सांगता अनुपस्थितीत राहणारे, शाळा सुटण्याअगोदर निघून जाणे, टाचन न काढणारे व गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. तथापि, तपासणीची ही बातमी फुटल्यामुळे अनेक ‘लेटलतीफ’ शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली.

सर्वसाधारण सभा असेल, स्थायी समितीची बैठक असेल किंवा शिक्षण समितीच्या बैठकांमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांना लिहिता- वाचता येत नाही. शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत. गैरहजर असतात, अशा तक्रारींचा पाढा वाचला जातो. अनेक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्यादेखील याच तक्रारी आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांना याबाबत उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी दोन दिवस बसून शाळा तपासणीचा कार्यक्रम आखला. 

शाळा तपासणीची अत्यंत गोपनीयता बाळगत शिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ७.३० वाजता सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्रांतील साधन व्यक्ती आदी जवळपास २०० जणांना त्या त्या पंचायत समित्यांच्या साधन केंद्रांमध्ये बोलावून घेतले व एकाच वेळी दुर्गम भागातील शाळा तपासणीच्या सूचना केल्या. तरीही ही बातमी फुटली. त्यामुळे शाळा तपासणीसाठी अधिकारी-कर्मचारी शाळांवर पोहोचण्यापूर्वीच अनेक ‘लेटलतीफ’ शिक्षकांची धावपळ सुरू झाली.

सकाळी ८ वाजता तपासणी अधिकारी बाहेर पडले. ते ठरवून दिलेल्या शाळांमध्ये सकाळी ९ वाजता धडकले. तपासणी अधिकाऱ्यांनी शिक्षक हे शाळेत वेळेत येतात की नाही, शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, टाचण वह्यांमधील नोंदी, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय अभिलेख्यांची तपासणी केली. यामध्ये अनेक शिक्षक गैरहजर आढळून आले, तर अनेकजण शाळांमध्ये उशिरा दाखल झाल्याचेही आढळून आले. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. 

२०० पेक्षा जास्त शाळांची तपासणीशिक्षण विभागाने केलेल्या अचानक तपासणीमुळे आणि आपल्या शाळेत पथक येऊ शकते या भीतीपोटी शिक्षकांची धावपळ उडाली. दरम्यान, २०० वर शाळांना भेटी देण्यात आल्या असून, यामागे शिक्षकांना घाबरविण्याचा उद्देश नसल्याचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणाले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद