शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शिक्षकांनो, सामाजिक विषयावर बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:23 IST

आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : साने गुरुजींची आठवण ६७ वर्षानंतरही काढली जाते. दुसरीकडे आज शिक्षक रजेवर गेल्यावर मुले टाळ्या वाजवितात कारण साने गुरुजींमध्ये शिक्षकाची जी ताकद होती ती आजच्या शिक्षकांमध्ये राहिलेली नाही. आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.सोमवारी सायंकाळी राजश्री शाहू महाविद्यालयात आयोजित ‘शिक्षणावर बोलू काही’ या अंतर्गत ते नागरिकांशी संवाद साधत होते. डॉ. सुरेश सावंत, व्यंकटेश चौधरी, शिवा कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकावर माझा अजूनही विश्वास आहे. या शिक्षकावरच समाजाकडूनही टीका होते. कारण अजूनही समाजाने शिक्षकांकडून अपेक्षा सोडलेली नाही. ठेकेदार, राजकारण्यांकडून समाजाला अपेक्षा उरलेली नाही. ज्या दिवशी शिक्षकावरील टीका थांबेल तो दिवस दुर्देवी असेल कारण त्या दिवशी समाजाने शिक्षकांकडूनही अपेक्षा सोडल्याचे समजावे. असे कुलकर्णी यावेळी म्हणाले. आज शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा अस्वस्थ करणारा आहे. इयत्ता १२ वी नंतरची मुले व्यवस्थेत टिकत नसल्याचे दिसते. ग्रामीण भागात फिरताना ही मुले खुशाल पत्ते पिटताना दिसतात. कारण या मुलांचे हात आपण कौशल्यपूर्ण घडवू शकलो नाही. सगळ्यांना व्यवहारिक ज्ञान देवू शकलो नाही. सगळ्यांनाच पास करत पुढे ढकलायचे असेल तर या शाळा हव्यात कशाला ? असा परखड सवालही हेरंब कुलकर्णी यांनी यावेळी केला.मागील काही दिवसांपासून मी ग्रामीण भाग पिंजून काढतो आहे. आजवर १५ जिल्ह्यांत फिरुन ७० शाळा पाहिल्या़ या शाळातील अनेक मुलांना साधं लिहिता, वाचताही येत नाही. आपण टीव्ही पाहताना चॅनल सर्फिंग करीत असताना, मध्येच एखादे इतर भाषेतील चॅनल लागल्यानंतर तो बदलतो कारण तिथे काय सुरु आहे तेच आपल्याला समजत नसते. एखाद्या चॅनलवर आपण २ मिनिटे थांबू शकत नसू; तर लिहिता वाचता न येणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वर्ष-वर्ष शाळेतील काळ्या फळ्यासमोर का बसावे? लिहितावाचता येणारी मुलं कधीच शाळा सोडत नाहीत. मात्र ज्यांनी शिकायचे वय असताना शाळा सोडली त्या बाहेर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार कोण, असा सवालही कुलकर्णी यांनी केला.