शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

शिक्षकांनो, सामाजिक विषयावर बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:23 IST

आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : साने गुरुजींची आठवण ६७ वर्षानंतरही काढली जाते. दुसरीकडे आज शिक्षक रजेवर गेल्यावर मुले टाळ्या वाजवितात कारण साने गुरुजींमध्ये शिक्षकाची जी ताकद होती ती आजच्या शिक्षकांमध्ये राहिलेली नाही. आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.सोमवारी सायंकाळी राजश्री शाहू महाविद्यालयात आयोजित ‘शिक्षणावर बोलू काही’ या अंतर्गत ते नागरिकांशी संवाद साधत होते. डॉ. सुरेश सावंत, व्यंकटेश चौधरी, शिवा कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकावर माझा अजूनही विश्वास आहे. या शिक्षकावरच समाजाकडूनही टीका होते. कारण अजूनही समाजाने शिक्षकांकडून अपेक्षा सोडलेली नाही. ठेकेदार, राजकारण्यांकडून समाजाला अपेक्षा उरलेली नाही. ज्या दिवशी शिक्षकावरील टीका थांबेल तो दिवस दुर्देवी असेल कारण त्या दिवशी समाजाने शिक्षकांकडूनही अपेक्षा सोडल्याचे समजावे. असे कुलकर्णी यावेळी म्हणाले. आज शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा अस्वस्थ करणारा आहे. इयत्ता १२ वी नंतरची मुले व्यवस्थेत टिकत नसल्याचे दिसते. ग्रामीण भागात फिरताना ही मुले खुशाल पत्ते पिटताना दिसतात. कारण या मुलांचे हात आपण कौशल्यपूर्ण घडवू शकलो नाही. सगळ्यांना व्यवहारिक ज्ञान देवू शकलो नाही. सगळ्यांनाच पास करत पुढे ढकलायचे असेल तर या शाळा हव्यात कशाला ? असा परखड सवालही हेरंब कुलकर्णी यांनी यावेळी केला.मागील काही दिवसांपासून मी ग्रामीण भाग पिंजून काढतो आहे. आजवर १५ जिल्ह्यांत फिरुन ७० शाळा पाहिल्या़ या शाळातील अनेक मुलांना साधं लिहिता, वाचताही येत नाही. आपण टीव्ही पाहताना चॅनल सर्फिंग करीत असताना, मध्येच एखादे इतर भाषेतील चॅनल लागल्यानंतर तो बदलतो कारण तिथे काय सुरु आहे तेच आपल्याला समजत नसते. एखाद्या चॅनलवर आपण २ मिनिटे थांबू शकत नसू; तर लिहिता वाचता न येणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वर्ष-वर्ष शाळेतील काळ्या फळ्यासमोर का बसावे? लिहितावाचता येणारी मुलं कधीच शाळा सोडत नाहीत. मात्र ज्यांनी शिकायचे वय असताना शाळा सोडली त्या बाहेर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार कोण, असा सवालही कुलकर्णी यांनी केला.