शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शिक्षकांनो, सामाजिक विषयावर बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:23 IST

आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : साने गुरुजींची आठवण ६७ वर्षानंतरही काढली जाते. दुसरीकडे आज शिक्षक रजेवर गेल्यावर मुले टाळ्या वाजवितात कारण साने गुरुजींमध्ये शिक्षकाची जी ताकद होती ती आजच्या शिक्षकांमध्ये राहिलेली नाही. आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.सोमवारी सायंकाळी राजश्री शाहू महाविद्यालयात आयोजित ‘शिक्षणावर बोलू काही’ या अंतर्गत ते नागरिकांशी संवाद साधत होते. डॉ. सुरेश सावंत, व्यंकटेश चौधरी, शिवा कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकावर माझा अजूनही विश्वास आहे. या शिक्षकावरच समाजाकडूनही टीका होते. कारण अजूनही समाजाने शिक्षकांकडून अपेक्षा सोडलेली नाही. ठेकेदार, राजकारण्यांकडून समाजाला अपेक्षा उरलेली नाही. ज्या दिवशी शिक्षकावरील टीका थांबेल तो दिवस दुर्देवी असेल कारण त्या दिवशी समाजाने शिक्षकांकडूनही अपेक्षा सोडल्याचे समजावे. असे कुलकर्णी यावेळी म्हणाले. आज शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा अस्वस्थ करणारा आहे. इयत्ता १२ वी नंतरची मुले व्यवस्थेत टिकत नसल्याचे दिसते. ग्रामीण भागात फिरताना ही मुले खुशाल पत्ते पिटताना दिसतात. कारण या मुलांचे हात आपण कौशल्यपूर्ण घडवू शकलो नाही. सगळ्यांना व्यवहारिक ज्ञान देवू शकलो नाही. सगळ्यांनाच पास करत पुढे ढकलायचे असेल तर या शाळा हव्यात कशाला ? असा परखड सवालही हेरंब कुलकर्णी यांनी यावेळी केला.मागील काही दिवसांपासून मी ग्रामीण भाग पिंजून काढतो आहे. आजवर १५ जिल्ह्यांत फिरुन ७० शाळा पाहिल्या़ या शाळातील अनेक मुलांना साधं लिहिता, वाचताही येत नाही. आपण टीव्ही पाहताना चॅनल सर्फिंग करीत असताना, मध्येच एखादे इतर भाषेतील चॅनल लागल्यानंतर तो बदलतो कारण तिथे काय सुरु आहे तेच आपल्याला समजत नसते. एखाद्या चॅनलवर आपण २ मिनिटे थांबू शकत नसू; तर लिहिता वाचता न येणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वर्ष-वर्ष शाळेतील काळ्या फळ्यासमोर का बसावे? लिहितावाचता येणारी मुलं कधीच शाळा सोडत नाहीत. मात्र ज्यांनी शिकायचे वय असताना शाळा सोडली त्या बाहेर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार कोण, असा सवालही कुलकर्णी यांनी केला.