शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

शिक्षकांनो, सामाजिक विषयावर बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:23 IST

आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : साने गुरुजींची आठवण ६७ वर्षानंतरही काढली जाते. दुसरीकडे आज शिक्षक रजेवर गेल्यावर मुले टाळ्या वाजवितात कारण साने गुरुजींमध्ये शिक्षकाची जी ताकद होती ती आजच्या शिक्षकांमध्ये राहिलेली नाही. आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.सोमवारी सायंकाळी राजश्री शाहू महाविद्यालयात आयोजित ‘शिक्षणावर बोलू काही’ या अंतर्गत ते नागरिकांशी संवाद साधत होते. डॉ. सुरेश सावंत, व्यंकटेश चौधरी, शिवा कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकावर माझा अजूनही विश्वास आहे. या शिक्षकावरच समाजाकडूनही टीका होते. कारण अजूनही समाजाने शिक्षकांकडून अपेक्षा सोडलेली नाही. ठेकेदार, राजकारण्यांकडून समाजाला अपेक्षा उरलेली नाही. ज्या दिवशी शिक्षकावरील टीका थांबेल तो दिवस दुर्देवी असेल कारण त्या दिवशी समाजाने शिक्षकांकडूनही अपेक्षा सोडल्याचे समजावे. असे कुलकर्णी यावेळी म्हणाले. आज शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा अस्वस्थ करणारा आहे. इयत्ता १२ वी नंतरची मुले व्यवस्थेत टिकत नसल्याचे दिसते. ग्रामीण भागात फिरताना ही मुले खुशाल पत्ते पिटताना दिसतात. कारण या मुलांचे हात आपण कौशल्यपूर्ण घडवू शकलो नाही. सगळ्यांना व्यवहारिक ज्ञान देवू शकलो नाही. सगळ्यांनाच पास करत पुढे ढकलायचे असेल तर या शाळा हव्यात कशाला ? असा परखड सवालही हेरंब कुलकर्णी यांनी यावेळी केला.मागील काही दिवसांपासून मी ग्रामीण भाग पिंजून काढतो आहे. आजवर १५ जिल्ह्यांत फिरुन ७० शाळा पाहिल्या़ या शाळातील अनेक मुलांना साधं लिहिता, वाचताही येत नाही. आपण टीव्ही पाहताना चॅनल सर्फिंग करीत असताना, मध्येच एखादे इतर भाषेतील चॅनल लागल्यानंतर तो बदलतो कारण तिथे काय सुरु आहे तेच आपल्याला समजत नसते. एखाद्या चॅनलवर आपण २ मिनिटे थांबू शकत नसू; तर लिहिता वाचता न येणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वर्ष-वर्ष शाळेतील काळ्या फळ्यासमोर का बसावे? लिहितावाचता येणारी मुलं कधीच शाळा सोडत नाहीत. मात्र ज्यांनी शिकायचे वय असताना शाळा सोडली त्या बाहेर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार कोण, असा सवालही कुलकर्णी यांनी केला.