शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘विनाअनुदानित’वरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची शिक्षकांची याचिका नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:37 IST

‘विनाअनुदानित’ तुकड्यांवरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अरुण ढवळे यांनी नामंजूर केली.

 

औरंगाबाद : ‘विनाअनुदानित’ तुकड्यांवरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अरुण ढवळे यांनी नामंजूर केली.२८ जून २०१६ च्या परिपत्रकानुसार बदली करण्याचा हक्क व्यवस्थापनाला आहे; परंतु शिक्षकांना तसा हक्क नाही, असे स्पष्ट करीत खंडपीठाने याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका नामंजूर केली.यासंदर्भात जालना येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ संचलित श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयातील प्रदीप राठोड आणि इतर ८ शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या शाळेत अनुदानित आणि विनाअनुदानित तुकड्या आहेत. २८ जून २०१६ च्या परिपत्रकानुसार विनाअनुदानित तुकड्यांवरून अनुदानित तुकड्यांवर बदली करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.याचिकाकर्त्यांच्या विनंतीला व्यवस्थापनातर्फे विरोध करताना अ‍ॅड. विवेक ढगे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २८ जून २०१६ चे ‘परिपत्रक’ आहे, ‘शासन निर्णय’ नाही, म्हणून परिपत्रकातील तरतुदी व्यवस्थापनावर बंधनकारक नाहीत. बदली करावी किंवा नाही हा व्यवस्थापनाचा हक्कआहे. बदल हा कर्मचाऱ्यांचा हक्क होऊ शकत नाही. शिवाय सदर संस्था ही अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे राज्यघटनेच्या कलम ३० नुसार व्यवस्थापन करताना व्यवस्थापनाला स्वायत्तता आहे. शिक्षकांच्या नेमणुका हा स्वायत्ततेचा भाग आहे. सुनावणीअंती खंडपीठाने याचिका नामंजूर केली.

 

टॅग्स :Courtन्यायालयTeacherशिक्षक