शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

करदात्यांना त्रासच त्रास!

By admin | Updated: July 24, 2014 00:38 IST

औरंगाबाद : महापालिकेला प्रामाणिकपणे मालमत्ता, पाणीपट्टी आदी कर देणारे नागरिक भरपूर आहेत.

औरंगाबाद : महापालिकेला प्रामाणिकपणे मालमत्ता, पाणीपट्टी आदी कर देणारे नागरिक भरपूर आहेत. त्यांच्या आर्थिक साह्यामुळे मनपाच्या आर्थिक संकटाला थोडाफार हातभार लागतो; पण करदात्यांना त्रास देण्याचे प्रशासनाने सुरू केले आहे की काय? एखाद्या रस्त्याकडे किती वर्षे दुर्लक्ष करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.संस्थान गणपतीशहराचे आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. वाहनधारकांसह पायी ये-जा करणाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेने या रस्त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. सकाळी, सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. जुन्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. महापालिकेला कर भरूनही खड्ड्यांमधून वाट काढावी लागत असल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली. काहींनी तर मनपाला कर भरणेच बंद करावे लागेल, असे नमूद केले. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सत्तेचा ‘रिमोट’ ज्यांच्या हातात आहे, ते नेतेही दर्शनासाठी अधूनमधून येतात. त्यांना हा खराब रस्ता दिसत नाही का असा प्रश्न काही सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला.बारुदगरनाला ते औरंगपुराशहराच्या कोणत्याही भागात राहणारा नागरिक औरंगपुरा भाजीमंडईत खरेदीसाठी येतच असतो. भाजीमंडईकडे येणारा एक रस्ता म्हणजे बारुदगरनाला ते सुराणा अपार्टमेंट होय. हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून मनपाने दुरुस्त केलेला नाही. यापूर्वी एकदा डागडुजी करण्यात आली होती. सध्या रस्त्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. रात्री तर या खड्ड्यांमध्ये चारचाकी आणि रिक्षाचालक हमखास अडकून पडतात. आसपास राहणाऱ्या नागरिकांना वाहन बाहेर काढण्यासाठी मदतीला बोलावण्यात येते. मागील आठ दिवसांपासून तर हे प्रकार खूपच वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मोंढा ते अंगुरीबाग शहरातील अत्यंत जुनी बाजारपेठ असलेल्या मोंढा ते अंगुरीबाग रस्ताही वाहनधारकांच्या अंगाला काटा आणणारा आहे. मागील अनेक वर्षांमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजी प्रामाणिकपणे केली जाते. हा रस्ता गुळगुळीत करण्यात यावा, रस्त्यावर पाणी थांबणार नाही अशी व्यवस्था करावी, अशी व्यापाऱ्यांसह रहिवाशांची अपेक्षा आहे. महापालिकेने आतापासूनच या रस्त्याचा विचार केल्यास गणेशोत्सवापूर्वी रस्ता तयार होईल. या भागातील व्यापारी, सर्वसामान्य नागरिक दरवर्षी मनपाला शंभर टक्के कर भरतात. करदात्यांनाच त्रास देण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. या भागातील लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.