शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

ऑरिकमध्ये ‘आयटी’ गुंतवणुकीसाठी टाटा सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:55 IST

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा  

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत झाली.शाळांसाठी इन्फोसिसशी पत्रव्यवहार 

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत. टाटा समूहाचे तन्मय चक्रवर्ती आणि आफ्रिकेसह विविध देशांतील गुंतवणूकदार प्रकाश जैन यांच्यासमवेत मी ऑरिकमधील पायाभूत सुविधांची रविवारी पाहणी केली. त्यांनी गुंतवणूक करण्यास सकारात्मकता दर्शविल्याचा दावा उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी केला.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक चांगले झाले आहे, या क्षेत्रातील तज्ज्ञांना केवळ व्यवसाय सुलभता देऊन भागत नाही, तर जगण्यासाठी आवश्यक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात, असे प्रयत्न केले जातील, निवास आणि कामाचे संकुल एकच असावे, अशी मान्यता राज्याच्या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात समाविष्ट केलेली आहे, पुण्यातील हिंजेवाडीत आयटी क्षेत्राला वाहतूक कोंडीचा त्रास होत असे, त्यामुळे तेथे धोरणांमध्ये बदल करण्यात आले आहेत, तसेच औरंगाबादेत विरंगुळ्याची ठिकाणे वाढल्यास आयटीतील कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीप्रमाणे त्यांना येथे काम करता येईल. त्यासाठी धोरणात्मक निर्णय होतील, असे देसाई म्हणाले. 

शेंद्रा-बिडकीन-वाळूजचा विचारशेंद्रा- बिडकीन- वाळूज हा डीएमआयसीतील रस्ता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दुसऱ्या टप्प्यात करण्याबाबत १२ जानेवारी रोजी विधान केले. त्यावर उद्योगमंत्री देसाई म्हणाले, या रस्त्याचा विचार शासन करील, तसेच औरंगाबाद ते पैठण या रस्त्याचा डीपीआर होत आल्याचेही देसाई यांनी नमूद केले. डीएमआयसीने या रस्त्यासाठी काही प्रमाणात निधी ठेवला आहे. त्यातून हा रस्ता होईल काय, याची माहिती घेतली जाईल, असेही देसाई म्हणाले.

शाळांसाठी इन्फोसिसशी पत्रव्यवहार औरंगाबाद पर्यटन जिल्हा असून, येथे पर्यटनाला वाव आहे. अजिंठा रस्त्यासह विमानतळ धावपट्टी वाढविणे, वेरूळ-अजिंठा महोत्सव, लाईट अ‍ॅण्ड साऊंड शोच्या मंजूर प्रकल्पात अधिक भर कशी घालता येईल यासह पर्यटनाच्या अनुषंगाने काय करावे, याचा अहवाल मागविला होता. येथील पर्यटन विकासासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दौरा करावा, अशी विनंती करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले, तसेच जिल्ह्यातील शाळांवरील छतांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यासाठी नियोजन विभागाकडे जास्तीचे अनुदान मागणार आहोत. सीएसआरसाठी इन्फोसिसचे नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीTataटाटाAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई