शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

दुष्काळी मराठवाड्याला टाटांच्या धरणांचे पाणी

By admin | Updated: June 5, 2016 00:41 IST

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आता पश्चिम घाटातील टाटा कंपनीच्या धरणांमधील पाणी आणण्याविषयी मंथन सुरू झाले आहे.

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आता पश्चिम घाटातील टाटा कंपनीच्या धरणांमधील पाणी आणण्याविषयी मंथन सुरू झाले आहे. मराठवाडा विकास मंडळाच्या बैठकीत शनिवारी त्याविषयी सादरीकरण करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात टाटा कंपनीने पश्चिम घाटात सहा धरणे बांधली. त्यात दरवर्षी ४८ टीएमसी पाणी अडविण्यात येते. ही धरणे दुष्काळग्रस्त भागापेक्षा उंचीवर आहेत. त्यामुळे ते पाणी नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटीने) मराठवाड्याला देणे शक्य आहे. तसेच हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे असून ते आतापर्यंत कोकणासाठी वापरले जात आहे, ही बाबही सादरीकरणात मांडण्यात आली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मराठवाडा विकास मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील जल अभ्यासक प्रफुल्ल कदम यांनी वरील विषयाच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. टाटा पॉवर कंपनीने स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी करार करून १९१७ ते १९२७ या दरम्यान उर्ध्व भिमा खोऱ्यात लोणावळा, वलवण, शिरवटा, सोमवडी, ठोकरवाडी आणि मुळशी ही सहा धरणे बांधली आहेत. या धरणांवर कंपनीचे ४४५ मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभे आहेत. भिमा नदीच्या उपनद्यांचे पाणी या धरणांमध्ये वळविण्यात आलेले आहे. त्यामुळे हे पाणी भिमा नदीच्या तुटीच्या खोऱ्यातील आहे. ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाच्या हक्काचे आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, टाटांची धरणे समुद्रसपाटीपासून ६२२ मीटर उंचीवर आहेत, तर सोलापूर शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची ४७३ मीटर, परळी शहराची उंची ४६१ मीटर, परभणी शहराची उंची ३५७ मीटर इतकी आहे. त्यामुळे हे पाणी ग्रॅव्हिटीने बंद पाईपलाईनमधून मराठवाड्यात आणणे सहज शक्य आहे. सध्या या धरणांमधील पाण्यावर ४४५ मेगावॅट वीज निर्मिती करते. ही वीज निर्मिती फार नाही. शासनाने कंपनीला तेवढा मोबदला द्यायचे ठरविले तरी तो जास्तीत जास्त वर्षाला ३ हजार कोटी रुपये होईल. सध्या दुष्काळी उपाययोजनांवर त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च होतो, तो खर्च मात्र पाणी आल्यामुळे वाचेल, ही बाबही त्यांनी मांडली. बैठकीला मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे, कृष्णा लव्हेकर, मंडळाचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे आदींची उपस्थिती होती. प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविणार- दांगटसादरीकरणानंतर विभागीय आयुक्त दांगट यांनी सांगितले की, मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बाहेरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने याआधी वैतरणाचे पाणी जायकवाडीत आणण्याविषयी राज्यपालांसमोर सादरीकरण झाले होते. आता या प्रस्तावाचीही व्यवहार्यता तपासून नवीन प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला जाईल. मराठवाड्याच्या दुष्काळी भागात ज्या ठिकाणावरून पाणी आणणे शक्य आहे तेथून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पाणी मराठवाड्याच्या हक्काचे- कदमटाटा हायड्रोपॉवर प्रकल्पामध्ये पूर्ववाहिनी नद्या व पाण्याचे प्रवाह पूर्णपणे वळवून पश्चिम वाहिनी केले आहेत. त्यामुळे हे पाणी भिमा खोऱ्याचे हक्काचे पाणी आहे. ते उजनीत आले तर मराठवाड्यालाही त्यातून हक्काच्या पाण्याचा वाटा मिळू शकेल. समाजहिताचा विचार करून शासनाने या धरणांचे राष्ट्रीयीकरण अथा खुलेकरण करावे, असे प्रफुल्ल कदम म्हणाले. उपकेंद्रांच्या ठिकाणी आरोग्य शिबिरेदुष्काळामुळे मराठवाड्यात आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. खाजगीत उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा परिस्थितीत उपकेंद्रांच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळाचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी केली.