शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

भगतसिंगनगरध्ये नळ बनले शोभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 21:53 IST

जलवाहिनीवर वॉल्व्ह बसविण्यात न आल्याने जोडणी केलेल्या नळाला कमी दाबाने पाणी येत आहे. योग्य दाबाने पाणी पुरवठा केला जात नसल्याने हे नळ केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत.

वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने येथील भगतसिंगनगरात नुकतीच पाणीपुरवठ्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकली आहे. मात्र या जलवाहिनीवर वॉल्व्ह बसविण्यात न आल्याने जोडणी केलेल्या नळाला कमी दाबाने पाणी येत आहे. योग्य दाबाने पाणी पुरवठा केला जात नसल्याने हे नळ केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

येथील भगतसिंग नगरात पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीने नुकतीच मुख्य जलवाहिनी टाकून अंतर्गत पाईपलाईनचे कामही सुरु केले आहे. जवळपास ८ ते १० गल्ल्यांत पाईप अंथरण्याचे कामही पूर्ण झाले असून, काही गल्ल्यांतील काम सुरु आहे. नव्याने टाकलेल्या जलवाहिनीवर रहिवाशांनी नळजोडणी घेतली आहे. परंतू जलवाहिनीवर अद्याप वॉल्व्ह बसविले नाहीत.

या भागाला आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते. मात्र, पाणी सोडल्यावरही नागरिकांच्या नळाला योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे अर्ध्या तासात केवळ दोन ते तीन हंडे पाणी नागरिकांना मिळत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून लगतच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने जलवाहिनीला वॉल्व्ह बसून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

या संदर्भात ग्रामविकास अधिकारी सुभाष लव्हाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई