शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

भगतसिंगनगरध्ये नळ बनले शोभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 21:53 IST

जलवाहिनीवर वॉल्व्ह बसविण्यात न आल्याने जोडणी केलेल्या नळाला कमी दाबाने पाणी येत आहे. योग्य दाबाने पाणी पुरवठा केला जात नसल्याने हे नळ केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत.

वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने येथील भगतसिंगनगरात नुकतीच पाणीपुरवठ्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकली आहे. मात्र या जलवाहिनीवर वॉल्व्ह बसविण्यात न आल्याने जोडणी केलेल्या नळाला कमी दाबाने पाणी येत आहे. योग्य दाबाने पाणी पुरवठा केला जात नसल्याने हे नळ केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

येथील भगतसिंग नगरात पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीने नुकतीच मुख्य जलवाहिनी टाकून अंतर्गत पाईपलाईनचे कामही सुरु केले आहे. जवळपास ८ ते १० गल्ल्यांत पाईप अंथरण्याचे कामही पूर्ण झाले असून, काही गल्ल्यांतील काम सुरु आहे. नव्याने टाकलेल्या जलवाहिनीवर रहिवाशांनी नळजोडणी घेतली आहे. परंतू जलवाहिनीवर अद्याप वॉल्व्ह बसविले नाहीत.

या भागाला आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते. मात्र, पाणी सोडल्यावरही नागरिकांच्या नळाला योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे अर्ध्या तासात केवळ दोन ते तीन हंडे पाणी नागरिकांना मिळत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून लगतच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने जलवाहिनीला वॉल्व्ह बसून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

या संदर्भात ग्रामविकास अधिकारी सुभाष लव्हाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई