शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

'राजकीय अन् सामाजिक गोष्टींवर बोलणं हे धाडसाचं काम', रॅपरने सांगितलं आप बिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 22:07 IST

मी अनेक दिवसांपासून लिहतो, सामाजिक आणि राजकीय गोष्टीवर लिहतो. काल्पनिक गोष्टींवर लिहणं थोडं अवघडं असतं.

मुंबई - सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी रॅपर राज मुंगासे यांचं राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं रॅप चांगलंच व्हायरल झालं होतं. राज्यातील राजकीय परिस्थिती सांगणारे हे रॅप आपलं दुसरंच रॅप साँग असून यापूर्वीही मी रॅप बनवलं होतं. पण, ते रॅप कधी सोशल मीडियावर टाकलं नाही. हे दुसरंच रॅप सोशल मीडियावर टाकलं आणि ते व्हायरल झालं, असे रॅपर राज मुंगासे यांनी मीडियासोबत बोलताना म्हटले. तसेच, चोर आले ५० खोक्के घेऊन चोर आले.. अशा आशयचा रॅप मी बनवला होता. माझ्या रॅपमध्ये कोणाचाही उल्लेख नव्हता, तरीही माझ्याविरुद्ध एफआयआर झाला. पण, ४-५ महिलांना मिळून एकाला मारलं, त्यांविरुद्ध एफआयआर झाला नाही, असे म्हणत त्याने ठाण्यातील आणि राज्यातील घटनांकडे लक्ष वेधले. 

मी अनेक दिवसांपासून लिहतो, सामाजिक आणि राजकीय गोष्टीवर लिहतो. काल्पनिक गोष्टींवर लिहणं थोडं अवघडं असतं. पण, राजकीय आणि सामाजिक घटनांवर लिहायला धाडस लागतं, असे रॅपर राज यांनी म्हटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरलंय की नाही हाच प्रश्न आहे. कारण, लोकशाहीने लोकांना बोलण्याची मुभा दिली, पण हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, तो बंद व्हायला हवा, आम्ही जे बोलतो ते आमच्या रॅपमधून बोलतो, असे राज याने म्हटले.  

राजच्या या रॅपमध्ये त्याने '50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी' अशा शब्दांचा वापर केला होता. त्याचे हे रॅप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना(उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी शेअर केल्यानंतर राज्यभर तुफान व्हायरल झाले. मात्र, यानंतर त्याच्याविरोधात अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून राज गायब झाला होता. तो नेमका कुठंय, याची माहिती कोणलाही नव्हती. अखेर त्याला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तो माध्यमांसमोर आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याच गाडीत बसून तो मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला पोहोचला. दरम्यान, अंबादास दानवे यांची माझी खूप मदत केली, त्यांच्या वकिलांनीच माझा जामीन मंजूर केल्याचे राजने माध्यमांशी बोलताना साांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईambernathअंबरनाथShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी