शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'राजकीय अन् सामाजिक गोष्टींवर बोलणं हे धाडसाचं काम', रॅपरने सांगितलं आप बिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 22:07 IST

मी अनेक दिवसांपासून लिहतो, सामाजिक आणि राजकीय गोष्टीवर लिहतो. काल्पनिक गोष्टींवर लिहणं थोडं अवघडं असतं.

मुंबई - सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी रॅपर राज मुंगासे यांचं राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं रॅप चांगलंच व्हायरल झालं होतं. राज्यातील राजकीय परिस्थिती सांगणारे हे रॅप आपलं दुसरंच रॅप साँग असून यापूर्वीही मी रॅप बनवलं होतं. पण, ते रॅप कधी सोशल मीडियावर टाकलं नाही. हे दुसरंच रॅप सोशल मीडियावर टाकलं आणि ते व्हायरल झालं, असे रॅपर राज मुंगासे यांनी मीडियासोबत बोलताना म्हटले. तसेच, चोर आले ५० खोक्के घेऊन चोर आले.. अशा आशयचा रॅप मी बनवला होता. माझ्या रॅपमध्ये कोणाचाही उल्लेख नव्हता, तरीही माझ्याविरुद्ध एफआयआर झाला. पण, ४-५ महिलांना मिळून एकाला मारलं, त्यांविरुद्ध एफआयआर झाला नाही, असे म्हणत त्याने ठाण्यातील आणि राज्यातील घटनांकडे लक्ष वेधले. 

मी अनेक दिवसांपासून लिहतो, सामाजिक आणि राजकीय गोष्टीवर लिहतो. काल्पनिक गोष्टींवर लिहणं थोडं अवघडं असतं. पण, राजकीय आणि सामाजिक घटनांवर लिहायला धाडस लागतं, असे रॅपर राज यांनी म्हटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरलंय की नाही हाच प्रश्न आहे. कारण, लोकशाहीने लोकांना बोलण्याची मुभा दिली, पण हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, तो बंद व्हायला हवा, आम्ही जे बोलतो ते आमच्या रॅपमधून बोलतो, असे राज याने म्हटले.  

राजच्या या रॅपमध्ये त्याने '50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी' अशा शब्दांचा वापर केला होता. त्याचे हे रॅप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना(उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी शेअर केल्यानंतर राज्यभर तुफान व्हायरल झाले. मात्र, यानंतर त्याच्याविरोधात अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून राज गायब झाला होता. तो नेमका कुठंय, याची माहिती कोणलाही नव्हती. अखेर त्याला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तो माध्यमांसमोर आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याच गाडीत बसून तो मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला पोहोचला. दरम्यान, अंबादास दानवे यांची माझी खूप मदत केली, त्यांच्या वकिलांनीच माझा जामीन मंजूर केल्याचे राजने माध्यमांशी बोलताना साांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईambernathअंबरनाथShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी