शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

न घाबरता औरंगाबादच्या नाव बदलासाठी गुप्त मतदान घ्या, मग ठरवू : इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:26 IST

सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात.

औरंगाबाद:  शहराचे नाव बदल करण्याचा उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा आमच्या कॅबिनेट आणू आणि पास करू असे जाहीर केले, यातून स्पष्ट होतंय की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी होतोय. बहुसंख्य नागरिकांना शहराचे नाव बदल नकोय, न घाबरता जनमत चाचणी घेऊन गुप्त मतदान घ्यावे, असे आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी आज केले.

शहराच्या संभाजीनगर नामकरणाच्या विरोधात आज दुपारी एमआयएम मूक मोर्चा काढणार आहे. तत्पूर्वी खा. जलील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात. फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी या नावाची घोषणा केली म्हणून नाव बदलले गेले आहे. न घाबरता या नावासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे. त्यानंतर ठरावा असे आव्हान खा. जलील यांनी केले. 

आम्ही नावाच्या विरोधात आहे म्हणजे आम्ही औरंगजेबाचे भक्त आहोत असे नाही. आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो.औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. युनिस्कोच्या यादीत शहर आहे. ४०० वर्षांपूर्वी काय झाले होते ते महत्वाचे नाही. आता आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करत आहेत. मी मूक मोर्चा एक सामान्य अभिमानी औरंगाबादकर म्हणून सहभागी होणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. 

माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शहरात झालेल्या भाषणात पहिल्यांदा आम्ही शहराचा विकास करू असे जाहीर केले होते. सत्ता टिकविण्यासाठी जाताजाता त्यांनी हा निर्णय का घेतला. शहराचा विकास केला असता तर आम्ही नाव बदलायचा प्रस्ताव आणला असता. शहरवासियांना नोकऱ्या, पाणी पाहिजेत नाव बदलाची कोणाची मागणी नाही. आपल्याला प्राथमिकता ठरवावी लागेल, असेही खा. जलील यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष, संघटना यांनी लोकांचे मत लक्षात घ्यावे आणि आजच्या मोर्चात लोकशाही मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहन खा. जलील यांनी केले.  

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन