शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

न घाबरता औरंगाबादच्या नाव बदलासाठी गुप्त मतदान घ्या, मग ठरवू : इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:26 IST

सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात.

औरंगाबाद:  शहराचे नाव बदल करण्याचा उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा आमच्या कॅबिनेट आणू आणि पास करू असे जाहीर केले, यातून स्पष्ट होतंय की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी होतोय. बहुसंख्य नागरिकांना शहराचे नाव बदल नकोय, न घाबरता जनमत चाचणी घेऊन गुप्त मतदान घ्यावे, असे आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी आज केले.

शहराच्या संभाजीनगर नामकरणाच्या विरोधात आज दुपारी एमआयएम मूक मोर्चा काढणार आहे. तत्पूर्वी खा. जलील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात. फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी या नावाची घोषणा केली म्हणून नाव बदलले गेले आहे. न घाबरता या नावासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे. त्यानंतर ठरावा असे आव्हान खा. जलील यांनी केले. 

आम्ही नावाच्या विरोधात आहे म्हणजे आम्ही औरंगजेबाचे भक्त आहोत असे नाही. आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो.औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. युनिस्कोच्या यादीत शहर आहे. ४०० वर्षांपूर्वी काय झाले होते ते महत्वाचे नाही. आता आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करत आहेत. मी मूक मोर्चा एक सामान्य अभिमानी औरंगाबादकर म्हणून सहभागी होणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. 

माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शहरात झालेल्या भाषणात पहिल्यांदा आम्ही शहराचा विकास करू असे जाहीर केले होते. सत्ता टिकविण्यासाठी जाताजाता त्यांनी हा निर्णय का घेतला. शहराचा विकास केला असता तर आम्ही नाव बदलायचा प्रस्ताव आणला असता. शहरवासियांना नोकऱ्या, पाणी पाहिजेत नाव बदलाची कोणाची मागणी नाही. आपल्याला प्राथमिकता ठरवावी लागेल, असेही खा. जलील यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष, संघटना यांनी लोकांचे मत लक्षात घ्यावे आणि आजच्या मोर्चात लोकशाही मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहन खा. जलील यांनी केले.  

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन