शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

गारपीट तक्रारींची दखल घ्या

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

परभणी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन बँकांनी या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या आहेत़

परभणी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन बँकांनी या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या आहेत़येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, रोहयो, पाणीटंचाई व विकासकामांची आढावा बैठक १० जुलै रोजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस़ एस़ डुंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते़ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती़ या गारपिटीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही़ या तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी वरील आदेश दिले़ तसेच सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत शिबिरे घेऊन या कार्यक्रमास गती द्यावी, समाधान योजनेंतर्गत ग्रामस्थांना लाभ द्यावा, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन ग्रामसभा घ्याव्यात व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, त्यांचे निराकरण करावे, मतदान केंद्र व मतदान यादी बाबतच्या स्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या़ (प्रतिनिधी)टंचाईचे आराखडे तयार ठेवायावर्षी मान्सूनचे आगमन उशिराने झाल्यामुळे पाऊस लांबला आहे़ त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ अशी स्थिती निर्माण झाल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी टंचाई आराखडे तयार ठेवावेत़ टंचाई उद्भवेल अशा गावांमध्ये रोहयो कामांचे प्राधान्याने नियोजन करावे, रोहयोचे प्रलंबित हजेरीपट त्वरित तयार करावे, असे निर्देश जयस्वाल यांनी दिले़ दरम्यान, ९ जुलैअखेर ६८़४१ मिमी पाऊस झाला असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात टँकर सुरू नाहीत़ टंचाई उद्भवू शकणाऱ्या गावे व तांड्यांसाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, पाणीटंचाई भासू नये, यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़