शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आगाऊ मालमत्ता कर घ्या; पण सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:31 IST

सुखकर प्रवासासाठी सातारा, देवळाईकरांचा  मनपाकडे आग्रह

औरंगाबाद : बीड बायपासचा कोंडलेला श्वास मनपा व पोलीस यंत्रणेच्या धाडसाने मोकळा झाल्याने नागरिकांना सुखरूप प्रवासाचे गणित सुटल्याचा प्रत्यय येत आहे. सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणासाठी मालमत्ताधारक मनपाकडे पाच वर्षांचा आगाऊ कर भरण्यास तयार असल्याची भूमिका सातारा-देवळाईत परिसरातील रहिवाशांनी मांडली आहे.

बीड बायपास झाल्यापासून ते आतापर्यंत दीडशेपेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. त्यापेक्षा पुढील काळात अनेकांचे प्राण वाचविण्यासाठीचे पाऊल मनपा व पोलीस प्रशासनाने उचलल्याने त्या मृतांचे पालक व नातेवाईकांत उपेक्षेची भावना निर्माण झाली आहे. निष्पाप नागरिकांचा बळी अरुंद रस्त्यामुळे जात असेल तर रस्ता मोठा करण्यास स्थानिक नागरिकांचा देखील विरोध होताना दिसत नाही; परंतु  मालमत्ता यात व्यर्थ जाता कामा नये यासाठी काही मालमत्ताधारक संघर्ष करताना दिसत आहेत. 

सर्व्हिस रोड पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरूच राहणार

रस्त्यावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, पोलीस आयुक्त आणि मनपा प्रशासनासमोर नागरिकांनी मांडलेल्या व्यथा पाहून रेंगाळून पडलेल्या प्रश्नाचे निराकरण करण्याचे ठरले. मोजक्या मालमत्ता वगळता इतर रस्ता जागा रिकामी असून, त्यावर सर्व्हिस रोड मोकळा करण्यास कोणतीही हारकत नाही, असे लक्षात आल्याने अखेर चौथ्या दिवशीही अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा सुरूच होता.

अखेर रस्त्याचा प्रश्न मार्गी बीड बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न मनपा व पोलीस प्रशासनाने मार्गी लावल्याने  मनपाकडे आगाऊ कर भरण्यास नागरिक तयार आहेत. त्यासाठी पथक अधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे प्रा. प्रशांत अवसरमल, शोभा सुंभ, ढवलसिंग मेहेर, उमेश पटवर्धन, अनिल वाकोडे, डॉ. राजेंद्र पवार, अभयकुमार गोरे आदींसह विविध नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर