शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सातार्‍यात पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: May 31, 2014 01:14 IST

औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत

औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असून, सध्या चालू असलेल्या ६ टँकरच्या फेर्‍याही अपूर्णच होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठ दिवसांत टँकरच्या संख्येत वाढ करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे. गतवर्षी या भागात १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मनपाच्या जलवाहिनीवरून शुद्ध पाणी पुरविले जात होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन टँकर परिसरात फेर्‍या मारत असून, पाणीपुरवठ्यावर मात करण्याचा प्रयत्न अपूर्ण ठरत आहे. सातारा परिसरात शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याने त्यांना कार्यालयास दांडी मारून चार ते पाच दिवसांआड पाणी भरणे शक्य नसल्याने खाजगी टँकरच्या पाण्यावर खर्च करावा लागत आहे. एका कॉलनीतील घराला पाणी देताना १६ टँकरला तीन ते चार दिवसांचा गॅप पडत होता; परंतु यंदा शासनाकडे ग्रामपंचायतीने ठराव घेऊन फेब्रुवारीतच पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. त्या मागणीकडे अधिकार्‍यांनी सतत दुर्लक्ष करून गत महिन्यात ३ व ४ दिवसांपूर्वी ३, असे सहा टँकर सुरू केले आहेत. प्रत्येक टँकरच्या तीन फेर्‍या असा दिनक्रम ठरविण्यात आला असून, खाजगी टँकरवाले पाण्याचा उपसा करून त्याची सर्रास विक्री करतात अन् शासकीय टँकरला मात्र जेमतेम फेर्‍या मिळत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वाढीव टँकर अद्यापही देण्यात आलेले नाहीत. सातार्‍यात नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, टँकरसाठी तहसीलवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राहुल शिरसाट, नीलेश चाबुकस्वार, राहुल रगडे, विजय पैठणे, विश्वलता शिरसाट, आरती पाटील, लीना बनसोडे, आयुब शेख यांनी दिला.