शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

सातार्‍यात पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: May 31, 2014 01:14 IST

औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत

औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असून, सध्या चालू असलेल्या ६ टँकरच्या फेर्‍याही अपूर्णच होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठ दिवसांत टँकरच्या संख्येत वाढ करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे. गतवर्षी या भागात १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मनपाच्या जलवाहिनीवरून शुद्ध पाणी पुरविले जात होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन टँकर परिसरात फेर्‍या मारत असून, पाणीपुरवठ्यावर मात करण्याचा प्रयत्न अपूर्ण ठरत आहे. सातारा परिसरात शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याने त्यांना कार्यालयास दांडी मारून चार ते पाच दिवसांआड पाणी भरणे शक्य नसल्याने खाजगी टँकरच्या पाण्यावर खर्च करावा लागत आहे. एका कॉलनीतील घराला पाणी देताना १६ टँकरला तीन ते चार दिवसांचा गॅप पडत होता; परंतु यंदा शासनाकडे ग्रामपंचायतीने ठराव घेऊन फेब्रुवारीतच पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. त्या मागणीकडे अधिकार्‍यांनी सतत दुर्लक्ष करून गत महिन्यात ३ व ४ दिवसांपूर्वी ३, असे सहा टँकर सुरू केले आहेत. प्रत्येक टँकरच्या तीन फेर्‍या असा दिनक्रम ठरविण्यात आला असून, खाजगी टँकरवाले पाण्याचा उपसा करून त्याची सर्रास विक्री करतात अन् शासकीय टँकरला मात्र जेमतेम फेर्‍या मिळत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वाढीव टँकर अद्यापही देण्यात आलेले नाहीत. सातार्‍यात नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, टँकरसाठी तहसीलवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राहुल शिरसाट, नीलेश चाबुकस्वार, राहुल रगडे, विजय पैठणे, विश्वलता शिरसाट, आरती पाटील, लीना बनसोडे, आयुब शेख यांनी दिला.