शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली

By संतोष हिरेमठ | Updated: September 1, 2022 17:50 IST

औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होत असल्याची परिस्थिती आहे. शहरातील एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अवघ्या ५ दिवसांत दुपटीने वाढली आहे. सध्या शहरात ३० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाबरोबरच आता स्वाइन फ्लू नियंत्रणाचेही आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. स्वाइन फ्लूच्या संरक्षणासाठी शासनाद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींनाच ही लस दिली जात आहे.

अनेक जण काही लक्षणे आढळल्यानंतर औषधी दुकानांतून औषधी घेतात. परंतु स्वत:च्या मनाने औषधी घेता कामा नयेत. काही लक्षणे असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. काही लक्षणे असतील तर आयसोलेशनमध्ये राहिले पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSwine Flueस्वाईन फ्लू