शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

स्वाभिमानी नेता गमावला...

By admin | Updated: June 4, 2014 01:28 IST

बीड : इतरांचा विश्वास जिंकण्याची असलेली ताकद, सर्वसामान्यांपासून ते विरोधकांपर्यंतच्या मनात पे्रम असणारा लोकप्रिय नेता बीड जिल्ह्यानेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने गमावला.

बीड : स्वत:मध्ये आत्मविश्वास ठेवून इतरांचा विश्वास जिंकण्याची असलेली ताकद, सर्वसामान्यांपासून ते विरोधकांपर्यंतच्या मनात पे्रम असणारा लोकप्रिय नेता बीड जिल्ह्यानेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने गमावला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून नुकतेच पदभार स्वीकारलेले खा.गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. या निधनाची बातमी वार्‍यासारखी अवघ्या देशात पसरली. बातमी कानावर पडताच अनेकांना विश्वासच बसत नव्हता, परंतु माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातमीचा विश्वास पटल्यानंतर बीड शहरावरच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. खा. मुंडे यांच्या निधनाने सर्वत्र दुखवटा पाळला जात आहे. विरोधकांशी या निमित्ताने चर्चा केली असता, त्यांनाही अश्रू अनावर झाले होते. तरूणांचे आकर्षण... राहण्याची स्टाईल... बोलण्याची शैली... सर्वसामान्यांबद्दल असलेले प्रेम त्यामुळेच त्यांच्या मनात केलेले घर... विरोधकांमध्ये असणारे प्रेम... विरोधकांना मैत्रीपूर्ण वागणूक़.. अनेक वर्ष राजकारणाचा अभ्यास... सर्वसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता... राजकारणातील अनूभवी व्यक्तीमत्व.. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र... केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बीडचा भूमिपुत्र केंद्रात गेल्याचा अभिमान संपुर्ण बीड जिल्ह्यातील जनतेला होता. प्रत्येकाला गोपीनांथ मुंडे यांनी केंंद्रात जागा मिळविल्याने जिल्ह्यातील तमाम नागरिकांना त्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या. सर्वसामान्यांना असलेल्या अपेक्षा आपण नक्कीच पुर्ण करणार असा विश्वास असणारे मुंडे यांनी अपेक्षा भंग होतील असे वर्तन अथवा त्यांची नाराजी होईल वक्तव्य केले नाही. मात्र आता जिल्ह्यातील जनतेला असणार्‍या अपेक्षांचा भंग झाला असून या आशांवर काळाने घाला केला आहे.जिल्ह्यातील रेल्वचा प्रश्न असो की शहराच्या उड्डाणपुलापासून ते ग्रामीण भागातील रस्त्यांपर्यंतचा. ही विकास कामे वेगाने होणार असा, विश्वास जिल्ह्यातील नागरिकांना वाटत होता. त्यातच बीड जिल्ह्याच्या सुपुत्राने दिल्लीत स्थान मिळाल्याने या अपेक्षांमध्ये आणखीनच भर पडला होता. मात्र या सर्वसामान्यांच्या अपेक्षा पुर्ण होण्यासाठी आता अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, भाजपा यांच्यासह इतर राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांशी लोकमत ने संवाद साधला. यामध्ये विरोधक असो वा भाजपाचा कार्यकर्ता. प्रत्येकालाच मुंडे यांच्या निधनाचे दु:ख झाले होते. अनेक राजकारणात विरोधक परंतु वैयक्तीक पातळीवर मैत्रीपुर्ण वागणुक देणारे नेते म्हणून त्यांची खास ओळख होती. बीड जिल्ह्यानेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने एक संघर्षशाली, झुंजार लोकनेता गमावला असल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या. मागील चाळीस वर्षांपासून मी, स्व. प्रमोदराव महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले. त्यांच्यासोबत राजकारणासोबतच समाजकारणही केले. जिद्दीने व तळमळीने एक साधारण कार्यकर्ता म्हणून सर्वांनी काम केले. गोपीनाथराव मुंडे हे एक अन्यायाविरूद्ध लढणारे नेते होते. सर्व जाती- धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणार्‍या नेत्याच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला आहे. - जयसिंगराव गायकवाड पाटील, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाजाच्या विकासात मोठे योगदान आहे. समाजाच्या विकासासाठी ते रात्रंदिवस कष्ट घेत. त्यांना आता देशाची सेवा करण्याची संधी आली होती. अशातच त्यांचे निधन झाले. ही अत्यंत दु:खद घटना आहे. अशी दुर्दैवी घटना कोणाच्याही नशिबी येऊ नये. - सुरेश धस, राज्यमंत्री, महाराष्टÑ राज्य मुंडे साहेबांच्या निधनाने महाराष्टÑाचे मोठे नुकसान झाले आहे. कै. विलासराव देशमुख यांच्या नंतर मुंडेसाहेबांच्या जाण्याने मराठवाडा पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोठा धक्का बसला. त्यांच्या नेतृत्वाखाली काही काळ काम करण्याची संधी मिळाली, याचे मी भाग्य समजतो. असामान्य संघटन कौशल्य असलेला नेता गमावल्यामुळे दु:ख होत आहे. - आ. अमरसिंह पंडित, गेवराई गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नेते होते. अथक परिश्रम करून त्यांनी शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती आणली. उसतोड मजुरांना न्याय मिळवून दिला. त्यांच्याकडून महाराष्टÑाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने देशाचे नुकसान झाले आहे. -आ. विनायकराव मेटे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने धक्काच बसला. गोपीनाथ मुंडे यांना नुकतेच केंद्रात मंत्रीपद मिळाले होते. राज्यासह बीड जिल्ह्याच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. येथील शेतकरी, कष्टकरी यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी ते सदैव प्रयत्न करीत. आता त्यांच्याकडून जिल्हावासीयांना मोठया अपेक्षा होत्या. त्यांच्या जाण्यानी मोठी हानी झाली आहे. -आ. बदामराव पंडित, गेवराई गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने बीड जिल्हा पोरका झाला आहे. बीड जिल्ह्यावर सदैव त्यांनी प्रेम केले. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास त्यांना होता. यासाठी त्यांनी सत्तेत असो अथवा नसो सदैव प्रयत्न केले. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्टÑ ओक्साबोक्सी रडत आहे. असा नेता पुन्हा होणे नाही. -आ. पृथ्वीराज साठे, अंबाजोगाई महाराष्टÑाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. व्यक्तीगत पातळीवर ते माझे मार्गदर्शक होते. बिकट परिस्थितीतून मार्ग काढणे व धेयासाठी अखंड संघर्ष करणे याचे मूर्तीमंत प्रतिक म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब. -प्रा. सुरेश नवले माजी मंत्री, बीड प्रत्येक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविणारे आणि सर्व सामान्यांच्या दु:खात पाठीशी उभे राहणारे व्यक्तीमत्व म्हणून मुंडे साहेबांची ओळख होती. मुंडे हे मराठवाडा विकास आंदोलनात आपल्या सोबत राहिले. या आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला. अशा या कणखर नेतृत्वाच्या अकाली जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. - उषा दराडे, माजी आमदार गोपीनाथ मुंडे यांना रात्रंदिवस जिल्ह्याचा ध्यास होता. ‘मी जिल्ह्याचा जिल्हा माझा’ असे म्हणत ते जिल्ह्यावर पूत्रवत प्रेम करीत. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, उसतोड मजूर यांना त्यांनीच न्याय दिला. त्यांच्या अकाली जाण्याने जिल्ह्याचे छत्र हरपले आहे. -अ‍ॅड. लक्ष्मण पवार, गेवराई मुंडे साहेब हे ग्रामीण भागातील नेते होते. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे प्रश्न सुटायचे. सर्व सामान्यांना त्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या. आता या अपेक्षांचा भंग झाला आहे. - बाबूराव आडसकर, माजी आमदार एक संघर्षशील, चळवळीतील कार्यकर्ता पंचायत समितीपासून दिल्लीपर्यंत झेप घेतो याचा बीड जिल्ह्याला अभिमान आहे. असा नेता पुन्हा बीड जिल्ह्यात होणे नाही. - डी.के. देशमुख, माजी आमदार सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा स्वकर्तृत्वावर दिल्लीपर्यंत जातो. त्याचा बीड जिल्ह्याला अभिमान आहे. मात्र हा भूमिपूत्र आज गमावल्याने बीड जिल्हाच नव्हे तर अवघा महाराष्टÑ पोरका झाला आहे. - बाजीराव जगताप, माजी आमदार सर्वसामान्य माणसांचा पोशिंदा असणारे जिल्ह्याचे भूमिपूत्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्टÑाला मोठा धक्का बसला आहे. यातून सावरणे कठिण आहे. - राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांच्या निधनाने जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्टÑाची फार मोठी हानी झाली आहे. ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे. जिल्ह्याच्या विकासात मुंडे यांचे योगदान असून सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. - डॉ. भारतभूृषण क्षीरसागर न.प. गटनेते, बीड मुंडे यांच्या निधनाची बातमी खरी वाटत नाही. आमच्यासह विरोधकांना सोबत घेऊन चालण्याची ताकद असलेले छत्रच हरवले. - पांडुरंग नागरगोजे पाटोदा तालुका सरचिणीस भाजपा राजकीय संजय सांभाळत फक्त यश मिळवणारे आमचे नेतृत्व हरवले आहे. आम्ही पोरके झालो. -मधुकर गर्जे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा तळागाळातील कार्यकर्त्यालाही सन्मानाने वागणूक आणि सल्ला देणारी आमची सावली काळाने हिरावून नेली. - श्रीहरी गित्ते, पाटोदा शहराध्यक्ष, भाजपा जिल्ह्यातील मुत्सद्धी राजकारणी हरवला. ऊसतोड कामगारांपासून दिल्ली गाठणार नेतृत्व हरवलं. जिल्हा उत्तुंग नेतृत्वास पोरका झाला. - संजय नवले, पाटोदा तालुका अध्यक्ष, राकाँ नारळी सप्ताहाच्या निमित्ताने थेरल्याला आल्यानंतर अगदी वारकरी झालेले साहेब गेले यावर विश्वासच बसत नाही. जिल्ह्याचे आजात शत्रू नेतृत्व हरवले. - बाळासाहेब राख, माजी सरपंच, थेरला युवकांना घडविण्याचे कौशल्य मुंडे साहेबांमध्ये होते. मुंडे साहेबांसोबत काम करीत असताना आलेले अनुभव अविस्मरणीय आहेत. मुंडे गेल्याने आम्ही आज पोरके झालो. - विनायक मुळे, वडवणी ता. प्रमुख, शिवसेना खा. गोपीनाथ मुंडे यांनी बीडचे नाव उज्वल केले. विरोधकांनाही सोबत घेऊन काम करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. त्यांच्यामुळेच आज बीडची ओळख निर्माण झाली आहे. बीडकरांनी एक आदर्श नेता गमावला आहे. - प्रियंका डोईफोडे, रायुकाँ जिल्हाध्यक्ष संघर्षपूर्ण वातावरणात शुन्यातून विश्व उभारण्याचे काम मुंडे साहेबांनी केले. गोरगरीब शेतकर्‍यांचा, ऊसतोड मजुरांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याबद्दल आजही या लोकांमध्ये प्रेम राहील. ते एक आदर्श नेते होते. ते गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. - डॉ. दीपा क्षीरसागर, नगराध्यक्ष, न.प. बीड ओबीसींच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारा नेता आज आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने ओबीसी पोरकी झाली. ओबीसीचा आधार गेला. ते गेल्याने ओबीसीचे छत्रच हरवले आहे. - अ‍ॅड. सुभाष राऊत, समता परिषद जिल्हाध्यक्ष खा. गोपीनाथ मुंडे हे प्रामाणिक नेते होते. जिथे रहाल तेथे सुखी रहा, असे आशीर्वाद ते नेहमी आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देत होते. प्रामाणिक नेता गमावल्याने खुप दु:ख होत आहे. - अ‍ॅड. हेमा पिंपळे, राकाँ गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व आदर्शवादी होते. आमच्याशी बोलत असताना ते कधीच विरोधक म्हणून बोलले नाहीत. विरोधकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारणारा असा दिलदार नेता पुन्हा होणे नाही. - अशोक हिंगे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसह तरूण कार्यकर्त्यांवर या नेत्याचे खूप प्रेम होते. या नेत्यामुळे एखादा तरूण कार्यकर्ता उच्च पदावर जाऊ शकतो, असा विश्वास होता. तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा असा नेता पुन्हा होणे नाही. - संतोष डावकर, वडवणी शहराध्यक्ष, राकाँ कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधून त्यांचे प्रश्न सोडविणारा हा नेता होता. या नेत्याने संघर्ष करून यश मिळविले होते. मुंडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखाच आहे. हा नेता गमावल्याने तरूण कार्यकर्ते पोरके झाले. - महादेव जमाले, राकाँ, वडवणी बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्राने केंद्रीय मंत्रीपद मिळविले. संघर्ष करून यश मिळविलेल्या या नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे. हा नेता गमावल्याने बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा पोरका झाला आहे. - अ‍ॅड. राज पाटील, वडवणी तालुकाध्यक्ष, रायुकाँ खा. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडची प्रतिमा उज्वल झाली, आम्ही आंदोलन करीत असताना आमच्यामध्ये नेहमी सहभागी होत. आमच्या मागण्या पूर्ण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते गमावल्याने छत्रच हरवले आहे. - शैलेश जाधव, जिल्हाध्यक्ष मनविसे वडवणी तालुक्याची निर्मिती करण्यास खा. गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. वडवणी तालुका होईल, असा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. शब्दाला ते पक्के होते. त्यामुळेच त्यांची सर्वसामान्यांचे लोकप्रीय नेते म्हणून ओळख होती. - भारत जगताप, वडवणी राकाँ खा. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर विश्वासच बसला नाही. त्यांच्यासोबत काम करत असताना अडचणीला कसे सामोरे जावे हे आम्ही शिकलो. आम्हाला शिकवणारेच गेल्याने आम्ही उघड्यावर आलो. - अनिल जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख, बीड खा. गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा गर्व नव्हता. सर्व सामान्य नागरिकांमध्ये गेल्यानंतर त्यांच्याप्रमाणेच ते वागायचे. त्यामुळेच त्यांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात घर केले होते. ते गेल्याने सर्व सामान्य कार्यकर्ता पोरका झाला आहे. - विपुल पिंगळे, युवा सेना जिल्हा प्रमुख मुंडे साहेब वडवणी शहरात आल्यानंतर तरूण कार्यकर्त्यांशी चर्चा करून तालुक्याचा आढावा घ्यायचे. त्यांचा तरूणांवर विश्वास होता. त्यामुळेच तरूणांचे आदर्श नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते गेल्याने आमच्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांवरील छत्रच हरवले आहे. - बाबरी मुंडे, भाजयुमो, वडवणी मुंडे साहेबांसारख्या नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करायचो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यामुळेच आज आम्ही यश प्राप्त केले. ते गेल्याने जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. - अशोक करे, धारूर तालुकाध्यक्ष, भाजपा बीड जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपदाचा पहिल्यांदाच मान मिळाला. असा मान मिळविणारा नेता आज आपल्यात नसल्याने हा आनंद कोणासोबत व्यक्त करावा, असा प्रश्न पडला आहे. खरोखरच त्यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही. - शेषेराव जगताप, वडवणी राकाँ ओबीसींच्या जनगणनेचे प्रश्न मुंडे साहेबांच्या माध्यमातून निकाली लागतील. असा आशावाद ओबीसी जनतेच आहे. त्यांच्या निधनाने ओबीसींचे अनेक प्रश्न बारगळले आहेत. ओबीसींच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता परत होणार नाही. - हनुमंत उपरे, अध्यक्ष,सत्यशोधक ओबीसी परिषद महायुतीचे शिल्पकार, सर्वधर्म समभाव, ऊसतोड कामगार नेतृत्व करणारे बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र मुंडे साहेब गेल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते पोरके झाले आहेत. मुंडे साहेबांच्या माध्यमातून देशात बीडची नवी ओळख निर्माण झाली होती. - सत्यनारायण कासट, बीड जिल्हा कृषी सहायक, असो. बीड राज्यासह जिल्ह्यातील कष्टकरी शेतकर्‍यांचा बुलंद आवाज असणारे जिल्ह्याची शान गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने मराठवाड्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. - गंगाभिषण थावरे, भाजपा मुंडे साहेब हे प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान होते. त्यांची काम करण्याची शक्ती मोठी होती. त्यांच्या जाण्याने सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहतील का? असा प्रश्न पडला आहे. - डॉ.प्रकाश आनंदगावकर, माजलगाव विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते अनेक प्रश्न घेऊन मुंडेसाहेबांकडे जायचे. ते आपले प्रश्न म्हणून नेहमीच सोडवायचे. त्यांच्या जाण्याने विश्व हिंदू परिषद पोरकी झाली आहे. - प्रवीण इंगळे, विश्वहिंदू परिषद बीड विद्यार्थी नेता ते कॅबिनेट मंत्री पदापर्यंत स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण करणारा लोकनेता हरवला आहे. आणबाणीच्या काळात त्यांच्यासोबत काढलेले दिवस आता केवळ आठवण म्हणून राहिले आहेत. - डॉ. क.अ. लोढा, जनसंघ कार्यकर्ते प्रखर राष्टÑभक्ती, प्रचंड इच्छाशक्ती, सर्वसामान्यांचा विश्वास व राज्यातील जनतेचा असणारा श्वास आता केवळ आठवण म्हणून राहिला आहे. - उत्तमराव खुर्पे, जनसंघ कार्यकर्ते जिल्ह्याला प्रथमच कॅबिनेट मंत्रीपद गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून मिळाले. देशाच्या नकाशावर बीड जिल्ह्याची आगळी वेगळी ओळख निर्माण करणारी लोकनेते मुंडे यांच्या निधनाने जिल्ह्याची जनता पोरकी झाली. - अरूण राऊत, माजलगाव भाजपा तालुकाध्यक्ष मुस्लिम समाजास खंबीर साथ आणि समर्थन देणार्‍या कष्टकरी सर्व सामान्य जनतेचा पोशिंदा हरवला असल्याने मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. - खलिल पटेल, नगरसेवक माजलगाव आपण मुंडे साहेबांना सुरूवातीच्या काळापासून ओळखतो. त्यांच्यामध्ये कुठलाही गर्व नव्हता. असा सर्व सामान्य कार्यकर्ता, नेता, मंत्री पुन्हा होणे नाही. - सुमंतराव डुबे, माजी नगराध्यक्ष, धारूर गोपीनाथराव मुंडे हे स्वकर्तृत्वावर पुढे गेले़ संपूर्ण आयुष्य सत्तेबाहेर घालवूनही ते स्वाभिमानाने जगले़ केंद्रीय मंत्री झाल्यामुळे बीडचाच नाही तर महाराष्ट्राच्या विकासालाही गती आली असती़ त्यांच्या अकाली जाण्याने हजारो कार्यकर्ते पोरके झाले आहेत़ - बाबूराव पोटभरे, संस्थापक, बहुजन विकास मोर्चा गोपीनाथराव मुंडे यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले़ ते सर्वांना सोडून गेले यावर विश्वासच बसत नाही़ कार्यकर्ते घडविणारा ‘मासलिडर’ हरवल्याने ही हानी कधीच भरून न येणारी आहे़ - भगिरथ बियाणी, प्रदेश कोषाध्यक्ष,भाजयुमो़ ग्रामीण भागातील लोकांशी नाते सांगणारे गोपीनाथराव मुंडे केंद्रीय मंत्री झाल्याने जिल्हावासियांची छाती अभिमानाने फुलून आली़ त्यांच्यामुळे जिल्ह्याचे नाव झाले़ एका विकासाभिमुख नेता जिल्ह्याने गमावला आहे़ -मदनराव चव्हाण, गटनेते, जि़प़ बीड गोपीनाथराव मुंडे यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही़ ते बीडचेच नव्हे तर राज्याचे नेते होते़ संपूर्ण आयुष्य चंदनाप्रमाणे झिजविणार्‍या गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने कधीच न भरून येणारे नुकसान झाले आहे़ - शेख फारुक, शहराध्यक्ष, भाजयुमो, बीड़ बीड जिल्ह्याचा स्वाभिमानी नेता म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची ओळख होती़ ते मंत्री झाल्याने विकासाला वेग आला असता़ शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागणार होता़ त्यांच्या जाण्याने जिल्हा पोरका झाला आहे़ - राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष, शिवसंग्राम गोपीनाथराव मुंडे हे भाजपाशी कायम एकनिष्ठ राहिले़ सत्ता असो अथवा नसो तत्व जपणार्‍यांपैकी ते होते़ त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांचे संसार उभे केले़ त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे छत्र हरवले आहे़ -राहुल घोडके, उपजिल्हाप्रमुख, शिवसंग्राम जिल्ह्याच्या विकासात गोपीनाथराव मुंडे यांचा मोठा वाटा आहे़ ते केंद्रात मंत्री झाल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून निघाला असता़ स्वत:च्या कर्तृत्वाने पुढे गेलल्या गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या कार्यातून आदर्श निर्माण केला आहे़ - बालासाहेब दोडतले, जि़प़ सदस्य तथा संपर्कप्रमुख रासप गोपीनाथराव मुंडे हे केंद्रात मंत्री झाले तरीही त्यांचे पाय जमिनीवरच होते़ त्यांनी सामान्यांशी नाळ कधी तोडली नाही़ आदर्श नेता अशी प्रतिमा त्यांनी आयुष्यभर जपली़ त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे़ - उषा रमाकांत मुंडे, जि़प़ सदस्य, बीड गोपीनाथराव मुंंडे यांनी आयुष्यात कधीही खुर्चीची अपेक्षा ठेवली नाही़ इतक्या वर्षांच्या संषर्घानंतर त्यांना मंत्रीपद चालून आले होते़ त्यांचे जाणे धक्कादायक आहे़ असा कर्तृत्ववान नेता पुन्हा होणे नाही़ - सचिन कोटूळे, शिवसंग्राम, बीड गोपीनाथराव मुंडे यांनी आपले आयुष्य लोकांच्या हितासाठी चंदनाप्रमाणे झिजविले़ त्यांनी कायम इतरांचे आश्रू पुसून दु:खी -पीडितांना न्यायच देण्याचा प्रयत्न केला़ गरिबांचा कैवारी गेल्याने अनेकांचा आधार हरवला आहे़ - विष्णू देवकते, जिल्हा प्रमुख मल्हार सेना गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने एक जिद्दी नेता गमावला आहे. एक - एक पायरी चढत त्यांनी केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या जिद्दीतून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्टÑावर शोककळा पसरली आहे. - फुलचंद कराड, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे आपल्या वडीलांपासून कौटुंबिक नाते आहे. त्यांच्या अपघाती निधनाने आमच्या कुटुंबाचे पालकत्व हरवले आहे. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचा आधार गेला. राज्याचा नेता गेला. त्यामुळे आमचेच नव्हे तर जिल्ह्यातील जनतेचे छत्र हरवले. - अशोक जैन, चेअरमन वैद्यनाथ अर्बन बँक गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे ओबीसी नेतृत्व हरवले आहे. कुटुंबाचेही नुकसान झाले. सामाजिक चळवळीचा नेता महाराष्टÑाने गमावला. त्यांच्यासोबत चौदा वर्षे काम केले. माझ्याशी त्यांनी मैत्री करून आधार देण्याचा प्रयत्न केला. - प्रा.टी.पी. मुंडे, सरचिटणीस काँग्रेस गोपीनाथ मुंडे यांनी जिल्ह्यातील ऊसतोड कामगार, शेतकरी, शेतमजूर या सर्वांच्याच विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यभरात संघर्ष यात्रा काढून जनजागृती केली. त्यांच्या निधनाने महाराष्टÑाचेच नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे. - राजेंद्र बांगर, जिल्हा सरचिटणीस, भाजपा गोपीनाथराव मुंडेसाहेब हे आमचे आधारस्तंभ होते. आम्ही त्यांच्यामुळेच राजकारणात सक्रीय झालो. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला त्यांनी पक्षाचे पद देऊन जबाबदारी टाकली. त्यांनी सोपविलेली जबाबदारी आम्ही चोखपणे पार पाडली. आमचा आधारस्तंभ गमावल्याने आम्ही आता पोरके झालो. - संगीता ठोंबरे, भाजपा, केज गोपीनाथ मुंडे यांनी ज्या प्रमाणे भाजप कार्यकर्त्यांवर प्रेम केले. त्याच प्रमाणे शिवसेना कार्यकर्त्यांवरही प्रेम केले. भाजप- सेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना रात्री- अपरात्री कधीही मदतीसाठी तत्पर असत. त्यांच्या जाण्याने महायुतीसह समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. - अजय दाभाडे, तालुका प्रमुख, शिवसेना, गेवराई ग्रामीण भागातील नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेबांची ओळख होती. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे. विरोधकांशी मैत्रीपूर्ण वातावरणात राहणारे हे आदर्शवादी व्यक्तीमत्व गमावल्याने दु:ख होत आहे. - बळीराम आजबे, सरपंच, चिंचाळा गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने महायुतीचे शिल्पकार हरवले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच केंद्रात भाजपचे सत्ता आली. आता विधानसभेवरही भगवा फडकाविण्याचे त्यांचे स्वप्न होते. अशातच त्यांचे निधन झाल्याने राज्य दु:ख सागरात बुडाले आहे. - दत्तात्रय भोजगुडे शिवसेना तालुका उपप्रमुख, गेवराई गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने जिल्ह्यासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे. तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची होती. त्यांचे अकाली जाणे हे अत्यंत वेदनादायी आहे. - संभाजीराव पवळ उपसरपंच, शिरसमार्ग, ता. गेवराई बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळाली हे खरोखरच बीड जिल्ह्याचे भाग्य म्हणावे लागेल. या आदर्शवादी नेत्याचे अनेक गुण शिकण्या सारखे होते. त्यांची भाषण शैली ही कार्यकर्त्यांना आकर्षित करणारी होती. त्यांचे भाषण ऐकलेला कार्यकर्ता त्यांना कधीच विसरू शकणार नाही.त्यांच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. - प्रशांत सावंत, राकाँ, कुप्पा मुंडे साहेबांसोबत काम करत असताना अनेक अनुभव आले. त्यांच्या सोबत आलेले अनुभव विसरणे अशक्य आहे. अवघ्या काही दिवसात त्यांच्याकडून खूृप काही शिकायला मिळाले. राजकारणात त्यांच्या सारखा आदर्श नेता पुन्हा होणे नाही. - प्राचार्य सोमनाथ बडे भाजपा, चिंचवन गोपीनाथराव मुंडे हे अनाथांचे नाथ होते. त्यांच्या जाण्याने बीड जिल्हाच नव्हे तर अवघा महाराष्टÑ पोरका झाला आहे. विद्यार्थी दशेपासून ते आजतागायत विद्यार्थी, शेतकरी, जनतेसाठी संघर्ष करणारा संघर्ष यात्री आपल्यातून निघून गेला. - ओ.के. ओझा, परळी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे गोपीनाथराव मुंडे साहेब हे आधारच होते. त्यांच्या अचानक जाण्याने आधारवडच कोसळला. मुंडे यांच्या जाण्याची घटना खूप धक्कादायक आहे. रेल्वे प्रश्नी त्यांनी पुढाकार घेतला होता. - प्रकाश सामत, भाजपा नेते, परळी विकास समिती अध्यक्ष गोपीनाथराव मुंडे हे राज्याचे, देशाचे नेते होते. सर्वसामान्यांच्या मदतीला ते धावून येत. त्यांच्या अपघाताचे वृत्त ऐकून धक्काच बसला. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. - राजाभाऊ शिंदे, माजी सरपंच करेवाडी गोपीनाथराव मुंडे हे माझे शालेय मित्र होते. पाचवी ते दहावी परळीच्या जि.प. शाळेत आम्ही एकाच बाकावर बसत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपात काम केले. ते नेहमीच वर्गमित्राचा आदर करत. मुंडे यांच्या जाण्याने आम्ही आमचा वर्गमित्र हरवला आहे. - मारूती मुंडे, वर्गमित्र, राकाँ गोपीनाथराव मुंडे यांनी राजकारणात फिनिक्स पक्ष्या सारखी भरारी घेतली. घरची परिस्थिती साधारण होती. घराण्याला राजकारणाचा इतिहास नव्हता. तरी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली. शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन चार दिवस जगणे हा आमचा लहानपनीचा नारा होता. - नागनाथ बरदाळे, वर्गमित्र, परळी बीड जिल्ह्यासारख्या मागासलेल्या भागात संघर्षाच्या मुशीतून तयार झालेले हे नेतृत्व देशपातळीवर पोहचले अत्यंत तळमळ व धडपडीने सामान्य माणसाच्या जीवनात क्रांती निर्माण करण्यासाठी त्यांनी कामे केले. राजकारणात विकास व समजदारपणाची दृष्टी मुंडे यांच्या अंगी होती. असे नेतृत्व पुन्हा होणार नाही. मुंडे यांच्या निधनाने मराठवाडयाचे मोठी हानी झाली आहे. अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली. - डॉ. द्वारकादास लोहिया, मानवलोक, अंबाजोगाई गोपीनाथ मुंडे हे स्वकर्तृत्वाने मोठे झालेले नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय हानी झाली आहे. विकासाची दृष्टी व ध्यास असलेल्या या नेतृत्वाला काळाने हिरावून नेली ही मोठी हानी कधीही भरून न निघणारी आहे. विद्यार्थी दशेपासून मुंडे हे चळवळीतून फुललेले नेतृत्व आहे. एक धडपड्या विद्यार्थी म्हणून त्यांचा महाविद्यालयात लौकिक होता. ते माझे विद्यार्थी होते. आपला विद्यार्थी देशाच्या राजकारणात मोठी भूमिका निभावतो याचा मला मोठा अभिमान होता. मात्र, असे विकासाभिमुख नेतृत्व काळाने हिरावून नेले. ही हानी कधीही भरून निघणारी नाही. - प्रा. रंगनाथ तिवारी अंबाजोगाई गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व हे समाजातील अठरापगड जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व होते. समाजातील उपेक्षितांना न्याय देण्याचे काम मुंडे यांनी केले. बीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोड कामगाराच्या हातातील कोयता दूर करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. अशा या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून न निघणारी आहे. - एस. बी. सय्यद , अंबाजोगाई गोपीनाथ मुंडे यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही.ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ संघर्ष पाहिला. त्यांचे अकाली निधन दुर्दैवी आहे. - डॉ. जितेंद्र ओव्हाळ, बीड