शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

पाणीपुरवठा योजनेचा ताबा घेण्यास मनाई करणाऱ्या आदेशाला स्थगिती

By admin | Updated: October 20, 2016 01:45 IST

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊ नये, या जिल्हा न्यायालयाने लवाद कायद्याच्या कलम ९ च्या अनुषंगाने

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊ नये, या जिल्हा न्यायालयाने लवाद कायद्याच्या कलम ९ च्या अनुषंगाने मंगळवारी दिलेल्या मनाई आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे यांनी बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. लवादाच्या एका सदस्याचे नाव सुचविण्यासंदर्भात औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने लवाद कायद्याच्या कलम ११ नुसार दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या याचिकेसोबतच महापालिकेच्या वरील याचिकेची सुद्धा एकत्रित सुनावणी २१ आॅक्टोबर रोजी होणार आहे. औरंगाबाद महापालिकेने १ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द केला. महापालिकेच्या या निर्णयाविरुद्ध सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जिल्हा न्यायालयात लवाद कायद्याच्या कलम ९ नुसार महापालिकेस ताबा घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत दावा दाखल केला होता. न्यायालयाने काल महापालिकेला पाणीपुरवठा योजनेचा ताबा घेण्यास मनाई केली होती. औरंगाबाद महापालिकेने या आदेशास बुधवारी खंडपीठात आव्हान दिले. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. अनिल बजाज यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर पाणी पुरवठ्याबाबतचे प्रकरण खंडपीठात प्रलंबित आहे. यापूर्वी कंपनीने खंडपीठात याचिका दाखल केली असता खंडपीठाने कुठलाही मनाई आदेश दिला नव्हता. केवळ कंपनीची बँक गॅरंटी जप्त करूनये, असे निर्देश महापालिकेला दिले होते. जिल्हा न्यायालयाने मनाई आदेश देताना याबाबतच्या तीन ‘मापदंडा’ (पॅरामीटर्स) ऐवजी केवळ महापालिकेने सकृतदर्शनी मनाई आदेश मिळविण्यायोग्य मुद्दे (प्रायमाफेसी केस) मांडल्याचाच विचार केला. मात्र,सध्या दाव्याचा समतोल दावेदाराच्या बाजूने (बॅलन्स आॅफ कन्व्हेनियन्स) आहे काय, त्याचप्रमाणे मनाई आदेश दिला नाही, तर दावेदाराचे न भरून येणारे नुकसान (इररिपेरेबल लॉस) होईल काय या दोन महत्त्वाच्या मुद्यांचा विचार केल्याचे दिसत नाही. आपल्या युक्तिवादाच्या पुष्ट्यर्थ अ‍ॅड. बजाज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ दिला. करारातील कलम ३७.१ प्रस्तुत प्रकरणात लागू होत नाही, अशा परिस्थितीत जिल्हा न्यायालयाने दिलेला मनाई आदेश रद्द करावा, अशी विनंती त्यांनी केली, तर कंपनीतर्फे अ‍ॅड. रामेश्वर तोतला यांनी जिल्हा न्यायालयाचा आदेश योग्य असून तो रद्द करूनये, असा युक्तिवाद केला. या प्रकरणात अ‍ॅड. बजाज यांना अ‍ॅड. दीपक पडवळ, अ‍ॅड. हर्षिता मंगलाणी, अ‍ॅड. हर्षवर्धन बजाज, अ‍ॅड. नवीन रेड्डी आणि अ‍ॅड. ऋचीर वाणी यांनी सहकार्य केले.