शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

मराठवाड्यात पावसाळ्याच्या तोंडावर लहान-मोठ्या पुलांचे सर्वेक्षण, दुरुस्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 15:23 IST

मान्सूनपूर्व नियोजन : लहान-मोठ्या पुलांचे, तलावांच्या भिंती, दरवाजे दुरुस्तीची गरज

ठळक मुद्देमनपा, नपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्यांना नोटीस देण्यात यावी. नालेसफाई, ड्रेनेज, पाइपलाइन दुरुस्ती तातडीने करून धोकादायक व अनधिकृत होर्डिंग ताबडतोब काढावेत.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने मराठवाड्यातील लहान-मोठ्या पुलांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. जि.प.ने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्याकाठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षणाचे उपाय करावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती कामे पूर्ण करावीत, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी दिले. पावसाळा दोन आठवड्यांवर आलेला असताना सर्वेक्षण आणि दुरुस्ती करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

विभागीय आयुक्तालयात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. बैठकीत केंद्रेकर म्हणाले, धरणे, पाझर तलाव या ठिकाणी २४ तास देखरेख यंत्रणा ठेवा. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तत्काळ काढा. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी पात्रात पडणाऱ्या पावसाची माहिती घेत गोदावरीच्या उपनद्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवावे. बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यांनी दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन केंद्रांची स्थापना करावी. मनपा, नपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्यांना नोटीस देण्यात यावी. नालेसफाई, ड्रेनेज, पाइपलाइन दुरुस्ती तातडीने करून धोकादायक व अनधिकृत होर्डिंग ताबडतोब काढावेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व संबंधित यंत्रणेचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

विभागातील बहुतांश बंधारे नादुरुस्तपाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नद्यांवरील धरणे व बंधाऱ्यांवरील गेट सुस्थितीत असल्याबाबत तपासणी करून तसा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, विभागातील अनेक बंधाऱ्यांवर दरवाजे नादुरुस्त आहेत. या वर्षात निधी न मिळाल्यामुळे ते काम झालेले नाही. परिणामी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग इत्यादी बाबींचे संनियंत्रण करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडा