शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

शस्त्रक्रिया करायची? मग थोडं थांबा; घाई असल्यास पैसे भरून घ्या उपचार 

By संतोष हिरेमठ | Updated: December 9, 2023 14:33 IST

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना : तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया, उपचार करायची आहे, असे म्हटल्यावर ‘ थोडे थांबावे लागेल, सध्या सर्व्हर डाऊन आहे’, असे उत्तर गेल्या तीन दिवसांपासून सरकारी आणि खासगी रुग्णालयांत दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेवर कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने ‘वाट पाहा, नाहीतर पैसे भरून उपचार घ्या’ अशी स्थिती रुग्णांची झाली आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्राची आरोग्य विमा योजना आहे. ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली. यामध्ये राज्यातील २.२ कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. या योजनेशी संलग्नित रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येत आहे. प्रत्येक रुग्णालयात योजनेसाठी आरोग्यमित्र असतात. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी ताटकळावे लागत आहे.

‘ईटीआय’साठी धाडस होईना...अत्यवस्थ रुग्णाला तत्काळ उपचार मिळण्यासाठी ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’ची (ईटीआय) मदत घेतली जाते. ‘ईटीआय’ घेतल्यानंतर ७२ तासांच्या आत रुग्णाची आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात. सर्व्हर ७२ तासांनंतरही सुरु झाले नाही तर रुग्णाकडून शुल्कची आकारणी करणे त्रासदायक ठरू शकते, हा विचार करून काही रुग्णालये ‘ईटीआय’पेक्षा ऑनलाइन यंत्रणा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी ताटकळावे लागत आहे.

किती रुग्णालये संलग्नित ?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ३८ रुग्णालये एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.

घाटीत योजनेतून रोज किती रुग्णांवर उपचार?एकट्या घाटी रुग्णालयात दररोज २० ते २५ रुग्णांवर या योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि अत्यावश्यक उपचार केले जातात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी, उपचारासाठी यंत्रणा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’द्वारे (ईटीआय) अत्यवस्थ रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे घाटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

- योजनेत समाविष्ट उपचार संख्या- १,३५६- केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव उपचार-११९- राज्यातील अंगीकृत रुग्णालयांची संख्या-१,३५०

‘ईटीआय’ने मदतसर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, गंभीर रुग्णांसाठी ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’द्वारे (ईटीआय) माहिती कळवून उपचार केले जातात. लवकरच यंत्रणा सुरळीत होऊन कामकाज पूर्ववत होईल.- डाॅ. मिलिंद जोशी, जनआरोग्य योजना जिल्हा व्यवस्थापक

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद