शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शस्त्रक्रिया करायची? मग थोडं थांबा; घाई असल्यास पैसे भरून घ्या उपचार 

By संतोष हिरेमठ | Updated: December 9, 2023 14:33 IST

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना : तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया, उपचार करायची आहे, असे म्हटल्यावर ‘ थोडे थांबावे लागेल, सध्या सर्व्हर डाऊन आहे’, असे उत्तर गेल्या तीन दिवसांपासून सरकारी आणि खासगी रुग्णालयांत दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेवर कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने ‘वाट पाहा, नाहीतर पैसे भरून उपचार घ्या’ अशी स्थिती रुग्णांची झाली आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्राची आरोग्य विमा योजना आहे. ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली. यामध्ये राज्यातील २.२ कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. या योजनेशी संलग्नित रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येत आहे. प्रत्येक रुग्णालयात योजनेसाठी आरोग्यमित्र असतात. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी ताटकळावे लागत आहे.

‘ईटीआय’साठी धाडस होईना...अत्यवस्थ रुग्णाला तत्काळ उपचार मिळण्यासाठी ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’ची (ईटीआय) मदत घेतली जाते. ‘ईटीआय’ घेतल्यानंतर ७२ तासांच्या आत रुग्णाची आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात. सर्व्हर ७२ तासांनंतरही सुरु झाले नाही तर रुग्णाकडून शुल्कची आकारणी करणे त्रासदायक ठरू शकते, हा विचार करून काही रुग्णालये ‘ईटीआय’पेक्षा ऑनलाइन यंत्रणा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी ताटकळावे लागत आहे.

किती रुग्णालये संलग्नित ?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ३८ रुग्णालये एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.

घाटीत योजनेतून रोज किती रुग्णांवर उपचार?एकट्या घाटी रुग्णालयात दररोज २० ते २५ रुग्णांवर या योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि अत्यावश्यक उपचार केले जातात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी, उपचारासाठी यंत्रणा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’द्वारे (ईटीआय) अत्यवस्थ रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे घाटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

- योजनेत समाविष्ट उपचार संख्या- १,३५६- केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव उपचार-११९- राज्यातील अंगीकृत रुग्णालयांची संख्या-१,३५०

‘ईटीआय’ने मदतसर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, गंभीर रुग्णांसाठी ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’द्वारे (ईटीआय) माहिती कळवून उपचार केले जातात. लवकरच यंत्रणा सुरळीत होऊन कामकाज पूर्ववत होईल.- डाॅ. मिलिंद जोशी, जनआरोग्य योजना जिल्हा व्यवस्थापक

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद