शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सूरनाथाचा अस्त..! पं. नाथराव नेरळकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 08:53 IST

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सच्चा उपासक, सुरांचे खऱ्या अर्थाने नाथ असलेले आणि  मराठवाड्याची मूर्तिमंत श्रीमंती ठरलेले पंडित नाथराव नेरळकर यांचे रविवारी (दि.२८ मार्च) अल्पशा आजाराने निधन झाले

 औरंगाबाद : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सच्चा उपासक, सुरांचे खऱ्या अर्थाने नाथ असलेले आणि  मराठवाड्याची मूर्तिमंत श्रीमंती ठरलेले पंडित नाथराव नेरळकर यांचे रविवारी (दि.२८ मार्च) अल्पशा आजाराने निधन झाले आणि मराठवाड्याचा सूर‘नाथ’ काळाच्या पडद्याआड गेला. नाथराव या चालत्या- बोलत्या संगीत मैफलीने अशी अचानक घेतलेली भैरवी संगीत विश्वालाच चटका लावून गेली.ते ८६ वर्षांचे होते. १० ते १२ दिवसांपूर्वीच नाथराव औरंगाबाद येथील त्यांच्या घरीच पाय घसरून  पडले आणि डोक्याला मार लागला. यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. मागील दोन दिवसांपासून आवाजही क्षीण झाला होता आणि बोलणे थांबले होते. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास  त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली, असे त्यांचे चिरंजीव गायक  जयंत नेरळकर यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात मुलगा जयंत नेरळकर, अनंत नेरळकर आणि मुलगी गायिका हेमा उपासनी, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांची दाद मिळाली की गाणेही रंगायचे..नवोदितांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे ही नाथरावांची खासियत होती. बाहेरगावहून शहरात येणाऱ्या कोणत्याही दिग्गज कलावंताची नजर सगळ्यात आधी प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसलेल्या नाथरावांना शोधायची आणि त्यांना वंदन करूनच मैफलीला सुरुवात व्हायची. त्यांची दाद मिळाली  की, गाणेही  आपसूकच रंगत जायचे, असा अनेक कलावंतांचा अनुभव आहे. गुरूवाक्यम प्रमाणम... हे तत्त्व सांभाळत नाथरावांनी आयुष्यभर संगीतसाधना केली. नांदेड येथे गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीताची उपासना केली आणि आयुष्यभर सांभाळली. मराठवाड्यातील सांस्कृतिक वैभव लोप पावलेपं. नाथराव नेरळकरजींच्या निधनाने मराठवाड्यातील एक सांस्कृतिक वैभव लोप पावले आहे. मराठवाड्यातील संगीत क्षेत्राचा आधारवड हरपला. ‘लोकमत’ आणि पंडितजींचे संबंध अत्यंत स्नेहाचे, जिव्हाळ्याचे होते. ‘लोकमत’च्या वर्धापन दिनाला त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. मी लिहिलेली ‘माझी भिंत’ आवडल्याचे त्यांनी दूरध्वनीद्वारे आवर्जून सांगितले होते. गेल्याच वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि आता पंडितजी गेल्याची वार्ता कळली. खूप वाईट वाटले. पं. नाथराव नेरळकर यांनी संगीत क्षेत्राची मोठी सेवा केली. अनेक पिढ्या घडविल्या. त्यांचे शिष्य आज ठिकठिकाणी नावलौकिक प्राप्त करीत आहेत. पं. नेरळकर यांच्या निधनामुळे मराठवाड्याचा सुरेल आवाजच जणू बंद झाला. ते मराठवाड्याचे भूषणच होते. लोकमत परिवारातर्फे पंडितजींना भावपूर्ण आदरांजली.     -राजेंद्र दर्डा,     एडिटर इन चीफ,     लोकमत वृत्तपत्र समूह

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद