शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

सूरनाथाचा अस्त..! पं. नाथराव नेरळकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 08:53 IST

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सच्चा उपासक, सुरांचे खऱ्या अर्थाने नाथ असलेले आणि  मराठवाड्याची मूर्तिमंत श्रीमंती ठरलेले पंडित नाथराव नेरळकर यांचे रविवारी (दि.२८ मार्च) अल्पशा आजाराने निधन झाले

 औरंगाबाद : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सच्चा उपासक, सुरांचे खऱ्या अर्थाने नाथ असलेले आणि  मराठवाड्याची मूर्तिमंत श्रीमंती ठरलेले पंडित नाथराव नेरळकर यांचे रविवारी (दि.२८ मार्च) अल्पशा आजाराने निधन झाले आणि मराठवाड्याचा सूर‘नाथ’ काळाच्या पडद्याआड गेला. नाथराव या चालत्या- बोलत्या संगीत मैफलीने अशी अचानक घेतलेली भैरवी संगीत विश्वालाच चटका लावून गेली.ते ८६ वर्षांचे होते. १० ते १२ दिवसांपूर्वीच नाथराव औरंगाबाद येथील त्यांच्या घरीच पाय घसरून  पडले आणि डोक्याला मार लागला. यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. मागील दोन दिवसांपासून आवाजही क्षीण झाला होता आणि बोलणे थांबले होते. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास  त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली, असे त्यांचे चिरंजीव गायक  जयंत नेरळकर यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात मुलगा जयंत नेरळकर, अनंत नेरळकर आणि मुलगी गायिका हेमा उपासनी, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांची दाद मिळाली की गाणेही रंगायचे..नवोदितांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे ही नाथरावांची खासियत होती. बाहेरगावहून शहरात येणाऱ्या कोणत्याही दिग्गज कलावंताची नजर सगळ्यात आधी प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसलेल्या नाथरावांना शोधायची आणि त्यांना वंदन करूनच मैफलीला सुरुवात व्हायची. त्यांची दाद मिळाली  की, गाणेही  आपसूकच रंगत जायचे, असा अनेक कलावंतांचा अनुभव आहे. गुरूवाक्यम प्रमाणम... हे तत्त्व सांभाळत नाथरावांनी आयुष्यभर संगीतसाधना केली. नांदेड येथे गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीताची उपासना केली आणि आयुष्यभर सांभाळली. मराठवाड्यातील सांस्कृतिक वैभव लोप पावलेपं. नाथराव नेरळकरजींच्या निधनाने मराठवाड्यातील एक सांस्कृतिक वैभव लोप पावले आहे. मराठवाड्यातील संगीत क्षेत्राचा आधारवड हरपला. ‘लोकमत’ आणि पंडितजींचे संबंध अत्यंत स्नेहाचे, जिव्हाळ्याचे होते. ‘लोकमत’च्या वर्धापन दिनाला त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. मी लिहिलेली ‘माझी भिंत’ आवडल्याचे त्यांनी दूरध्वनीद्वारे आवर्जून सांगितले होते. गेल्याच वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि आता पंडितजी गेल्याची वार्ता कळली. खूप वाईट वाटले. पं. नाथराव नेरळकर यांनी संगीत क्षेत्राची मोठी सेवा केली. अनेक पिढ्या घडविल्या. त्यांचे शिष्य आज ठिकठिकाणी नावलौकिक प्राप्त करीत आहेत. पं. नेरळकर यांच्या निधनामुळे मराठवाड्याचा सुरेल आवाजच जणू बंद झाला. ते मराठवाड्याचे भूषणच होते. लोकमत परिवारातर्फे पंडितजींना भावपूर्ण आदरांजली.     -राजेंद्र दर्डा,     एडिटर इन चीफ,     लोकमत वृत्तपत्र समूह

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद