शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

संकटसमयी आधार! निधनानंतर १०३५ जणांच्या नातेवाइकांना मिळाली विम्याची रक्कम

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 19, 2024 18:04 IST

तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, सुरक्षा विमा काढला का ?

छत्रपती संभाजीनगर : निधनानंतर त्या व्यक्तीची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबाचे झालेले नुकसान कोणी पैशांत मोजू शकत नाही. मात्र, त्या कुटुंबाला त्या वेळेस काही आर्थिक मदत मिळाली तर तेवढा आधार मिळतो... ज्या लोकांनी बँकेत खाते उघडले व ज्यांनी सरकारी योजनेतील विमा रक्कम भरली त्यातील १०३५ खातेदारांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदाराला प्रत्येकी २ लाख रुपये विमा दाव्याची रक्कम मिळाली.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाकेंद्राच्या अर्थसंकल्पात २०१५-२०१६ यावर्षी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जाहीर करण्यात आली होती. याअंतर्गत १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तीचे बँकेत खाते आहे त्यांना योजनेत दरवर्षी ४३६ रुपये विम्याचा हप्ता भरावा लागतो. त्या वर्षभरात कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास २ लाखांचा विमा दाव्याची रक्कम देण्यात येते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाकेंद्र सरकारद्वारा पुरस्कृत अपघात विमा योजना आहे. २०१५ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अंदाजपत्रकात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उल्लेख केला होता. ज्यांचे बँकेत खाते आहे. त्यांचे वय १८ ते ७० वयोगट दरम्यान आहे. त्यांनी बँकेत २० रुपये वार्षिक हप्ता भरला की, विमा लागू होतो. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला २ लाखांचे अर्थसाहाय्य मिळते. अंशिक अपंगत्व आल्यास १ लाखाचे साहाय्य दिले जाते.

जिल्ह्यात काय परिस्थिती ?विमा योजनेचे नाव--- खातेदार संख्या--- वार्षिक हप्ता.... किती जणांना मिळाली विम्याची रक्कम ?१) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना--- ५५२३३६-----४३६रु---- ८९१२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना---- १०७२०२३---२०रु----१४४

अपघाती विमा घेतला आहे का ?जीवनाचे काही खरे नाही. यासाठी केंद्र सरकारच्या विमा योजनेचा आधार घेणे आवश्यक आहे. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबावर जो दु:खाचा डोंगर कोसळतो, अशावेळी आर्थिक आधार मिळावा, आपल्या कुटुंबाला कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, ही यामागील भावना आहे. यासाठी आपले ज्या बँकेत खाते आहे तिथे चौकशी करावी व या दोन योजनांत सहभागी व्हावे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद