शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

संकटसमयी आधार! निधनानंतर १०३५ जणांच्या नातेवाइकांना मिळाली विम्याची रक्कम

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 19, 2024 18:04 IST

तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, सुरक्षा विमा काढला का ?

छत्रपती संभाजीनगर : निधनानंतर त्या व्यक्तीची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबाचे झालेले नुकसान कोणी पैशांत मोजू शकत नाही. मात्र, त्या कुटुंबाला त्या वेळेस काही आर्थिक मदत मिळाली तर तेवढा आधार मिळतो... ज्या लोकांनी बँकेत खाते उघडले व ज्यांनी सरकारी योजनेतील विमा रक्कम भरली त्यातील १०३५ खातेदारांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदाराला प्रत्येकी २ लाख रुपये विमा दाव्याची रक्कम मिळाली.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाकेंद्राच्या अर्थसंकल्पात २०१५-२०१६ यावर्षी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जाहीर करण्यात आली होती. याअंतर्गत १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तीचे बँकेत खाते आहे त्यांना योजनेत दरवर्षी ४३६ रुपये विम्याचा हप्ता भरावा लागतो. त्या वर्षभरात कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास २ लाखांचा विमा दाव्याची रक्कम देण्यात येते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाकेंद्र सरकारद्वारा पुरस्कृत अपघात विमा योजना आहे. २०१५ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अंदाजपत्रकात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उल्लेख केला होता. ज्यांचे बँकेत खाते आहे. त्यांचे वय १८ ते ७० वयोगट दरम्यान आहे. त्यांनी बँकेत २० रुपये वार्षिक हप्ता भरला की, विमा लागू होतो. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला २ लाखांचे अर्थसाहाय्य मिळते. अंशिक अपंगत्व आल्यास १ लाखाचे साहाय्य दिले जाते.

जिल्ह्यात काय परिस्थिती ?विमा योजनेचे नाव--- खातेदार संख्या--- वार्षिक हप्ता.... किती जणांना मिळाली विम्याची रक्कम ?१) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना--- ५५२३३६-----४३६रु---- ८९१२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना---- १०७२०२३---२०रु----१४४

अपघाती विमा घेतला आहे का ?जीवनाचे काही खरे नाही. यासाठी केंद्र सरकारच्या विमा योजनेचा आधार घेणे आवश्यक आहे. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबावर जो दु:खाचा डोंगर कोसळतो, अशावेळी आर्थिक आधार मिळावा, आपल्या कुटुंबाला कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, ही यामागील भावना आहे. यासाठी आपले ज्या बँकेत खाते आहे तिथे चौकशी करावी व या दोन योजनांत सहभागी व्हावे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद