शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांची समितीकडून पाहणी

By admin | Updated: September 28, 2014 00:09 IST

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत बांधण्यात आलेले घरकुल व मूलभूत सुविधांच्या कामाची पाहणी शनिवारी केंद्रीय समितीच्या पथकाने केली़

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत बांधण्यात आलेले घरकुल व मूलभूत सुविधांच्या कामाची पाहणी शनिवारी केंद्रीय समितीच्या पथकाने केली़ राज्यातील इतर शहराच्या तुलनेत नांदेड शहराच्या कामाबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले़ शहरात एकूण २७ हजार ९८५ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ १३ हजार घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़ झोपडपट्टीमुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे़ मागील तीन वर्षांपासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवली जात आहे़ अनेक अडथळ्यांची मालिका पूर्ण करीत योजना उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करीत आहे़ त्यापैकी सध्या १३ हजार घरकुले बांधून पूर्ण झाले आहेत़ तर १६ हजार २१० घरकुलांना मार्कआऊट दिले आहे़ २ हजार ५० लाभार्थी स्वत: बांधकाम करत असून त्यापैकी १ हजार १५० घरे पूर्ण झाले आहेत़ या कामांची केंद्रीय पथकाकडून वेळोवेळी मूल्यमापन झाले आहे़ त्यानुसार निधीचे वाटप करण्यात आले़ ही योजना आता अंतिम टप्प्यात आहे़ उत्तर नांदेड भागातील डीपीआर १० मधील घरकुलांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी समितीचे दोन सदस्य शनिवारी नांदेडात आले होते़ तरोडा खु़ व तरोडा बु़ तसेच रामनगर, सांगवी भागातील गौतमनगर या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली़ घरकुलांच्या सुरू असलेल्या कामांची तसेच पूर्ण झालेल्या घरकुलांची पाहणी करून पथकाने समाधान व्यक्त केले़ यासंदर्भात लोकमतशी बोलताना समितीचे सदस्य मुरलीधर कृष्णन म्हणाले, राज्यात जेएनएनयुआरएम व बीाएसयुपी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात येत आहे़ नांदेड शहरातील बीएसयुपी योजनच्या घरकुलांच्या कामांची आज पाहणी करण्यात आली़ यावेळी लाभार्थ्यांनी घरकुल बांधणीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे़ घरकुलांची कामे प्रथमावस्थेत आहेत़ या कामांचा दर्जा उत्तम असून पूर्ण झालेल्या घरकुलांची स्थिती समाधानकारक आहे़ विशेषत: प्रस्तावित रचनेनुसारच घरकुलांची उभारणी करण्यात आली आहे़ परंतु लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले़ घरकुलांच्या परिसरात अस्वच्छता आढळून आली़ गौतमनगर भागातील काही इमारतीतील सुविधांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी देखभालीची गरज आहे़ त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या परिसरातील सुविधांचे रक्षण करणे गरजेचे आहे़ त्यासाठी महापालिकेच्या वतीने लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे़ यावेळी मनपाचे बीएसयुपीचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता प्रकाश कांबळे, उपअभियंता विश्वनाथ स्वामी, ठाणेदार यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)