शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सुपर! छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नवी रेल्वे, ‘जनशताब्दी’आधी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

By संतोष हिरेमठ | Updated: December 23, 2023 12:12 IST

जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : प्रस्तावित वेळापत्रक आले समाेर, रेल्वे प्रवाशांना नववर्षाची भेट

छत्रपती संभाजीनगर : मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे ६:०० वाजता नव्या रेल्वेची गरज अखेर पूर्ण होणार आहे. जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आले आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगरहून ही रेल्वे सकाळी ५:५५ वाजता मुंबईसाठी रवाना होणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन वर्षभरापासून दुर्लक्ष करीत आहे. या रेल्वेची वेळ बदलता येत नसेल तर ‘जनशताब्दी’आधी छत्रपती संभाजीनगरहून पहाटे मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू केली पाहिजे, असे आग्रही मत ९५ टक्के प्रवाशांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मांडले. यासंदर्भात ६ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने ‘जनशताब्दीच्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वे’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर ही मागणी वंदे भारत एक्स्प्रेसच्या रुपाने लवकरच पूर्णत्त्वास जाणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसची प्रस्तावित वेळ- जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : जालन्यावरून पहाटे ५:०५ वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सकाळी ५:५३ वाजता येईल आणि ५.:५५ वाजता पुढे रवाना होईल. दुपारी ११:५५ वाजा मुंबईत (सीएसएमटी) पोहोचेल.- मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेस : मुंबईहून (सीएसएमटी) दुपारी १:१० वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सायंकाळी ७:०८ येईल आणि ७:१० वाजता रवाना होईल. जालना येथे रात्री ८:३० वाजता पोहोचेल.- ही रेल्वे जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड, नाशिक, इगतपुरी, ठाणे, सीएसएमटी येथे थांबेल.

गती ताशी ६४ कि.मी.जालना ते मनमाड या १७४ कि. मी. मार्गावर रेल्वेची गती ताशी १३० कि. मी.पर्यंत वाढविण्यास मार्चमध्ये परवानगी मिळाली. या मार्गावरील विद्युतीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. प्रस्तावित वंदे भारत एक्स्प्रेसची गती ही मुंबईकडे जाताना ताशी ६४ कि. मी. आणि मुंबईहून परत येताना ५९ कि. मी. राहणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

परतीची वेळ बदलावीरेल्वे अभ्यासक स्वानंद सोळंके म्हणाले, मुंबईहून परतीच्या वेळेत ही रेल्वे दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास निघाली पाहिजे. त्यातून मुंबईत कार्यालयीन कामकाज आटोपून परत येणाऱ्यांची सोय होईल. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, वर्षअखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीMumbaiमुंबईJalanaजालना