शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सुपर! छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नवी रेल्वे, ‘जनशताब्दी’आधी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

By संतोष हिरेमठ | Updated: December 23, 2023 12:12 IST

जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : प्रस्तावित वेळापत्रक आले समाेर, रेल्वे प्रवाशांना नववर्षाची भेट

छत्रपती संभाजीनगर : मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे ६:०० वाजता नव्या रेल्वेची गरज अखेर पूर्ण होणार आहे. जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आले आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगरहून ही रेल्वे सकाळी ५:५५ वाजता मुंबईसाठी रवाना होणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन वर्षभरापासून दुर्लक्ष करीत आहे. या रेल्वेची वेळ बदलता येत नसेल तर ‘जनशताब्दी’आधी छत्रपती संभाजीनगरहून पहाटे मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू केली पाहिजे, असे आग्रही मत ९५ टक्के प्रवाशांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मांडले. यासंदर्भात ६ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने ‘जनशताब्दीच्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वे’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर ही मागणी वंदे भारत एक्स्प्रेसच्या रुपाने लवकरच पूर्णत्त्वास जाणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसची प्रस्तावित वेळ- जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : जालन्यावरून पहाटे ५:०५ वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सकाळी ५:५३ वाजता येईल आणि ५.:५५ वाजता पुढे रवाना होईल. दुपारी ११:५५ वाजा मुंबईत (सीएसएमटी) पोहोचेल.- मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेस : मुंबईहून (सीएसएमटी) दुपारी १:१० वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सायंकाळी ७:०८ येईल आणि ७:१० वाजता रवाना होईल. जालना येथे रात्री ८:३० वाजता पोहोचेल.- ही रेल्वे जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड, नाशिक, इगतपुरी, ठाणे, सीएसएमटी येथे थांबेल.

गती ताशी ६४ कि.मी.जालना ते मनमाड या १७४ कि. मी. मार्गावर रेल्वेची गती ताशी १३० कि. मी.पर्यंत वाढविण्यास मार्चमध्ये परवानगी मिळाली. या मार्गावरील विद्युतीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. प्रस्तावित वंदे भारत एक्स्प्रेसची गती ही मुंबईकडे जाताना ताशी ६४ कि. मी. आणि मुंबईहून परत येताना ५९ कि. मी. राहणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

परतीची वेळ बदलावीरेल्वे अभ्यासक स्वानंद सोळंके म्हणाले, मुंबईहून परतीच्या वेळेत ही रेल्वे दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास निघाली पाहिजे. त्यातून मुंबईत कार्यालयीन कामकाज आटोपून परत येणाऱ्यांची सोय होईल. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, वर्षअखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीMumbaiमुंबईJalanaजालना