शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

औरंगाबादेत सूर्य ओकतोय आग; उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:05 IST

उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.

ठळक मुद्दे लग्न, कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे.. रविवारी (दि.२९) औरंगाबादचा पारा ४१ अंशांवर पोहोचला.

औरंगाबाद : लग्न, कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. रविवारी (दि.२९) औरंगाबादचा पारा ४१ अंशांवर पोहोचला. हा पारा येत्या आठवडाभरात कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.

राज्यासह औरंगाबादचे तापमान मागील आठ दिवसांपासून चांगलेच तापत आहे. रविवारी या तापमानाने ४१ अंश गाठला. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. भर दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे. व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत असल्याचे रविवारी पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असतानाही नागरिकांनी घरीच बसून राहणे पसंद केले. यातच रविवारी शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र, या कार्यक्रमांकडेही रसिक, अभ्यासकांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. उन्हाच्या तडक्यातून वाचण्यासाठी मोटारसायकलस्वार डोक्यावर हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत. उन्हाचा पारा चढल्यामुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांत वीज गुल होत आहे. याचा परिणाम नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे.

वीज गुल, अनेक भागांत अंधारसूतगिरी भागातील सबस्टेशनमधील तांत्रिक दोषाने रविवारी रात्री परिसरातील अनेक भागात वीज गुल झाली. रात्री ८.१४ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री १० वाजेपर्यंतही सुरळीत झाला नव्हता. परिणामी, उकाड्याने नागरिक हैराण झाले    होते. 

नागरिक शोधताहेत थंड ठिकाणेशहरात काही कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक उन्हाचा चटका सहन केल्यानंतर थंड होण्यासाठी रसवंतीगृह, शीतपेयाची ठिकाणे शोधत आहेत. ज्याठिकाणी थंड पेयाची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या निवासांमध्येही उकाड्यामुळे एसी, पंखा, कूलरची चांगलीच मागणी वाढली आहे.

सिडको एन-२ परिसरात वीजपुरवठा खंडितशहरातील सिडको एन-२ परिसरात रविवारी सुटीच्या दिवशी तब्बल १२ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, तर आग ओकणारा सूर्य आणि घरातील गायब झालेली वीज यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागला. 

टॅग्स :Healthआरोग्यenvironmentपर्यावरणtourismपर्यटन