शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

औरंगाबादेत सूर्य ओकतोय आग; उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:05 IST

उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.

ठळक मुद्दे लग्न, कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे.. रविवारी (दि.२९) औरंगाबादचा पारा ४१ अंशांवर पोहोचला.

औरंगाबाद : लग्न, कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. रविवारी (दि.२९) औरंगाबादचा पारा ४१ अंशांवर पोहोचला. हा पारा येत्या आठवडाभरात कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.

राज्यासह औरंगाबादचे तापमान मागील आठ दिवसांपासून चांगलेच तापत आहे. रविवारी या तापमानाने ४१ अंश गाठला. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. भर दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे. व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत असल्याचे रविवारी पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असतानाही नागरिकांनी घरीच बसून राहणे पसंद केले. यातच रविवारी शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र, या कार्यक्रमांकडेही रसिक, अभ्यासकांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. उन्हाच्या तडक्यातून वाचण्यासाठी मोटारसायकलस्वार डोक्यावर हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत. उन्हाचा पारा चढल्यामुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांत वीज गुल होत आहे. याचा परिणाम नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे.

वीज गुल, अनेक भागांत अंधारसूतगिरी भागातील सबस्टेशनमधील तांत्रिक दोषाने रविवारी रात्री परिसरातील अनेक भागात वीज गुल झाली. रात्री ८.१४ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री १० वाजेपर्यंतही सुरळीत झाला नव्हता. परिणामी, उकाड्याने नागरिक हैराण झाले    होते. 

नागरिक शोधताहेत थंड ठिकाणेशहरात काही कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक उन्हाचा चटका सहन केल्यानंतर थंड होण्यासाठी रसवंतीगृह, शीतपेयाची ठिकाणे शोधत आहेत. ज्याठिकाणी थंड पेयाची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या निवासांमध्येही उकाड्यामुळे एसी, पंखा, कूलरची चांगलीच मागणी वाढली आहे.

सिडको एन-२ परिसरात वीजपुरवठा खंडितशहरातील सिडको एन-२ परिसरात रविवारी सुटीच्या दिवशी तब्बल १२ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, तर आग ओकणारा सूर्य आणि घरातील गायब झालेली वीज यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागला. 

टॅग्स :Healthआरोग्यenvironmentपर्यावरणtourismपर्यटन