शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

औरंगााबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत निष्काळजीपणाचा गाठला कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 20:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. यासाठी १८ मतदान केंद्रावर कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रातील साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी आठ वाजता बोलावण्यात आले. मात्र नियोजनाच्या आभावामुळे मतदान केंद्राकडे शेवटचा कर्मचारी रात्री आठ वाजता विद्यापीठातुन बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीतील गोंधळाची परंपरा मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहिली. प्रत्येक ठिकाणी नियोजनाचा आभाव असल्याचे दिसून आले. मतदानासाठी चार जिल्ह्यात ठरविलेल्या १८ मतदान केंद्रांवर केंद्रप्रमुख, मतदान अधिकारीसह इतर कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. हे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात दिल्यानंतर १२ वाजेच्या आत उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदान केंद्रांकडे अधिकारी रवाना होण्याची नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर कोण कोठे जाणार याचेच नियोजन केलेले नव्हते. जेव्हा कोणी कुठे जायचे असा प्रश्न उपस्थित झाला. तेथून पुढे नियोजनाची तयारी सुरु केली.

याशिवाय कर्मचा-यांना मतदान केंद्रावर कर्मचा-यांनी काय घेऊन जायचे याच्याही सुचना देण्यात आलेल्या नव्हत्या. यामुळे दुपारपर्यंत हाच गोंधळ राहिला. दुपारनंतर कर्मचाºयांना मतदानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर सायंकाळच्या वेळी कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होण्यास सुरुवात झाली. मतदान केंद्रावर पाठविला जाणारा शेवटच्या कर्मचारी रात्री आठ वाजता विद्यापीठातुन बाहेर पडल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधींचे अर्ज, ओळखपत्र केव्हा तयार करुन देणार, सिसीटीव्ही यंत्रणा केव्हा बसवणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मतपत्रिका कमी पडल्याविद्यापीठाने पुरेशा प्रमाणात मतपत्रिका छापल्याच नसल्याचे दुपारी समोर आले. यानंतर मतपत्रिका छापण्याच्या आॅर्डर देण्यात आल्या.या मतपत्रिका सायंकाळपर्यंत विद्यापीठ प्रशासनाला मिळाल्याचे समजते. यावरुन मतदानाविषयीचा निष्काळजीपणा स्पष्ट होते.

कुलगुरू दौ-यावरचकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे एका बैठकीसाठी दिल्ली दौ-यावर आहेत. नविन विद्यापीठ कायद्यानुसार पहिल्यांदाच मतदान होत असल्यामुळे कुलगुरू विद्यापीठात असणे गरजेचे आहे. यातच कुलसचिवांनी पदभार घेतला त्यास आठवडा उलटला आहे. या परिस्थितीतही कुलगुरूंनी दौºयावर आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरा ते विद्यापीठात परतल्याचे समजते.परिस्थिती अटोक्यात आहे. सर्व काही सुरळीत होईल. आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता केली आहे. कोणतीही आडचण येणार नाही.- डॉ.साधना पांडे, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी

टॅग्स :universityविद्यापीठ