शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

औरंगााबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत निष्काळजीपणाचा गाठला कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 20:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. यासाठी १८ मतदान केंद्रावर कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रातील साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी आठ वाजता बोलावण्यात आले. मात्र नियोजनाच्या आभावामुळे मतदान केंद्राकडे शेवटचा कर्मचारी रात्री आठ वाजता विद्यापीठातुन बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीतील गोंधळाची परंपरा मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहिली. प्रत्येक ठिकाणी नियोजनाचा आभाव असल्याचे दिसून आले. मतदानासाठी चार जिल्ह्यात ठरविलेल्या १८ मतदान केंद्रांवर केंद्रप्रमुख, मतदान अधिकारीसह इतर कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. हे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात दिल्यानंतर १२ वाजेच्या आत उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदान केंद्रांकडे अधिकारी रवाना होण्याची नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर कोण कोठे जाणार याचेच नियोजन केलेले नव्हते. जेव्हा कोणी कुठे जायचे असा प्रश्न उपस्थित झाला. तेथून पुढे नियोजनाची तयारी सुरु केली.

याशिवाय कर्मचा-यांना मतदान केंद्रावर कर्मचा-यांनी काय घेऊन जायचे याच्याही सुचना देण्यात आलेल्या नव्हत्या. यामुळे दुपारपर्यंत हाच गोंधळ राहिला. दुपारनंतर कर्मचाºयांना मतदानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर सायंकाळच्या वेळी कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होण्यास सुरुवात झाली. मतदान केंद्रावर पाठविला जाणारा शेवटच्या कर्मचारी रात्री आठ वाजता विद्यापीठातुन बाहेर पडल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधींचे अर्ज, ओळखपत्र केव्हा तयार करुन देणार, सिसीटीव्ही यंत्रणा केव्हा बसवणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मतपत्रिका कमी पडल्याविद्यापीठाने पुरेशा प्रमाणात मतपत्रिका छापल्याच नसल्याचे दुपारी समोर आले. यानंतर मतपत्रिका छापण्याच्या आॅर्डर देण्यात आल्या.या मतपत्रिका सायंकाळपर्यंत विद्यापीठ प्रशासनाला मिळाल्याचे समजते. यावरुन मतदानाविषयीचा निष्काळजीपणा स्पष्ट होते.

कुलगुरू दौ-यावरचकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे एका बैठकीसाठी दिल्ली दौ-यावर आहेत. नविन विद्यापीठ कायद्यानुसार पहिल्यांदाच मतदान होत असल्यामुळे कुलगुरू विद्यापीठात असणे गरजेचे आहे. यातच कुलसचिवांनी पदभार घेतला त्यास आठवडा उलटला आहे. या परिस्थितीतही कुलगुरूंनी दौºयावर आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरा ते विद्यापीठात परतल्याचे समजते.परिस्थिती अटोक्यात आहे. सर्व काही सुरळीत होईल. आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता केली आहे. कोणतीही आडचण येणार नाही.- डॉ.साधना पांडे, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी

टॅग्स :universityविद्यापीठ