शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबादेत हिवाळ्यातच उन्हाळ्याच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:50 IST

अद्याप उन्हाळा सुरू झाला नसला तरी आताच तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. येथील तब्बल २० गावांसाठी २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करून १५ गावांना पाणी पुरविण्यात येत आहे.

सुनील घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : अद्याप उन्हाळा सुरू झाला नसला तरी आताच तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. येथील तब्बल २० गावांसाठी २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करून १५ गावांना पाणी पुरविण्यात येत आहे. एक प्रकारे येथील जनतेला हिवाळ्यातच उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागत असून, कडक उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल याची चिंता प्रशासनाला असून, दुसरीकडे शासकीय टँकर सुरू करा, म्हणून गावागावांतून पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव दाखल होत आहेत.यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला असल्याने तालुक्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई गावागावांत निर्माण झाली आहे. शेतात पीक नाही, हाताला काम नाही, त्यात प्यायला पाणी नसल्याने ग्रामीण भागातील जनता हंडाभर पाण्यासाठी भटकंती करीत असून, राज्य शासनाने दुष्काळ जरी जाहीर केला असला तरी त्याची कुठलीच अंमलबजावणी सध्यातरी सुरू झाली नाही.खुलताबाद तालुक्यात ७८ गावे व ३९ ग्रामपंचायती असून, तालुक्यात जानेवारीपासूनच सर्वच गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. आजघडीला तालुक्यातील विरमगाव, देवळाणा, गदाणा- बोरवाडी, सराई, भडजी- ममनापूर, कानडगाव, कनकशीळ, इंदापूर, महंमदपूर, चिंचोली, चिंचोली शेतवस्ती, पळसवाडी, पळसवाडी वस्ती, पिंप्री, सोनखेडा, भांडेगाव, सुलतानपूर, वडगाव- झरी, गोळेगाव गल्लेबोरगाव, वडोद, माटरगाव, रसूलपुरा या २० गावांना २४ टँकरद्वारे दररोज ४५ खेपांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर आजमपूर, आखतवाडा, सालुखेडा, वडोद- माटरगाव, चिंचोली, कसाबखेडा, आखातवाडा तांडा, निरगुडी, मंबापूर, धामणगाव, ममुराबाद, पळसगाव आदींसह १५ गावे इतर वाड्या-वस्तींना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तालुक्यात गंधेश्वर प्रकल्प व अब्दुलपूर तांडा, निरगुडी परिसरातील तलावात जेमतेम पाणीसाठा असून, तालुक्यातील सर्वात मोठा असलेला गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला असल्याने गिरिजा मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खुलताबाद शहरासह तालुक्यातील २० गावे फुलंब्री तालुक्यातील ५ गावांना यावर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.गतवर्षी उन्हाळ्यात अशीच काही परिस्थिती असताना औद्योगिक क्षेत्र परिसरातील साजापूर-करोडी येथून टँकर भरून खुलताबाद शहरासहित तालुक्यात पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळीही साजापूर येथूनच पाणीपुरवठा करावा लागणार, हे जवळपास निश्चित आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात