शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबादेत हिवाळ्यातच उन्हाळ्याच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:50 IST

अद्याप उन्हाळा सुरू झाला नसला तरी आताच तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. येथील तब्बल २० गावांसाठी २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करून १५ गावांना पाणी पुरविण्यात येत आहे.

सुनील घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : अद्याप उन्हाळा सुरू झाला नसला तरी आताच तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. येथील तब्बल २० गावांसाठी २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करून १५ गावांना पाणी पुरविण्यात येत आहे. एक प्रकारे येथील जनतेला हिवाळ्यातच उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागत असून, कडक उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल याची चिंता प्रशासनाला असून, दुसरीकडे शासकीय टँकर सुरू करा, म्हणून गावागावांतून पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव दाखल होत आहेत.यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला असल्याने तालुक्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई गावागावांत निर्माण झाली आहे. शेतात पीक नाही, हाताला काम नाही, त्यात प्यायला पाणी नसल्याने ग्रामीण भागातील जनता हंडाभर पाण्यासाठी भटकंती करीत असून, राज्य शासनाने दुष्काळ जरी जाहीर केला असला तरी त्याची कुठलीच अंमलबजावणी सध्यातरी सुरू झाली नाही.खुलताबाद तालुक्यात ७८ गावे व ३९ ग्रामपंचायती असून, तालुक्यात जानेवारीपासूनच सर्वच गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. आजघडीला तालुक्यातील विरमगाव, देवळाणा, गदाणा- बोरवाडी, सराई, भडजी- ममनापूर, कानडगाव, कनकशीळ, इंदापूर, महंमदपूर, चिंचोली, चिंचोली शेतवस्ती, पळसवाडी, पळसवाडी वस्ती, पिंप्री, सोनखेडा, भांडेगाव, सुलतानपूर, वडगाव- झरी, गोळेगाव गल्लेबोरगाव, वडोद, माटरगाव, रसूलपुरा या २० गावांना २४ टँकरद्वारे दररोज ४५ खेपांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर आजमपूर, आखतवाडा, सालुखेडा, वडोद- माटरगाव, चिंचोली, कसाबखेडा, आखातवाडा तांडा, निरगुडी, मंबापूर, धामणगाव, ममुराबाद, पळसगाव आदींसह १५ गावे इतर वाड्या-वस्तींना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तालुक्यात गंधेश्वर प्रकल्प व अब्दुलपूर तांडा, निरगुडी परिसरातील तलावात जेमतेम पाणीसाठा असून, तालुक्यातील सर्वात मोठा असलेला गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला असल्याने गिरिजा मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खुलताबाद शहरासह तालुक्यातील २० गावे फुलंब्री तालुक्यातील ५ गावांना यावर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.गतवर्षी उन्हाळ्यात अशीच काही परिस्थिती असताना औद्योगिक क्षेत्र परिसरातील साजापूर-करोडी येथून टँकर भरून खुलताबाद शहरासहित तालुक्यात पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळीही साजापूर येथूनच पाणीपुरवठा करावा लागणार, हे जवळपास निश्चित आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात