शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

By admin | Updated: April 4, 2016 00:22 IST

हिंगोली : जिल्ह्यातील नागरिकांना उष्माघात व आगीपासून स्वत:चा बचाव करावा. उन्हाळ्यात दररोज तापमान वाढत असून उष्माघात होण्याची तसेच ठिकठिकाणी आग लागण्याची शक्यता असते.

हिंगोली : जिल्ह्यातील नागरिकांना उष्माघात व आगीपासून स्वत:चा बचाव करावा. उन्हाळ्यात दररोज तापमान वाढत असून उष्माघात होण्याची तसेच ठिकठिकाणी आग लागण्याची शक्यता असते. त्यास अनुसरून नागरिकांनी उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी आवाहन केले आहे.उष्माघात होवू नये म्हणून नागरिकांनी शेतीची व मजुरीची कामे जास्त वेळ उन्हात करू नयेत. जास्त कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी, उपरणे किंवा फेटा बांधावा, पांढऱ्या रंगाचे व सैलसर कपडे वापरावेत. भरपूर पाणी प्यावे, चक्कर येणे, ताप येणे, भूक न लागणे व डोके दुखणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत अशी लक्षणे दिसातच त्वरीत वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत.तसेच आग लागू नये म्हणून पेटती काढी, विडी व सिगारेट इतरत्र कोठेही टाकू नयेत. घरातील चुलीतील विस्तव स्वयंपाकानंतर पूर्णपणे विझवावा तसेच चूल अथवा शेगडीजवळ ज्वालाग्रही पदार्थ ठेवू नयेत. सिलिंडरचा रेग्युलेटर काम झाल्यानंतर बंद करावा आणि त्याची वेळोवेळी तपासणी करावी, घरातील विद्युत तारा, उपकरणे याची देखरेख व तपासणी करावी तसेच घरातील विद्युत यंत्रणेवर अधिभार होवू देवू नये, यामुळे शॉटसर्कीट होवून आग लागू शकते. आणि विद्युत डी. पी. जवळ गवत, चारा, लाकडे इत्यादी तत्सम साहित्यांची साठवण करू नये, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने नागरिकांना कळविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)