शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेचे दर भडकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:11 IST

किरकोळ विक्रीत साखर दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे.

औरंगाबाद : श्रावण महिना, सणासुदीचे दिवस सुरू असताना साखरेचे भाव अचानक वाढले आहेत. किरकोळ विक्रीत साखर दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या साखर प्रतिकिलो ३८ रुपयांना मिळत आहे. केंद्र सरकारने दीड लाख टनाने साखर कोटा कमी दिला, त्याचप्रमाणे महापुरामुळे कोल्हापूर, सांगलीऐवजी औरंगाबाद, नगर जिल्ह्यांतून राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात साखर जात आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून साखरेचे दर वाढले आहेत.

श्रावण महिना सुरू होताच एकापाठोपाठ एक अशी सणांची मालिकाच सुरू होऊन जाते. या काळात गोड पदार्थ बनविण्यासाठी साखरेला मोठी मागणी असते. साखरेच्या किमतीवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. दर महिन्याला साखर कोटा जाहीर केला जातो. जुलै महिन्यासाठी सरकारने २० लाख ५० हजार टन साखर कोटा दिला होता. आॅगस्ट महिन्यासाठी कोटा घटून १९ लाख टन कोटा देण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे जुलै महिन्यापेक्षा आॅगस्टमध्ये साखरेला जास्त मागणी असतानाही सुमारे दीड लाख टन साखर कमी देण्यात आली. यामुळे साखर कारखान्यांचे टेंडर जास्त दरात गेले. होलसेल व्यापाऱ्यांनीही साखरेचे भाव वाढविले.

महाराष्ट्रात कोल्हापूर येथील साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात राजस्थान राज्यात साखर पाठविली जाते. मात्र, कोल्हापूर, सांगली येथे महापूर आल्याने व अनेक ठिकाणी साखरेच्या गोदामापर्यंत पाणी शिरल्याने तेथून माल वाहतूक बंद होती. परिणामी, अनेक वर्षांनंतर औरंगाबाद, नगर, कोपरगाव येथील साखर कारखान्यांतील साखरेला राजस्थानमधून मागणी आली. येथून मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये साखर जात असते. आता राजस्थानमध्येही साखर जात असल्याने भाववाढीला हवा मिळाली. मागील १९ दिवसांत साखर क्विंटलमागे २५० रुपयांपर्यंत महागली. मोंढ्यात होलसेलमध्ये मंगळवारी साखर एस (लहान दाणे) ३,४५० रुपये, सुपर एस (मध्यम दाणे) ३,५६० रुपये, तर एम (जाड दाणे) ३,६४० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. यासंदर्भात जनरल किराणा मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश सेठी म्हणाले की, सध्या औरंगाबादेत जाड साखर जास्त प्रमाणात विकते. मात्र, साखर कारखान्यात जाड साखर कमी प्रमाणात तयार होत आहे. परिणामी, एम व सुपर एस साखरेच्या भावात क्विंटलमागे ११० रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. अनेक वर्षांनंतर एवढी मोठी तफावत बघण्यास मिळत आहे. कोल्हापूरमधील राजस्थानसाठी साखर पुरवठा पूर्ववत झाला नाही, तर आणखी भाववाढ होऊ शकते. किरकोळ विक्रीत किलोमागे २ रुपये भाववाढ होऊन साखर प्रतिकिलो ३८ रुपये विकली जात आहे. 

शहरात दररोज २,५०० क्विंटल साखरेची विक्री साखरेचे कमिशन एजन्ट राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, औरंगाबादेत श्रावणाला सुरुवात झाल्यापासून साखरेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात दररोज दीड हजार क्विंटल साखर विकली जात असे. सध्या दररोज २,२०० ते २,५०० क्विंटल साखर विकली जात आहे. दिवाळीपर्यंत ही मागणी वाढत जाईल.

मंगळवारी मोंढ्यात होलसेलमध्ये प्रतिक्विंटल विक्री भावसाखर एस (लहान दाणे)३,४५० रुपयेसुपर एस (मध्यम दाणे)३,५६० रुपयेएम (जाड दाणे)३,६४० रुपये

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMarketबाजारAurangabadऔरंगाबाद