शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेचे दर भडकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:11 IST

किरकोळ विक्रीत साखर दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे.

औरंगाबाद : श्रावण महिना, सणासुदीचे दिवस सुरू असताना साखरेचे भाव अचानक वाढले आहेत. किरकोळ विक्रीत साखर दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या साखर प्रतिकिलो ३८ रुपयांना मिळत आहे. केंद्र सरकारने दीड लाख टनाने साखर कोटा कमी दिला, त्याचप्रमाणे महापुरामुळे कोल्हापूर, सांगलीऐवजी औरंगाबाद, नगर जिल्ह्यांतून राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात साखर जात आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून साखरेचे दर वाढले आहेत.

श्रावण महिना सुरू होताच एकापाठोपाठ एक अशी सणांची मालिकाच सुरू होऊन जाते. या काळात गोड पदार्थ बनविण्यासाठी साखरेला मोठी मागणी असते. साखरेच्या किमतीवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. दर महिन्याला साखर कोटा जाहीर केला जातो. जुलै महिन्यासाठी सरकारने २० लाख ५० हजार टन साखर कोटा दिला होता. आॅगस्ट महिन्यासाठी कोटा घटून १९ लाख टन कोटा देण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे जुलै महिन्यापेक्षा आॅगस्टमध्ये साखरेला जास्त मागणी असतानाही सुमारे दीड लाख टन साखर कमी देण्यात आली. यामुळे साखर कारखान्यांचे टेंडर जास्त दरात गेले. होलसेल व्यापाऱ्यांनीही साखरेचे भाव वाढविले.

महाराष्ट्रात कोल्हापूर येथील साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात राजस्थान राज्यात साखर पाठविली जाते. मात्र, कोल्हापूर, सांगली येथे महापूर आल्याने व अनेक ठिकाणी साखरेच्या गोदामापर्यंत पाणी शिरल्याने तेथून माल वाहतूक बंद होती. परिणामी, अनेक वर्षांनंतर औरंगाबाद, नगर, कोपरगाव येथील साखर कारखान्यांतील साखरेला राजस्थानमधून मागणी आली. येथून मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये साखर जात असते. आता राजस्थानमध्येही साखर जात असल्याने भाववाढीला हवा मिळाली. मागील १९ दिवसांत साखर क्विंटलमागे २५० रुपयांपर्यंत महागली. मोंढ्यात होलसेलमध्ये मंगळवारी साखर एस (लहान दाणे) ३,४५० रुपये, सुपर एस (मध्यम दाणे) ३,५६० रुपये, तर एम (जाड दाणे) ३,६४० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. यासंदर्भात जनरल किराणा मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश सेठी म्हणाले की, सध्या औरंगाबादेत जाड साखर जास्त प्रमाणात विकते. मात्र, साखर कारखान्यात जाड साखर कमी प्रमाणात तयार होत आहे. परिणामी, एम व सुपर एस साखरेच्या भावात क्विंटलमागे ११० रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. अनेक वर्षांनंतर एवढी मोठी तफावत बघण्यास मिळत आहे. कोल्हापूरमधील राजस्थानसाठी साखर पुरवठा पूर्ववत झाला नाही, तर आणखी भाववाढ होऊ शकते. किरकोळ विक्रीत किलोमागे २ रुपये भाववाढ होऊन साखर प्रतिकिलो ३८ रुपये विकली जात आहे. 

शहरात दररोज २,५०० क्विंटल साखरेची विक्री साखरेचे कमिशन एजन्ट राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, औरंगाबादेत श्रावणाला सुरुवात झाल्यापासून साखरेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात दररोज दीड हजार क्विंटल साखर विकली जात असे. सध्या दररोज २,२०० ते २,५०० क्विंटल साखर विकली जात आहे. दिवाळीपर्यंत ही मागणी वाढत जाईल.

मंगळवारी मोंढ्यात होलसेलमध्ये प्रतिक्विंटल विक्री भावसाखर एस (लहान दाणे)३,४५० रुपयेसुपर एस (मध्यम दाणे)३,५६० रुपयेएम (जाड दाणे)३,६४० रुपये

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMarketबाजारAurangabadऔरंगाबाद