शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

साखर महागली; पण एक रुपयाने !

By admin | Updated: June 25, 2014 01:29 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ केल्याने साखर पाच रुपयाने महागणार अशा बातम्या झळकल्या.

औरंगाबाद : केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ केल्याने साखर पाच रुपयाने महागणार अशा बातम्या झळकल्या. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सट्टेबाज, साठेबाजांनी बाजारात गर्दी केली. औरंगाबादेत दिवसभरात हजार ते बाराशे क्ंिवटल साखरेचा खप होतो. तो मंगळवारी अडीच हजार क्ंिवटलवर गेल्याने साखर एक रूपयाने वधारली. मोदी सरकारने सोमवारी साखरेचे आयात शुल्क १५ टक्क्यांऐवजी ४० टक्के केले. यामुळे किलोमागे ४ ते ५ रुपयांनी साखर महाग होईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे आधीच साखरेचा साठा करून ठेवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी मंगळवारी दिवसभर मोंढ्यात गर्दी केली. एक विक्रेता एक किंवा दोन पोती साखर खरेदी करीत होता, तेथे त्याने चार ते पाच पोती साखर खरेदी केली. अचानक मागणी वाढल्याने साखर क्विंटलमागे १०० रुपयांनी अर्थात प्रतिकिलोमागे १ रुपयांनी महागली. यासंदर्भात कमिशन एजंट राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, देशातच साखरेचे उत्पादन अधिक असल्याने साखरेची आयात कमी प्रमाणात होते. यामुळे साखरेवर आयात शुल्क वाढविल्याने साखरेच्या भावात फरक पडला नाही; पण साखरेचे भाव कडाडतील, या बातम्यांमुळे मार्केटमधील सट्टेबाज सक्रिय झाले. कारखान्यांमधील साखर उचलून ५० रुपये जास्त भावात विक्री करणे सुरू केले. यामुळे बाजारात तेजी आली. साठेबाज पुन्हा सक्रियठोक विक्रेता अनिल सेठी म्हणाले की, पावसाने दडी मारल्याने साखरेला अपेक्षित मागणी नव्हती. शहरात दररोज हजार ते दीड हजार क्विंटल साखर विक्री होते. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांनी मोंढ्यात साखर खरेदीसाठी गर्दी केली. जालन्यातील ठोक व्यापारी संजय लोहाडे यांनी सांगितले की, नवीन केंद्र शासन साठेबाजांविरोधात कडक कारवाई करील, या भीतीने साठेबाजांनी साखरेचा साठा कमी केला होता; पण भाववाढीच्या बातम्यांमुळे ते पुन्हा सक्रिय झाले. भाव किती? (प्रतिक्विंटल)४साखर एस.(बारीक)- ३१०० रुपये४सुपर एस. (मध्यम )- ३२०० रुपये४साखर एम. (जाड) - ३३०० रुपये