शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यात एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचे अचानक झाले मूल्यमापन; २० टक्के कर्मचारी घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:49 IST

२२०० कर्मचाऱ्यांच्या कामाचे झाले मूल्यमापन

- राजेंद्र बेलकर

करमाड ( औरंगाबाद ) : महाराष्ट्र राज्यात एड्स निर्मूलनाचे तब्बल २० वर्षांपासून काम करणाऱ्या २२०० कर्मचाऱ्यांच्या कामाचे आता अचानक मूल्यमापन करून त्यातील ८० टक्के कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

एड्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनपुरस्कृत राष्ट्रीय एड्स नियंत्रणाचे काम २० वर्षांपासून सुरू आहे. यासाठी राज्यात २२०० कर्मचारी उपचार व समुपदेशन करीत आहेत. त्यांना कधी मानधनावर, तर कधी कंत्राटी कामगार म्हणून काम करून एड्स नियंत्रणाला मोठा हातभार लावला आहे. त्यातच या विभागाच्या प्रकल्प संचालक पदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी नुकतीच स्वीकारली आहेत. त्यानंतर ६० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही जून २०१९ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यानंतर मुदतवाढ मिळेल की नाही, याबाबतही साशंकता आहे.

सध्या एड्स नियंत्रणाचा चौथा टप्पा राज्यात सुरू आहे. लवकरच पाचवा टप्पा सुरू होणार आहे. या कार्यक्रमास केंद्र सरकार १०० टक्के अनुदान देते. तसेच राज्यात २८०० पदे मंजूर आहेत. तरीसुद्धा आजपर्यंत २३०० पदे भरली आहेत. या कर्मचाऱ्यांचे दरवर्षी मार्चमध्ये मूल्यमापन करूनच त्यांना मुदतवाढ दिली जाते. त्यासाठी गुणांची मर्यादा ७० टक्के होती. यंदा प्रथमच ती ९० टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे ८० टक्के कर्मचाऱ्यांना याची झळ बसली व त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ सहन करावी लागली. याबाबत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्याशी संपर्क साधला असता यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.  

या विभागाचा रुग्णांना दिलासाराज्यात एड्स नियंत्रण करण्यासाठी २० वर्षांपासून हा विभाग ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे एड्स, क्षयरोग, गरोदर माता, किरकोळ शस्त्रक्रिया व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया यासाठी या विभागाचे योगदान मोठे आहे.रुग्णांच्या याठिकाणी विविध प्रकारच्या चाचण्या नि:शुल्क केल्या जातात. या विभागाचे खाजगीकरण झाल्यास रुग्णांची गैरसोय होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल