शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विद्यापीठ प्रशासनाला शैक्षणिक,आर्थिक शिस्त आणण्यास यशस्वी ठरलो: प्रमोद येवले 

By राम शिनगारे | Updated: December 1, 2023 19:39 IST

विद्यापरिषदेत कुलगुरू, प्र-कुलगुरू व अधिष्ठातांच्या अभिनंदनाचा ठराव

छत्रपती संभाजीनगर : चाळीस वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील चार वर्षे कुलगुरू पदाचा कार्यकाळ अत्यंत आव्हानात्मक व संस्मरणीय ठरला. सर्व अधिकार मंडळ, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व मराठवाड्याच्या जनतेने सहकार्य केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला शैक्षणिक व आर्थिक शिस्त आणण्यास यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले केले.

कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषदेची शेवटची बैठक गुरुवारी पार पडली. त्यात कुलगुरूंसह प्र-कुलगुरू, चार अधिष्ठातांच्या अभिनंदनाच्या ठरावास मान्यता दिली. त्यानंतर कुलगुरू बोलत होते.

बैठकीत अखेरच्या सत्रात पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. बी. एन. डोळे यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विद्यापीठाला योग्य दिशा देण्याचे काम कुलगुरूंनी केले असून, त्यांची कारकिर्द संस्मरणात राहील, असे डॉ. डोळे म्हणाले. तर प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव यांनी कुलगुरूंसह प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

यावेळी डॉ. आघाव म्हणाले, विद्यापीठ व संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षकांना आपल्या हक्क व कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम कुलगुरूंनी केले. तसेच ‘नवीन शैक्षणिक धोरणा’ची प्रभावी अंमलबजावणी करून काही महाविद्यालयांच्या बेशिस्तीला लगाम घातल्याचेही डॉ. आघाव यांनी सांगितले.

आर्थिक शिस्तीसाठी कडक भूमिकासत्काराला उत्तर देताना कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, गेल्या चार वर्षांत या विद्यापीठात अनेक दिशादर्शक निर्णय घेतले. विद्यापीठाला आर्थिक शिस्त आणण्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागली. या काळात विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयावर राज्य, राष्ट्रीय पातळीवर आणि युजीसीनेही शिक्कामोर्तब केले. विद्यापीठाला नावलौकिक मिळवून देतानाच लोकांच्या भावनाही मिळवू शकलो, असेही कुलगुरू डॉ. येवले म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण