शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्यार्थ्यांनो आधी अभ्यास करा मग शिवलिंगावर एक लोटा जल वाहा: पंडित प्रदीप मिश्रा 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 5, 2023 19:40 IST

'' विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर त्यांनी आधी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, त्यानंतर शिवलिंगावर तांब्याभर पाणी वाहावे. ''

छत्रपती संभाजीनगर : ‘‘जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर म्हणजे ‘भगवान शिवलिंगावर एक तांब्या पाणी चढवा,’ असे मी भाविकांना सांगत असतो. कारण यात विज्ञान दडलेले आहे. अर्थात विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर त्यांनी आधी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, त्यानंतर शिवलिंगावर तांब्याभर पाणी वाहावे. त्यामुळे तुमच्यात सकारात्मक उर्जा निर्माण होईल, तुम्ही केलेला अभ्यास व वाढलेला आत्मविश्वास यामुळे परीक्षेत यशस्वी व्हाल,’’ असे प्रेरणादायी आवाहन पं. प्रदीप मिश्रा यांनी केले.

रविवारी सायंकाळी पं. मिश्रा यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी मनमोकळा संवाद साधला. मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही, असे पंडितजींनी स्पष्ट केले. जे महाशिवपुराणात लिहिले आहे तेच मी सांगतो. ते सर्व विज्ञानावरच आधारित आहे. शिवलिंगात एक चेतना, उर्जा असते. तुम्ही तांब्याचा गडू असतो तो भरून पाणी त्या शिवलिंगाला अर्पण केल्यावर तांब्या शिवलिंगातील उर्जा खेचून घेतो. त्या तांब्यातील पाणी आपण प्यायल्यास त्या उर्जेने शरीरात चेतना निर्माण होते. कोणाला नोकरी लागत नाही याचा अर्थ असा नाही की, त्याने काही प्रयत्न करायचे नाहीत. त्या व्यक्तीने विविध कार्यालयांत, कंपनीत जाऊन मुलाखती द्याव्यात, सोबतच शिवलिंगावर एक तांब्या पाणी अर्पण करावे. कर्म व अध्यात्म जेव्हा सोबत येतात, तेव्हा यश हमखास मिळते, असेही पं. मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की, यापूर्वी छत्रपती संभाजीनगरात दोनवेळा आलो. आधी पैठणमध्ये व नंतर मारवाडी महिला संघटनेच्या कार्यक्रमात येथे येऊन गेलो. ही आता तिसरी वेळ आहे. येथील लोक दानशूर आहेत. ते समाजकार्यात, धार्मिक कार्यात, मानवी सेवेत झोकून देतात, असे म्हणत त्यांनी शहरवासीयांचे कौतुक केले. यावेळी आ. प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल उपस्थित होते.

नेपाळमध्ये रुद्राक्षांच्या बागापं. मिश्रा यांनी सांगितले की, आपल्याकडे सोयाबीन, गव्हाची शेती केली जाते. तशीच नेपाळमध्ये रुद्राक्षांची शेती केली जाते. तिथे रुद्राक्षांचे ‘वन’ आहे. तिथून आम्ही रुद्राक्ष मागवत असतो. त्यावर सिहोरमध्ये प्रक्रिया करून ते भाविकांना मोफत वाटत असतो. त्यात कृत्रिम रुद्राक्ष नसतात, असे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक