शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

पोलीस भरतीच्या जागा वाढविण्यासाठी औरंगाबादमध्ये निघाला विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:20 IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या बेरोजगार युवाकांनी विराट मोर्चा काढल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनीही मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले.

ठळक मुद्देपोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चा आज सकाळी काढला.

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या बेरोजगार युवाकांनी विराट मोर्चा काढल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनीही मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले. या मोर्चाचे आयोजन पोलीस भरती विद्यार्थी कृती समिती आणि पोलीस फॅमिली वेलफेअर असोशिएशनतर्फे केले होते.

पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चा आज सकाळी काढला. या सुरूवातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे विभागीय आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात आला. यात पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो युवकांनी उत्सर्फुतपणे सहभाग नोंदवला.  शेवटी विभागीय आयुक्तांना मागण्याचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला. या निवेदनावर पोलीस फॅमिली वेलफेअर असोशिएशनचे दिपक गोफणे, पोलीस भरती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष विनायक भानुसे पाटील, उपाध्यक्ष सिद्धार्थ भालेराव, सचिव मोहम्मद हुसेन शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. मोर्चे करण्याच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे संंघटनेचे अध्यक्ष विनायक भानुसे पाटील यांनी सांगितले.

या आहेत प्रमुख मागण्या- महाराष्ट्रात  २०१८ मध्ये एकुण ३० हजार पोलीसांची भरती करावी. कारण २०१४,१५,१६,१७ मध्ये अनुक्रमे ८,७,७ व ६ हजार ५०० एवढ्याचा जागा भरती केली. - खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा  २८ वरून  ३० करण्यात यावे. - राज्यात पोलीस भरतीची एकदाच लेखी परीक्षा घ्यावी, कारण एक मुलगा अनेक जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रियेत परीक्षा देतो व ऐका पेक्षा अधिक ठिकाणी पात्रही होतो. मात्र रूजू कोणत्याही एकाच जिल्ह्यात होतो. इतर पात्र ठिकाणची त्याची जागा रिक्त राहते.- पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेचा पॅर्टन आणि काठिण्यपातळी एकसारखी असावी.- पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यापासून  प्रत्यक्ष पोलीस भरतीची मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू करण्याचा कालावधी ३ महिने  असावा.- भरतीत डमी उमेदवार टाळण्यासाठी  सर्वच ठिकाणी बायोमॅट्रीक पद्धतीचा वापर करावा.-भरती प्रक्रिया राबवत असताना एका दिवशी ५०० विद्यार्थ्यांचीच मैदानी चाचणी घेण्यात यावी.- पोलीस पाल्यांना देण्यात येणार्‍या आरक्षणात वाढ करून १० टक्के करावे.- पोलीस कुटुंब आरोग्य योजना पोलीस कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर देखील देण्यात यावी.-पोलीस कर्मचार्‍यांना  ८ तासांचीच ड्युटी असावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसStudentविद्यार्थी