शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पोलीस भरतीच्या जागा वाढविण्यासाठी औरंगाबादमध्ये निघाला विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:20 IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या बेरोजगार युवाकांनी विराट मोर्चा काढल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनीही मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले.

ठळक मुद्देपोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चा आज सकाळी काढला.

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या बेरोजगार युवाकांनी विराट मोर्चा काढल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनीही मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले. या मोर्चाचे आयोजन पोलीस भरती विद्यार्थी कृती समिती आणि पोलीस फॅमिली वेलफेअर असोशिएशनतर्फे केले होते.

पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चा आज सकाळी काढला. या सुरूवातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे विभागीय आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात आला. यात पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो युवकांनी उत्सर्फुतपणे सहभाग नोंदवला.  शेवटी विभागीय आयुक्तांना मागण्याचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला. या निवेदनावर पोलीस फॅमिली वेलफेअर असोशिएशनचे दिपक गोफणे, पोलीस भरती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष विनायक भानुसे पाटील, उपाध्यक्ष सिद्धार्थ भालेराव, सचिव मोहम्मद हुसेन शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. मोर्चे करण्याच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे संंघटनेचे अध्यक्ष विनायक भानुसे पाटील यांनी सांगितले.

या आहेत प्रमुख मागण्या- महाराष्ट्रात  २०१८ मध्ये एकुण ३० हजार पोलीसांची भरती करावी. कारण २०१४,१५,१६,१७ मध्ये अनुक्रमे ८,७,७ व ६ हजार ५०० एवढ्याचा जागा भरती केली. - खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा  २८ वरून  ३० करण्यात यावे. - राज्यात पोलीस भरतीची एकदाच लेखी परीक्षा घ्यावी, कारण एक मुलगा अनेक जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रियेत परीक्षा देतो व ऐका पेक्षा अधिक ठिकाणी पात्रही होतो. मात्र रूजू कोणत्याही एकाच जिल्ह्यात होतो. इतर पात्र ठिकाणची त्याची जागा रिक्त राहते.- पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेचा पॅर्टन आणि काठिण्यपातळी एकसारखी असावी.- पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यापासून  प्रत्यक्ष पोलीस भरतीची मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू करण्याचा कालावधी ३ महिने  असावा.- भरतीत डमी उमेदवार टाळण्यासाठी  सर्वच ठिकाणी बायोमॅट्रीक पद्धतीचा वापर करावा.-भरती प्रक्रिया राबवत असताना एका दिवशी ५०० विद्यार्थ्यांचीच मैदानी चाचणी घेण्यात यावी.- पोलीस पाल्यांना देण्यात येणार्‍या आरक्षणात वाढ करून १० टक्के करावे.- पोलीस कुटुंब आरोग्य योजना पोलीस कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर देखील देण्यात यावी.-पोलीस कर्मचार्‍यांना  ८ तासांचीच ड्युटी असावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसStudentविद्यार्थी