शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
4
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
5
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
6
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
7
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
8
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
9
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
10
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
11
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
12
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
13
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
14
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
15
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
16
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
17
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
18
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
19
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
20
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका मिळणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 19:02 IST

काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 

ठळक मुद्दे उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने जाहीर केला आहे.

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील केज येथील गटसाधन केंद्रात जमा केलेल्या उत्तरपत्रिकाच मध्यरात्री जळाल्या होत्या. उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने जाहीर केला आहे. मात्र यातील काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 

केज येथील गटसाधन केंद्रात जमा होणाऱ्या दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तात्काळ टपालाद्वारे पाठविण्यात येत होत्या. मात्र ३ मार्च रोजी झालेल्या पेपरच्या दिवशी शनिवार असल्यामुळे टपाल कार्यालय बंद होते. यामुळे उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या. या दिवशी बारावीचा गणित, दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल विषयांचे पेपर होते.

या विषयांच्या उत्तरपत्रिका ४ मार्च रोजी म्हणजेच रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत बारावीच्या १ हजार १९९ आणि दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून कोळसा झाला. विभागीय मंडळाने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा मंडळाने नियमानुसार उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. इतर विषयांना जेवढे सरासरी गुण मिळाले. तेवढेच गुण या विषयातही बहाल करण्यात आले. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीची मागणी करण्याचा अधिकार आहे.

या जळालेल्या उत्तरपत्रिकांमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची मागणी मंडळाकडे केली आहे. पण उत्तरपत्रिकाच जळालेल्या असल्यामुळे त्या कोठून देणार? असा सवाल उपस्थित झाला. यावर विभागीय सचिवांनी राज्य मंडळाकडून मार्गदर्शन मागविले होते. राज्य मंडळाने विद्यार्थ्यांनाच सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती समजावून सांगा, असा सल्ला दिला आहे.  त्यानुसार आता या प्रकरणातील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाच नाहीत, असे समजावून सांगण्यात येणार असल्याचेही सुगता पुन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाSSC Results 2018दहावी निकाल २०१८Studentविद्यार्थी