शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

बीडच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका मिळणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 19:02 IST

काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 

ठळक मुद्दे उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने जाहीर केला आहे.

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील केज येथील गटसाधन केंद्रात जमा केलेल्या उत्तरपत्रिकाच मध्यरात्री जळाल्या होत्या. उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने जाहीर केला आहे. मात्र यातील काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 

केज येथील गटसाधन केंद्रात जमा होणाऱ्या दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तात्काळ टपालाद्वारे पाठविण्यात येत होत्या. मात्र ३ मार्च रोजी झालेल्या पेपरच्या दिवशी शनिवार असल्यामुळे टपाल कार्यालय बंद होते. यामुळे उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या. या दिवशी बारावीचा गणित, दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल विषयांचे पेपर होते.

या विषयांच्या उत्तरपत्रिका ४ मार्च रोजी म्हणजेच रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत बारावीच्या १ हजार १९९ आणि दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून कोळसा झाला. विभागीय मंडळाने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा मंडळाने नियमानुसार उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. इतर विषयांना जेवढे सरासरी गुण मिळाले. तेवढेच गुण या विषयातही बहाल करण्यात आले. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीची मागणी करण्याचा अधिकार आहे.

या जळालेल्या उत्तरपत्रिकांमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची मागणी मंडळाकडे केली आहे. पण उत्तरपत्रिकाच जळालेल्या असल्यामुळे त्या कोठून देणार? असा सवाल उपस्थित झाला. यावर विभागीय सचिवांनी राज्य मंडळाकडून मार्गदर्शन मागविले होते. राज्य मंडळाने विद्यार्थ्यांनाच सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती समजावून सांगा, असा सल्ला दिला आहे.  त्यानुसार आता या प्रकरणातील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाच नाहीत, असे समजावून सांगण्यात येणार असल्याचेही सुगता पुन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाSSC Results 2018दहावी निकाल २०१८Studentविद्यार्थी