शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

बीडच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका मिळणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 19:02 IST

काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 

ठळक मुद्दे उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने जाहीर केला आहे.

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील केज येथील गटसाधन केंद्रात जमा केलेल्या उत्तरपत्रिकाच मध्यरात्री जळाल्या होत्या. उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने जाहीर केला आहे. मात्र यातील काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 

केज येथील गटसाधन केंद्रात जमा होणाऱ्या दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तात्काळ टपालाद्वारे पाठविण्यात येत होत्या. मात्र ३ मार्च रोजी झालेल्या पेपरच्या दिवशी शनिवार असल्यामुळे टपाल कार्यालय बंद होते. यामुळे उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या. या दिवशी बारावीचा गणित, दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल विषयांचे पेपर होते.

या विषयांच्या उत्तरपत्रिका ४ मार्च रोजी म्हणजेच रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत बारावीच्या १ हजार १९९ आणि दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून कोळसा झाला. विभागीय मंडळाने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा मंडळाने नियमानुसार उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. इतर विषयांना जेवढे सरासरी गुण मिळाले. तेवढेच गुण या विषयातही बहाल करण्यात आले. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीची मागणी करण्याचा अधिकार आहे.

या जळालेल्या उत्तरपत्रिकांमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची मागणी मंडळाकडे केली आहे. पण उत्तरपत्रिकाच जळालेल्या असल्यामुळे त्या कोठून देणार? असा सवाल उपस्थित झाला. यावर विभागीय सचिवांनी राज्य मंडळाकडून मार्गदर्शन मागविले होते. राज्य मंडळाने विद्यार्थ्यांनाच सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती समजावून सांगा, असा सल्ला दिला आहे.  त्यानुसार आता या प्रकरणातील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाच नाहीत, असे समजावून सांगण्यात येणार असल्याचेही सुगता पुन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाSSC Results 2018दहावी निकाल २०१८Studentविद्यार्थी