शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर

By admin | Updated: July 1, 2017 00:39 IST

जालना : शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा, बस व अन्य वाहनांमधून वाहतूक करताना राज्य शासनाने विशिष्ट नियमावली तयार केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा, बस व अन्य वाहनांमधून वाहतूक करताना राज्य शासनाने विशिष्ट नियमावली तयार केली आहे. मात्र, जालना शहरासह जिल्ह्यात हे नियम धाब्यावर बसवून, विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे यातील अनेक वाहने भंगार झाली असून नियमित तपासणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र लोकमतने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघाताच्या घटनांनंतर २०११ मध्ये विद्यार्थी वाहतुकीचे स्वतंत्र धोरण राज्यशासनाने तयार केले. त्यानुसार विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन पंधरा वर्षांपेक्षा जुने नसावे मात्र, हाच नियम डावलून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीतून बाद झालेल्या जुन्या वाहनांना रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यात दोनशे पिवळ्या बसेस व शेकडो रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. शालेय बस नियमावलीमध्ये बससह नवी ओमनी व इको या व्हॅन, टाटा मॅजिक या वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अनेकांकडून गैरफायदा घेतला जात असून ग्रामीण भागात अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेण्यासाठी संबंधित शाळेशी वाहतूकदाराला करार करावा लागतो. मात्र, अनेक शाळा याबाबत उत्सुक नसल्याने विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक वाढली आहे. आरटीओकडून वेळोवेळी शालेय विद्यार्थी वाहतुकीची तपासणी करणे गरजेचे असतानाही जालन्यात हे काम केवळ कागदोपत्रीच सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जुनाट, धूर ओकणाऱ्या रिक्षांमधून १० ते १५ विद्यार्थी कोंडल्याप्रमाणे बसविण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग दरम्यान दिसून आले. काही शाळांची वाहतूक व्यवस्था नियमानुसार आहे. मात्र, विद्यार्थी शाळेच्या आवारात आल्यानंतरच शाळा त्याची जबाबदारी घेईल, अशी भूमिका असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणारे वाहन कशा स्थितीत आहे, याची माहिती शाळा प्रशासन ठेवत नाही. पालकांमध्येही नियमावलीबाबत विशेष जागृती नसल्याने अनधिकृत वाहतूक करणाऱ्या मंडळींचे फावते आहे.