शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर

By admin | Updated: July 1, 2017 00:39 IST

जालना : शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा, बस व अन्य वाहनांमधून वाहतूक करताना राज्य शासनाने विशिष्ट नियमावली तयार केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा, बस व अन्य वाहनांमधून वाहतूक करताना राज्य शासनाने विशिष्ट नियमावली तयार केली आहे. मात्र, जालना शहरासह जिल्ह्यात हे नियम धाब्यावर बसवून, विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे यातील अनेक वाहने भंगार झाली असून नियमित तपासणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र लोकमतने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघाताच्या घटनांनंतर २०११ मध्ये विद्यार्थी वाहतुकीचे स्वतंत्र धोरण राज्यशासनाने तयार केले. त्यानुसार विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन पंधरा वर्षांपेक्षा जुने नसावे मात्र, हाच नियम डावलून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीतून बाद झालेल्या जुन्या वाहनांना रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यात दोनशे पिवळ्या बसेस व शेकडो रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. शालेय बस नियमावलीमध्ये बससह नवी ओमनी व इको या व्हॅन, टाटा मॅजिक या वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अनेकांकडून गैरफायदा घेतला जात असून ग्रामीण भागात अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेण्यासाठी संबंधित शाळेशी वाहतूकदाराला करार करावा लागतो. मात्र, अनेक शाळा याबाबत उत्सुक नसल्याने विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक वाढली आहे. आरटीओकडून वेळोवेळी शालेय विद्यार्थी वाहतुकीची तपासणी करणे गरजेचे असतानाही जालन्यात हे काम केवळ कागदोपत्रीच सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जुनाट, धूर ओकणाऱ्या रिक्षांमधून १० ते १५ विद्यार्थी कोंडल्याप्रमाणे बसविण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग दरम्यान दिसून आले. काही शाळांची वाहतूक व्यवस्था नियमानुसार आहे. मात्र, विद्यार्थी शाळेच्या आवारात आल्यानंतरच शाळा त्याची जबाबदारी घेईल, अशी भूमिका असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणारे वाहन कशा स्थितीत आहे, याची माहिती शाळा प्रशासन ठेवत नाही. पालकांमध्येही नियमावलीबाबत विशेष जागृती नसल्याने अनधिकृत वाहतूक करणाऱ्या मंडळींचे फावते आहे.