शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर

By admin | Updated: July 1, 2017 00:39 IST

जालना : शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा, बस व अन्य वाहनांमधून वाहतूक करताना राज्य शासनाने विशिष्ट नियमावली तयार केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा, बस व अन्य वाहनांमधून वाहतूक करताना राज्य शासनाने विशिष्ट नियमावली तयार केली आहे. मात्र, जालना शहरासह जिल्ह्यात हे नियम धाब्यावर बसवून, विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे यातील अनेक वाहने भंगार झाली असून नियमित तपासणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र लोकमतने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघाताच्या घटनांनंतर २०११ मध्ये विद्यार्थी वाहतुकीचे स्वतंत्र धोरण राज्यशासनाने तयार केले. त्यानुसार विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन पंधरा वर्षांपेक्षा जुने नसावे मात्र, हाच नियम डावलून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीतून बाद झालेल्या जुन्या वाहनांना रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यात दोनशे पिवळ्या बसेस व शेकडो रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. शालेय बस नियमावलीमध्ये बससह नवी ओमनी व इको या व्हॅन, टाटा मॅजिक या वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अनेकांकडून गैरफायदा घेतला जात असून ग्रामीण भागात अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेण्यासाठी संबंधित शाळेशी वाहतूकदाराला करार करावा लागतो. मात्र, अनेक शाळा याबाबत उत्सुक नसल्याने विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक वाढली आहे. आरटीओकडून वेळोवेळी शालेय विद्यार्थी वाहतुकीची तपासणी करणे गरजेचे असतानाही जालन्यात हे काम केवळ कागदोपत्रीच सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जुनाट, धूर ओकणाऱ्या रिक्षांमधून १० ते १५ विद्यार्थी कोंडल्याप्रमाणे बसविण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग दरम्यान दिसून आले. काही शाळांची वाहतूक व्यवस्था नियमानुसार आहे. मात्र, विद्यार्थी शाळेच्या आवारात आल्यानंतरच शाळा त्याची जबाबदारी घेईल, अशी भूमिका असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणारे वाहन कशा स्थितीत आहे, याची माहिती शाळा प्रशासन ठेवत नाही. पालकांमध्येही नियमावलीबाबत विशेष जागृती नसल्याने अनधिकृत वाहतूक करणाऱ्या मंडळींचे फावते आहे.