शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वैयक्तिक हितासाठी विरोध केल्यास कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:57 IST

सर्वोच्च न्यायालयाने शहरातील कचरा प्रश्नावर शासन नियुक्त समितीला निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. या समितीने चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर केंद्रीय कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, ज्या नागरिकांचा याला विरोध असेल त्यांच्यासोबत सामंजस्याने चर्चा करण्यात येईल. वैयक्तिक हितासाठी कोणी विरोध करीत असेल, तर त्यावर अवमान याचिकेद्वारे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने शहरातील कचरा प्रश्नावर शासन नियुक्त समितीला निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. या समितीने चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर केंद्रीय कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, ज्या नागरिकांचा याला विरोध असेल त्यांच्यासोबत सामंजस्याने चर्चा करण्यात येईल. वैयक्तिक हितासाठी कोणी विरोध करीत असेल, तर त्यावर अवमान याचिकेद्वारे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.सोमवारी सकाळी आयुक्तांनी वेळात वेळ काढून महापालिकेत कचरा प्रश्नावर सर्व विभाग प्रमुख, वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील कचरा प्रश्नाचा झोननिहाय आढावा घेतला.झोन १ ते ९ पर्यंतच्या सर्व वॉर्ड अधिका-यांनी आमच्याकडे ७० ते ८० टक्के कच-याचे वर्गीकरण होत असल्याचा दावा त्यांनी केला. ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असून, पूर्वीच्या तुलनेत प्रक्रिया केंद्र वाढविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.यानंतर प्रभारी आयुक्त राम यांनी सांगितले की, महाराष्टÑ प्ररूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयात अ‍ॅक्शन प्लॅन सादर केला आहे. यानुसारच पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. चिकलठाणा येथील नियोजित जागेच्या आसपास वसाहत नाही, पाण्याचे जलस्रोत नाहीत. त्यामुळे येथे विरोध होण्याचे फारसे कारणही नाही. वैयक्तिक हितासाठी कोणी विरोध केल्यास खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. चिकलठाणा येथे १०० टक्के कचºयावर प्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले. नागरिकांसोबत चर्चा करून त्यांचे समाधान करण्यात येणार असल्याचे राम यांनी शेवटी नमूद केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNavalkishor Ramनवलकिशोर राम