शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

कर्मचारी आजपासून संपावर

By admin | Updated: June 2, 2014 01:10 IST

परभणी : पाणीपुरवठा विभागातील कामगारांचे थकित वेतन व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी २ जूनपासून बेमुदत संपावर जाणार होते.

परभणी : पाणीपुरवठा विभागातील कामगारांचे थकित वेतन व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी २ जूनपासून बेमुदत संपावर जाणार होते. त्या संदर्भात मनपा आयुक्त यांनी कर्मचार्‍यांची बैठक बोलावून संप मागे घेण्यासाठी चर्चा केली. मात्र चर्चा फिस्कटल्याने २ जूनपासून पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. परभणी शहर महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना २९ मे रोजी एक महिन्याचा पगार देण्यात आला आहे. पालिकेचे उत्पन्न अत्यंत तोकडे आहे. एलबीटी वसुली कमी आहे. महापालिकेचे उत्पन्न व अस्थापनेचा खर्च पाहता पालिकेतील कर्मचार्‍यांच्या पगारी वेळेत करणे अशक्य झाल्यामुळे वसुलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी व पालिकेच्या गाळ्यापासून उत्पन्न वाढविण्याचा प्रशासनाने प्रयत्न करीत आहे. परंतु, म्हणावे तसे यश मिळत नसल्याने मनपा पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांचे मागील सहा महिन्यांचा पगार झाला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली २ जूनपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा मनपा आयुक्त यांना दिला होता. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त अभय महाजन, उपायुक्त दीपक पुजारी, पाणीपुरवठा अधिकारी किशोर संद्रे, लालबावटाचे कॉ. राजन क्षीरसागर यांच्यासह मनपा कर्मचार्‍यांची बैठक १ जून रोजी घेण्यात आली. मनपा आयुक्त अभय महाजन म्हणाले, शासनाकडून थकित अनुदान वर्ग होताच कर्मचार्‍यांचे वेतन तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्या रेटून धरल्या. त्यामुळे चर्चा फिस्कटली. २ जूनपासून मनपा पाणीपुरवठा कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करणार आहेत. यामुळे नागरिकांना गैैरसोयीस सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)मनपा संघटनेसोबत मनपा आयुक्त अभय महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मागण्या सोडविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागेल, असे सांगितले. परंतु, मनपा कर्मचार्‍यांनी टोकाची भूमिका घेत संप पुकारला आहे. त्यामुळे संघटनेने नागरिकास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालिकेच्या वतीने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अभय महाजन यांनी केले आहे.सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. तसे नागरिकांना पाण्याची आवश्यकता वाढली आहे. त्यातच कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे परभणीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. मनपाकडून अगोदर १०-१२ दिवसांना पाणी मिळत आहे. त्यातच पाणीपुरठवा विभागातील कर्मचारी संपावर गेल्यास पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.