शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बापाकडून जगण्याचे बळ; तर विद्यापीठातील बापमाणसांनी लेखनाला पाठबळ दिले: इंद्रजीत भालेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:33 IST

प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्याकडून विद्यापीठातील आठवणींना उजाळा

छत्रपती संभाजीनगर : माईचा पदर धरून लहानाचा मोठा होत असताना माझ्या शेतकरी बापाने जगण्याचे बळ दिले तर विद्यापीठात मराठी विभागातील बापमाणसांनी लेखनाला पाठबळ दिले. त्यामुळे माझ्यासारखा गावखेड्यातला माणूस अगदी महानगरातही लोकप्रिय कवी होऊ शकला, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समाराेप बुधवारी झाला. प्रा. वा. ल. कुलकर्णी व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना प्रा. भालेराव यांनी 'विद्यापीठातील भारलेले दिवस' या विषयावर युवकांशी संवाद साधला. यावेळी विभागप्रमुख कवी डॉ. दासू वैद्य, विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभूरे यांची उपस्थिती होती.

प्रा. भालेराव म्हणाले, प्रा. वा. ल. कुळकर्णी यांनी मराठी विभागाला वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी समीक्षक आणि साहित्यिकांची एक वेगळी फळी निर्माण केली आणि माणसं घडवली. जी आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठ्या पदावर काम करत आहेत. खरंतर विभागात इतके ज्ञानी प्राध्यापक होते की, त्यांच्या शिकवण्यामुळे आम्ही मनसोक्त जगायला शिकलो. आजही येथे पुन्हा पुन्हा यावे वाटते, कारण इथेच पहिली कविता लिहिली आणि इथेच माणसं वाचायला शिकलो. मराठी विभागात नामवंत प्राध्यापक होते. त्यात प्रा. वा. ल. कुलकर्णी, डॉ. यु. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. एस. एस. भोसले, डॉ. प्रभाकर भांडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा समावेश होता. प्रास्ताविक डॉ. दासू वैद्य यांनी केले. संचालन हनुमान गिरी यांनी केले. आभार राजश्री काळे यांनी मानले.

विद्यापीठात जगणे शिकलोविद्यापीठाचा परिसर म्हणजे आपले घर आहे. इथली प्रत्येक गोष्ट हृदयात साठवून ठेवत आम्ही जगत आहोत. ही शिदोरी आजही पुरत आहे. मराठी विभागातील प्राध्यापकांच्या शिकविण्यामुळे आम्ही जगणे शिकलो आणि सहवासामुळे हसणे देखील शिकलो, असेही प्रा. इंद्रजित भालेराव यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणmarathiमराठीliteratureसाहित्य