शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अजब कारभार ! शासकीय बालगृह ५ वर्षांपासून बंद; इमारतीचे भाडे मात्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 18:37 IST

हडको एन १२ येथे एका खासगी व्यक्तीच्या मालकीची इमारत भाडेतत्त्वावर घेऊन तेथे शासकीय बालगृह सुरू करण्यात आले होते.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे शासनाचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. किरायाच्या इमारतीत कार्यरत शासकीय बालगृह पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आले असताना ज्या इमारतीत बालगृह सुरू होते, ती इमारत रिकामी न केल्याने इमारतीचे भाडे सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या या अजब कारभारामुळे शासनाला सुमारे २५ लाख रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

हडको एन १२ येथे एका खासगी व्यक्तीच्या मालकीची इमारत भाडेतत्त्वावर घेऊन तेथे शासकीय बालगृह सुरू करण्यात आले होते. शासनाच्या एका समितीने अचानक या बालगृहाला भेट देऊन तपासणी केल्यानंतर ते बंद करण्याचे निर्देश दिले होते. २०१६-१७ साली ते बंद करण्यात आले. त्याचवेळी इमारत मालकासोबत करण्यात आलेला करारनामा संपुष्टात आणून फर्निचर व साहित्य हलविणे आवश्यक होते. इमारतीचा सुमारे चार लाख रुपयाचा किराया शासनाकडे थकला होता. अधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे निधी नसल्याचे कारण देऊन त्यावेळी थकीत भाडे देण्यात आले नाही. इमारत मालकाने भाडे देत नाही, तोपर्यंत बालगृहातील फर्निचर व इतर साहित्य हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. २०१६-१७ पासून आजपर्यंत ही इमारत समाजकल्याण विभागाच्या ताब्यात आहे. इमारत मालकाने ३१ मार्च २०२१ पर्यंतचे भाड्याचे २५ लाख रुपये अदा करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे तगादा सुरू केला. बालगृह बंद केलेले असताना भाड्याचा भुर्दंड शासनाला सोसावा लागू शकतो.

बालगृहातील साहित्य भंगारात विकण्याचे निर्देशजिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवराज केंद्रे यांनी बालगृहाच्या अधीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार सुरेश गरड यांना पत्र पाठवून बालगृहातील भंगार साहित्य, फर्निचरचा लिलाव करून अहवाल सादर करण्याचे सांगितले. मात्र ही प्रक्रिया राबविण्यात आली नाही.

शासनाला ही बाब वेळोवेळी कळविली या इमारतीचा भाडेकरार एप्रिल २०२१ मध्ये संपला. यामुळे आम्ही इमारत मालक यांना पत्र देऊन इमारत रिकामी करू द्या, शासनाकडून किरायाचे अनुदान आल्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम देऊ, असे कळविले. शिवाय पाच वर्षांपासून शासनाने भाड्यासाठी अनुदान न दिल्याने किराया देता आला नाही. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शासनाला ही बाब वेळोवेळी कळविली आहे.- शिवराज केंद्रे, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

शासकीय बालगृहाच्या भाड्याचा विषय न्यायप्रविष्टशासकीय बालगृह बंद असले, तरी त्या ठिकाणचे जमीन मालक जुने घरभाडे दिल्याशिवाय जागा रिक्त करू नका, अशा आशयाचे निवेदन करतात. त्यांनी यासंदर्भात दावा दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जिल्हा परिषद यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करत आहे.- नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसाState Governmentराज्य सरकार