शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

अजब कारभार ! शासकीय बालगृह ५ वर्षांपासून बंद; इमारतीचे भाडे मात्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 18:37 IST

हडको एन १२ येथे एका खासगी व्यक्तीच्या मालकीची इमारत भाडेतत्त्वावर घेऊन तेथे शासकीय बालगृह सुरू करण्यात आले होते.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे शासनाचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. किरायाच्या इमारतीत कार्यरत शासकीय बालगृह पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आले असताना ज्या इमारतीत बालगृह सुरू होते, ती इमारत रिकामी न केल्याने इमारतीचे भाडे सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या या अजब कारभारामुळे शासनाला सुमारे २५ लाख रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

हडको एन १२ येथे एका खासगी व्यक्तीच्या मालकीची इमारत भाडेतत्त्वावर घेऊन तेथे शासकीय बालगृह सुरू करण्यात आले होते. शासनाच्या एका समितीने अचानक या बालगृहाला भेट देऊन तपासणी केल्यानंतर ते बंद करण्याचे निर्देश दिले होते. २०१६-१७ साली ते बंद करण्यात आले. त्याचवेळी इमारत मालकासोबत करण्यात आलेला करारनामा संपुष्टात आणून फर्निचर व साहित्य हलविणे आवश्यक होते. इमारतीचा सुमारे चार लाख रुपयाचा किराया शासनाकडे थकला होता. अधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे निधी नसल्याचे कारण देऊन त्यावेळी थकीत भाडे देण्यात आले नाही. इमारत मालकाने भाडे देत नाही, तोपर्यंत बालगृहातील फर्निचर व इतर साहित्य हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. २०१६-१७ पासून आजपर्यंत ही इमारत समाजकल्याण विभागाच्या ताब्यात आहे. इमारत मालकाने ३१ मार्च २०२१ पर्यंतचे भाड्याचे २५ लाख रुपये अदा करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे तगादा सुरू केला. बालगृह बंद केलेले असताना भाड्याचा भुर्दंड शासनाला सोसावा लागू शकतो.

बालगृहातील साहित्य भंगारात विकण्याचे निर्देशजिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवराज केंद्रे यांनी बालगृहाच्या अधीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार सुरेश गरड यांना पत्र पाठवून बालगृहातील भंगार साहित्य, फर्निचरचा लिलाव करून अहवाल सादर करण्याचे सांगितले. मात्र ही प्रक्रिया राबविण्यात आली नाही.

शासनाला ही बाब वेळोवेळी कळविली या इमारतीचा भाडेकरार एप्रिल २०२१ मध्ये संपला. यामुळे आम्ही इमारत मालक यांना पत्र देऊन इमारत रिकामी करू द्या, शासनाकडून किरायाचे अनुदान आल्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम देऊ, असे कळविले. शिवाय पाच वर्षांपासून शासनाने भाड्यासाठी अनुदान न दिल्याने किराया देता आला नाही. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शासनाला ही बाब वेळोवेळी कळविली आहे.- शिवराज केंद्रे, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

शासकीय बालगृहाच्या भाड्याचा विषय न्यायप्रविष्टशासकीय बालगृह बंद असले, तरी त्या ठिकाणचे जमीन मालक जुने घरभाडे दिल्याशिवाय जागा रिक्त करू नका, अशा आशयाचे निवेदन करतात. त्यांनी यासंदर्भात दावा दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जिल्हा परिषद यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करत आहे.- नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसाState Governmentराज्य सरकार