शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला

By बापू सोळुंके | Updated: November 25, 2022 20:15 IST

पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.

औरंगबााद: जिल्ह्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल अथवा नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी विभागीय कृषी सहसंचालकांसमोरच शेतकरी म्हणून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला मिळाला. 

जिल्ह्यातील  ७लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. दरम्यान संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची मोठी हानी झाली. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळीही साजरी करता आली नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांपैकी  केवळ १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांनाच कंपनीने विमा मंजूर केला आहे. उर्वरित सुमारे पावणे पाच लाख शेतकरी पीक विमा मिळेल अथवा नाही,  तसेच कधी मिळेल  याबाबत सांशकता आहे. 

विमा कंपनीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही,  कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांना  समर्पक  उत्तरे मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी  विरोधी पक्षनेते दानवे यांना प्राप्त झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर दानवे यांनी शुक्रवारी सकाळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली.  जालनाचे कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे,  कृषी उप संचालक दत्तात्रय दिवटे, उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी तेथून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून ते टेंभापुरी येथील शेतकरी बोलत असल्याचे सांगितले.त्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असून विमा कंपनीने अद्याप पंचनामा केला नाही,  यामुळे आम्हाला विमा कधी मिळेल असा सवाल त्यांनी केला. असता टोल फ्री क्रमांकावरून त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. 

साडेसात लाख पीक विमाधारक शेतकरी, कर्मचारी केवळ २८जिल्ह्यात विमा कंपनीचे २८ कर्मचारी कार्यरत आहेत. ७४ मंडळातील सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांपर्यंत हे कर्मचारी कधी पोहचतील असा सवाल त्यांनी केला. विमा कंपनीचे हे कर्मचारी कृषी पदवीधर अथवा पदविकाधारक असणे गरजेचे आहे. यातील किती कर्मचारी प्रशिक्षित आहेत  असा सवाल त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादCrop Insuranceपीक विमा