शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला

By बापू सोळुंके | Updated: November 25, 2022 20:15 IST

पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.

औरंगबााद: जिल्ह्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल अथवा नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी विभागीय कृषी सहसंचालकांसमोरच शेतकरी म्हणून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला मिळाला. 

जिल्ह्यातील  ७लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. दरम्यान संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची मोठी हानी झाली. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळीही साजरी करता आली नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांपैकी  केवळ १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांनाच कंपनीने विमा मंजूर केला आहे. उर्वरित सुमारे पावणे पाच लाख शेतकरी पीक विमा मिळेल अथवा नाही,  तसेच कधी मिळेल  याबाबत सांशकता आहे. 

विमा कंपनीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही,  कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांना  समर्पक  उत्तरे मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी  विरोधी पक्षनेते दानवे यांना प्राप्त झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर दानवे यांनी शुक्रवारी सकाळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली.  जालनाचे कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे,  कृषी उप संचालक दत्तात्रय दिवटे, उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी तेथून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून ते टेंभापुरी येथील शेतकरी बोलत असल्याचे सांगितले.त्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असून विमा कंपनीने अद्याप पंचनामा केला नाही,  यामुळे आम्हाला विमा कधी मिळेल असा सवाल त्यांनी केला. असता टोल फ्री क्रमांकावरून त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. 

साडेसात लाख पीक विमाधारक शेतकरी, कर्मचारी केवळ २८जिल्ह्यात विमा कंपनीचे २८ कर्मचारी कार्यरत आहेत. ७४ मंडळातील सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांपर्यंत हे कर्मचारी कधी पोहचतील असा सवाल त्यांनी केला. विमा कंपनीचे हे कर्मचारी कृषी पदवीधर अथवा पदविकाधारक असणे गरजेचे आहे. यातील किती कर्मचारी प्रशिक्षित आहेत  असा सवाल त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादCrop Insuranceपीक विमा