शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला

By बापू सोळुंके | Updated: November 25, 2022 20:15 IST

पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.

औरंगबााद: जिल्ह्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल अथवा नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी विभागीय कृषी सहसंचालकांसमोरच शेतकरी म्हणून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला मिळाला. 

जिल्ह्यातील  ७लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. दरम्यान संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची मोठी हानी झाली. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळीही साजरी करता आली नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांपैकी  केवळ १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांनाच कंपनीने विमा मंजूर केला आहे. उर्वरित सुमारे पावणे पाच लाख शेतकरी पीक विमा मिळेल अथवा नाही,  तसेच कधी मिळेल  याबाबत सांशकता आहे. 

विमा कंपनीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही,  कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांना  समर्पक  उत्तरे मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी  विरोधी पक्षनेते दानवे यांना प्राप्त झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर दानवे यांनी शुक्रवारी सकाळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली.  जालनाचे कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे,  कृषी उप संचालक दत्तात्रय दिवटे, उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी तेथून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून ते टेंभापुरी येथील शेतकरी बोलत असल्याचे सांगितले.त्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असून विमा कंपनीने अद्याप पंचनामा केला नाही,  यामुळे आम्हाला विमा कधी मिळेल असा सवाल त्यांनी केला. असता टोल फ्री क्रमांकावरून त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. 

साडेसात लाख पीक विमाधारक शेतकरी, कर्मचारी केवळ २८जिल्ह्यात विमा कंपनीचे २८ कर्मचारी कार्यरत आहेत. ७४ मंडळातील सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांपर्यंत हे कर्मचारी कधी पोहचतील असा सवाल त्यांनी केला. विमा कंपनीचे हे कर्मचारी कृषी पदवीधर अथवा पदविकाधारक असणे गरजेचे आहे. यातील किती कर्मचारी प्रशिक्षित आहेत  असा सवाल त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादCrop Insuranceपीक विमा