शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:19 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात कमी भाव पुकारल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडून नागपूर- मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात कमी भाव पुकारल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडून नागपूर- मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गोंधळ उडाल्याने वैजापूर पोलिसांच्या मध्यस्थीने पाच तासानंतर लिलाव पूर्ववत झाले.दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने वैजापूर बाजार समितीच्या आवारात कांद्याची प्रचंड आवक येत असून बाजार समितीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.मंगळवारी कांद्याला कमीत कमी ३००, सरासरी ७०० तर जास्तीत जास्त ८५० रुपये क्विंटल भाव पुकारल्याने संतप्त शेतकºयांनी सकाळी अकरा वाजता लिलाव बंद पाडून थेट रास्ता रोको आंदोलन केल्याने महामार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, पोलीस नाईक संजय घुगे यांनी शेतकºयांची समजूत काढून त्यांना बाजार समितीच्या आवारात नेले. बाजार समितीचे सचिव विजय सिनगर, संचालक सुरेश तांबे यांनी बाजार आवारात जाऊन रियाज अकील शेख, शकील शेख, आजम सौदागर व इतर व्यापाºयांशू चर्चा करुन दुपारी साडेतीन नंतर लिलाव सुरु केले. पाच तासाच्या गोंधळानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाले. यावेळी कांद्याला २०० ते ३०० रुपये क्विंटलमागे वाढीव भाव मिळाला.होळी सणामुळे आठ दिवस मार्केट बंद राहणार असून त्यामुळे भाव पडण्याची भीती व उन्हाच्या चटक्यामुळे चाळीतील कांदे सडण्याची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये एकाच दिवशी नवीन हळव्या कांद्याची तब्बल ३०० ते ३५० ट्रक आवक झाली. यामुळे व्यापाºयांनी कांद्याचे दर पाडले.३०० ते ३५० वाहनांची आवकगेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी होती. त्यात नवीन कांद्याचा नवीन हंगाम सुरू झाला नसल्याने व जुन्या कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. यामुळे चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी कच्चा कांदाच मोठ्या प्रमाणात बाजारात आणला आहे. यामुळे मंगळवारी खुल्या कांद्याची तब्बल ३०० ते ३५० वाहनात उच्चांकी आवक झाली. आवक वाढल्याने व कांदा कच्चा असल्याने दर कमी झाले, असे सचिव विजय सिनगर यांनी सांगितले.नवीन कांद्याची आवक वाढलीच्गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यंदा तालुक्यात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या दिवसात कांदा लवकर खराब होतो व मोड येतात. त्यामुळे येथील शेतकरी कांदा साठविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यात कांद्याला सध्या चांगले दर मिळत असल्याने या परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात नवीन कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला वजनदेखील चांगले असते, यामुळे कांद्याची आवक वाढून दर कमी झाले.