शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:19 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात कमी भाव पुकारल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडून नागपूर- मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात कमी भाव पुकारल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडून नागपूर- मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गोंधळ उडाल्याने वैजापूर पोलिसांच्या मध्यस्थीने पाच तासानंतर लिलाव पूर्ववत झाले.दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने वैजापूर बाजार समितीच्या आवारात कांद्याची प्रचंड आवक येत असून बाजार समितीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.मंगळवारी कांद्याला कमीत कमी ३००, सरासरी ७०० तर जास्तीत जास्त ८५० रुपये क्विंटल भाव पुकारल्याने संतप्त शेतकºयांनी सकाळी अकरा वाजता लिलाव बंद पाडून थेट रास्ता रोको आंदोलन केल्याने महामार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, पोलीस नाईक संजय घुगे यांनी शेतकºयांची समजूत काढून त्यांना बाजार समितीच्या आवारात नेले. बाजार समितीचे सचिव विजय सिनगर, संचालक सुरेश तांबे यांनी बाजार आवारात जाऊन रियाज अकील शेख, शकील शेख, आजम सौदागर व इतर व्यापाºयांशू चर्चा करुन दुपारी साडेतीन नंतर लिलाव सुरु केले. पाच तासाच्या गोंधळानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाले. यावेळी कांद्याला २०० ते ३०० रुपये क्विंटलमागे वाढीव भाव मिळाला.होळी सणामुळे आठ दिवस मार्केट बंद राहणार असून त्यामुळे भाव पडण्याची भीती व उन्हाच्या चटक्यामुळे चाळीतील कांदे सडण्याची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये एकाच दिवशी नवीन हळव्या कांद्याची तब्बल ३०० ते ३५० ट्रक आवक झाली. यामुळे व्यापाºयांनी कांद्याचे दर पाडले.३०० ते ३५० वाहनांची आवकगेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी होती. त्यात नवीन कांद्याचा नवीन हंगाम सुरू झाला नसल्याने व जुन्या कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. यामुळे चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी कच्चा कांदाच मोठ्या प्रमाणात बाजारात आणला आहे. यामुळे मंगळवारी खुल्या कांद्याची तब्बल ३०० ते ३५० वाहनात उच्चांकी आवक झाली. आवक वाढल्याने व कांदा कच्चा असल्याने दर कमी झाले, असे सचिव विजय सिनगर यांनी सांगितले.नवीन कांद्याची आवक वाढलीच्गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यंदा तालुक्यात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या दिवसात कांदा लवकर खराब होतो व मोड येतात. त्यामुळे येथील शेतकरी कांदा साठविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यात कांद्याला सध्या चांगले दर मिळत असल्याने या परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात नवीन कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला वजनदेखील चांगले असते, यामुळे कांद्याची आवक वाढून दर कमी झाले.