शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

फारोळा केंद्रातून ग्रामीण भागातील टँकरला पाणी देण्यास आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:18 IST

मनपाच्या फतव्याने ५४ गावांत पाणीबाणी : औरंगाबादचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे कारण

पैठण : औरंगाबाद महानगरपालिका व औद्योगिक विकास महामंडळाने औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरला भरणा केंद्रातून पाणीपुरवठा करण्यास आडकाठी आणल्याने ग्रामीण भागातील जनतेला यापुढे वेळेवर व पुरेसे पाणी मिळणे कठीण बनणार आहे. दरम्यान, जिल्हाभर पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.पैठण तालुक्यातील टँकरला फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केल्याने औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, अशी सबब पुढे करीत पैठण तालुक्यातील टँकरला फारोळा पॉइंटवरून पाणी देता येणार नाही, असा फतवा औरंगाबाद महानगरपालिकेने काढला आहे. महानगरपालिकेच्या या आदेशाने पैठण तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न बिकट बनला आहे.पंचायत समिती स्तरावर टँकरसाठी नवीन स्रोत शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना टँकरसाठी वाढीव पॉइंट उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.पैठण तालुका सध्या तीव्र पाणीटंचाईने होरपळत आहे. आज रोजी ११८ गावांतील ग्रामस्थांना १२० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने औरंगाबाद महानगरपालिकेच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्र व एमआयडीसीच्या मुधलवाडी पॉइंटवरून शंभर टँंकर भरून घेतले जातात.महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पंचायत समिती प्रशासनास लेखी पत्र दिले असून, या पत्रात म्हटले आहे की, फारोळा केंद्रातून टँकरला पाणी दिल्यामुळे औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने यापुढे मनपाच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण पॉइंटवरून पैठण तालुक्यातील टँकरला पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. टँकरच्या पाण्यासाठी नवीन उद्भव पंचायत समिती प्रशासनाने शोधावेत.फारोळा केंद्रातून भरतात ५१ टँकरपैठण तालुक्यातील ५४ गावांसाठी ५१ टँकर १०२ वेळा मनपाच्या फारोळा पॉइंटवरून भरली जातात. २०१४ पासून मनपाच्या फारोळा केंद्रातून टँकरसाठी पाणी दिले जाते. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार या टँकरसाठी १.५ दशलक्ष लिटर पाणी लागते. औरंगाबाद शहराची पाण्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या पंधरा लक्ष असून, या जनतेसाठी २४० दशलक्ष लिटर पाणी लागते. टँकरचे मध्येच पाणी उचलल्या जात असल्यामुळे औरंगाबाद शहराला फक्त १३० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असल्याने शहराला चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. याच कारणाने पैठण तालुक्यातील टँकरला पाणीपुरवठा करता येत नसल्याने बिडकीन पाणीपुरवठा योजनेतून टँकर भरण्यासाठी पॉइंट काढावा, अशा सूचना महानगरपालिकेने पैठण पंचायत समिती प्रशासनास दिल्या आहेत.औद्योगिक विकास महामंडळाचे आडमुठे धोरणऔद्योगिक विकास महामंडळाच्या वाळूज, शेंद्रा व पैठणच्या पॉइंटवरून वैजापूर, औरंगाबाद व पैठण तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला पाणीपुरवठा केला जातो. महामंडळाने या टँकरची जास्तीत जास्त अडवणूक कशी करता येईल, असेच धोरण राबविले आहे.जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता औद्योगिक वसाहत महामंडळाच्या टँकर भरणा पॉइंटवर चोवीस तास पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. मात्र, या भरणा केंद्रावर टँकरला केवळ पाच ते सहा तासच टँकर भरण्यास मुभा दिली जाते. यामुळे ग्रामीण भागात पुरेसे व वेळेवर पाणी पोहोचत नाही, असे दिसून आले आहे. दर शुक्रवारी दुरुस्तीच्या नावावर औद्योगिक वसाहतीत असलेले हे टँकर भरणा पॉइंट बंद ठेवले जातात. दुपारी १२ ते ३ या कालावधीत कंपन्यांना पाणीपुरवठा दिला जातो म्हणून टँकरला पाणी दिले जात नाही आणि सायंकाळी ७ वाजता टँकर भरणा बंद केला जातो. यामुळे पंचायत समिती प्रशासन औद्योगिक विकास महामंडळाच्या या आडमुठ्या धोरणामुळे जेरीस आले आहे.वैजापूर, फुलंब्री तालुक्यांनाही फटकावैजापूर तालुक्यातील धोंदलगाव, जळगाव, हडस पिंपळगाव, लासूरगाव, राहेगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाळूज एमआयडीसीतील साजापूर पॉइंटवरून पाणी भरणा करू दिले जात होते. मात्र, आता एमआयडीसीने नवीन आदेश काढले असून, साजापूर पॉइंटवरून टँकरने पाणी न घेता बीकेटी कंपनी पॉइंटवरून पाणी घ्यावे, असे सांगितले आहे. वास्तविक पाहता बीकेटी पॉइंट हा वैजापूर तालुक्यासाठी सोयीस्कर नसून, यामुळे अंतरात मोठी वाढ झाल्याने टँकरच्या पूर्ण खेपा होण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जनतेला पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे.फुलंब्री तालुक्यात ३९ गावांना ५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, सध्या हा पाणीपुरवठा विहीर अधिग्रहित करून करण्यात येत आहे. मात्र, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता या पाण्याचे स्रोत आटणार असल्याने नजीकच्या काळात फुलंब्री तालुक्यातील टँकरलासुद्धा एमआयडीसीच्या शेंद्रा पॉइंटवरून पाणी भरून घ्यावे लागणार आहे. औरंगाबाद जिल्हा प्रशासन, जि.प. प्रशासन व औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात परस्पर समन्वय असले तरच पाणीपुरवठा सुरळीत राहील.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक