शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

स्टरलाईट प्रकल्प रद्द होऊ शकतो मग नाणार का नाही : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 13:03 IST

तामिळनाडू राज्यातील स्टरलाईट प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द होऊ शकतो. तर मग लोकांचा विरोध असताना कोकणातील नाणार प्रकल्प रद्द का होऊ शकत नाही.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी नाणार परिसरातील गावांतील लोकांशी चर्चा करावी.त्यांचा विरोध कायम असेल तर हा प्रकल्प रद्द करावा

औरंगाबाद : तामिळनाडू राज्यातील स्टरलाईट प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द होऊ शकतो. तर मग लोकांचा विरोध असताना कोकणातील नाणार प्रकल्प रद्द का होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी नाणार परिसरातील गावांतील लोकांशी चर्चा करावी. त्यांचा विरोध कायम असेल तर हा प्रकल्प रद्द करावा, अशी भूमिका उद्योग व खणिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना मांडली. 

शहरात नवीन औद्योगिक धोरणांंबाबत चर्चा करण्यासाठी उद्योजकांचे चर्चासत्र शुक्रवारी सकाळी घेण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, तामिळनाडू राज्यातील स्टारलाईट प्रकल्पाला असाच स्थानिकांचा विरोध तीव्र झाला. तरीही सरकारने याची दखल घेतली नाही. प्रसंगी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. यात १४ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करत असल्याचे जाहीर केले.

( नाणार प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा करार )

कोकणातील नाणार परिसरातील असंख्य ग्रामपंचायतींनी या प्रकलपाला विरोध असल्याचे ठराव घेतले. या ठरावाच्या प्रती सरकारकडे पाठविलेल्या आहेत. तामिळनाडूसारखी परिस्थिती कोकणात निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी नाणार आणि परिसरातील गावांतील लोकांशी चर्चा करावी. त्यांचा विरोध असेल हा प्रकल्प रद्द करावा, अशीच आमचीही भूमिका असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. 

नाणार प्रकल्प रेटल्यास मी मंत्रिपद सोडेन - सुभाष देसाई )

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पState Governmentराज्य सरकारChief Ministerमुख्यमंत्री