शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी मार्गी लावावे : संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 17:43 IST

Sambhaji Raje on Maratha Reservation : पुन्हा मोर्चे काढून समाजाला वेठीस न धरता राजकारण्यांवर दबाव टाकून त्यांना वेठीस धरावे लागेल.

औरंगाबाद :  केंद्राने १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना हक्क्क दिले म्हणजे लगेच आरक्षण देता येत नाही. आता पुन्हा मराठा समाजास (Maratha Reservation ) सामाजिक मागास घटक हे सिद्ध करावे लागेल. तसेच ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणाचे प्रमाण जात असल्याने अपवादात्मक स्थितीसुद्धा नमूद करावी लागेल. हा कायदेशीर लढा आहे. मात्र, राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी करावे, असे आवाहन खासदार संभाजी राजे ( Sambhaji Raje ) यांनी औरंगाबाद येथे केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते औरंगाबाद येथे आले आहेत. खासदार संभाजी राजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. आता आपल्याला पुन्हा आरक्षण कसे मिळविता येईल, यासाठी समाजाला प्रयत्न करावा लागेल. ५८ मोर्चे काढून झाले. आता पुन्हा मोर्चे काढून समाजाला वेठीस न धरता राजकारण्यांवर दबाव टाकून त्यांना वेठीस धरावे लागेल. मराठा आरक्षणाचे अधिकार राज्यांना दिले असले तरी, ५० टक्क्यांची मर्यादा कशी ओलांडणार. दुर्गम भागातील समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती म्हणून आरक्षण देता येऊ शकते. येथे तर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला पुढारलेला म्हटले. अशा परिस्थितीत हा तिढा कसा सोडविणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नुसत्या घोषणा नको कृती हवीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत राज्यातील तीनही पक्षांमध्ये ताळमेळ नाही. यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाला १ हजार कोटी रुपये निधीची मागणी, तसेच २५ लाख रुपये कर्ज प्रस्ताव आणि २५ टक्क्यांऐवजी ५ टक्के भागभांडवल हे प्रश्न सध्या तरी प्रलंबित राहू शकतात. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, वसतिगृह सुरू झाले नाही. यामुळे घोषणा नको कृती करा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण