शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी मार्गी लावावे : संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 17:43 IST

Sambhaji Raje on Maratha Reservation : पुन्हा मोर्चे काढून समाजाला वेठीस न धरता राजकारण्यांवर दबाव टाकून त्यांना वेठीस धरावे लागेल.

औरंगाबाद :  केंद्राने १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना हक्क्क दिले म्हणजे लगेच आरक्षण देता येत नाही. आता पुन्हा मराठा समाजास (Maratha Reservation ) सामाजिक मागास घटक हे सिद्ध करावे लागेल. तसेच ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणाचे प्रमाण जात असल्याने अपवादात्मक स्थितीसुद्धा नमूद करावी लागेल. हा कायदेशीर लढा आहे. मात्र, राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी करावे, असे आवाहन खासदार संभाजी राजे ( Sambhaji Raje ) यांनी औरंगाबाद येथे केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते औरंगाबाद येथे आले आहेत. खासदार संभाजी राजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. आता आपल्याला पुन्हा आरक्षण कसे मिळविता येईल, यासाठी समाजाला प्रयत्न करावा लागेल. ५८ मोर्चे काढून झाले. आता पुन्हा मोर्चे काढून समाजाला वेठीस न धरता राजकारण्यांवर दबाव टाकून त्यांना वेठीस धरावे लागेल. मराठा आरक्षणाचे अधिकार राज्यांना दिले असले तरी, ५० टक्क्यांची मर्यादा कशी ओलांडणार. दुर्गम भागातील समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती म्हणून आरक्षण देता येऊ शकते. येथे तर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला पुढारलेला म्हटले. अशा परिस्थितीत हा तिढा कसा सोडविणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नुसत्या घोषणा नको कृती हवीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत राज्यातील तीनही पक्षांमध्ये ताळमेळ नाही. यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाला १ हजार कोटी रुपये निधीची मागणी, तसेच २५ लाख रुपये कर्ज प्रस्ताव आणि २५ टक्क्यांऐवजी ५ टक्के भागभांडवल हे प्रश्न सध्या तरी प्रलंबित राहू शकतात. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, वसतिगृह सुरू झाले नाही. यामुळे घोषणा नको कृती करा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण