शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्य शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 15:39 IST

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कन्नड ( औरंगाबाद ) : अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने तालुक्यातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले आहे. शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केली. ते सध्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कन्नड येथील भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.  

औरंगाबाद जिल्ह्याला महिनाभरात तीन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यामुळे शेती, पिके यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातची पिके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागाची पाहणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज सकाळी केला. यावेळी ते म्हणाले, आजही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. खरीप पूर्णपणे वाया गेले असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय  औताडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, संजय गव्हाणे , विजय औटे, तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे ,शहर अध्यक्ष सुरेश पाटील डोळस ,जि प सदस्य किशोर पवार,शिवप्रभु ज्ञाने रमेश नागरे ,अनुसूचित जाती चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, शिवाजी बोरसे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ निकाळजे ,भगवान ठाकरे, प्रदीप बोडखे,   गोपीनाथ वाघ भगवान कांदे आदी होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेती