शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा : अमित देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:37 IST

Aurnagabad Municiplity Election News महानगरपालिकेवर कॉग्रेसचा तिरंगा झेडा फडकविण्याचे आवाहन

ठळक मुद्दे देशात आणि महाराष्ट्रात येणारा काळ हा काँग्रेसचा मतदार यापुढे भाजपला संधी देतील, असे वाटत नाही

औरंगाबाद : मनपा निवडणुका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकलाच पाहिजे. यासाठी जिद्दीने कामाला लागा व स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले.

नूतनीकरण केल्यानंतर गांधी भवनात झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात ते बोलत होते. मनपा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनी हात वर करावा, असे सुचवत व वर केलेले हात मोजत ‘इथेच २०-३०’ जण इच्छुक दिसत आहेत’ अशी टिपणी त्यांनी केली. देशात आणि महाराष्ट्रात येणारा काळ हा काँग्रेसचा राहणार असून, मतदार यापुढे भाजपला संधी देतील, असे वाटत नसल्याचे नमूद करीत देशमुख यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी या देशात चांगले काम करू इच्छित आहेत, त्यांचे हात मजबूत करणे हे काँग्रेसचे कर्तव्य होय, अशी साद घातली. याचवेळी वेगवेगळ्या पक्ष संघटनांतील काही कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. हा धागा पकडून लातूरमधील एक किस्सा त्यांनी सांगितला व औरंगाबादमध्ये काँग्रेसमधून अमुक-अमुक यांचा  प्रवेश, असे होणार नाही, असा टोला मारताच उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. यात सहभाग सहभागी होण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.

पक्षनिरीक्षक खान व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पवन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.  गुलाब पटेल यांनी आभार मानले. आ. राजेश राठोड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, संजय लाखे पाटील, विलास औताडे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, नामदेव पवार, अहमद चाऊस, डॉ. जितेंद्र देहाडे, शहर महिला अध्यक्ष सरोज मसलगे पाटील, जिल्हाध्यक्षा सुरेखा पानकडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcongressकाँग्रेसAmit Deshmukhअमित देशमुख