शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ

By admin | Updated: March 26, 2016 00:57 IST

संजय जाधव , पैठण शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या गावातील मंदिरात असणाऱ्या पवित्र रांजणात शुक्रवारी (दि.२५) गोदावरीतून जल आणून भरण्यास सुरुवात करण्यात आली.

संजय जाधव , पैठणशांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या गावातील मंदिरात असणाऱ्या पवित्र रांजणात शुक्रवारी (दि.२५) गोदावरीतून जल आणून भरण्यास सुरुवात करण्यात आली. तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर या पवित्र रांजणाची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला .भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात पैठणनगरीत राहत सलग १२ वर्षे नाथ महाराजांच्या वाड्यातील या पवित्र रांजणात गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका आहे. हा रांजण भरण्यास प्रारंभ झाला म्हणजे नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ झाला असे मानले जाते. एकनाथ महाराज असे संत होते की भगवान श्रीकृष्णालादेखील नाथ महाराजांच्या घरी राहून नाथ महाराजांची सेवा करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. भगवंत ‘श्रीखंड्या’चे रूप धारण करून नाथांच्या घरी प्रकट झाले. नाथ महाराजांची भेट घेऊन सेवा करण्याचा मनोदय व्यक्त करीत ‘सांगाल ते, पडेल ते काम करीन, मला सेवा करू द्या,’ अशी विनंती केली व नाथ महाराजांची परवानगी मिळविली. नाथ महाराजांच्या घरी राहून भगवंत सर्व कामे करू लागले. सडा, भांडी, स्वयंपाक, उष्टावळी , गंध उगाळणे, स्नानाचे पाणी काढून देणे, गिरिजा आईला स्वयंपाकासाठी मदत करणे, नाथ महाराज कीर्तन करीत असताना धृपद म्हणणे, कीर्तनात नाचणे...असे नानाविध कामे करीत भगवंत नाथ महाराजांसोबत सावलीसारखे वावरू लागले.आवडीने कावडीने वाहिले पाणी।एकचि काय वदावे पडिल्या कार्यात वाहिले पाणी।।द्वारकेत तपश्चर्या.......भगवंताचे पैठणनगरीत पाणी भरण्याचे कार्य सुरू असताना द्वारकेत एका भक्ताने श्रीकृष्ण दर्शनासाठी खडतर तपश्चर्या सुरू केली होती. अखेर या भक्तास दृष्टांत झाला की भगवान श्रीकृष्ण हे नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात आहेत. त्या भक्तानेपैठणला येत नाथ महाराजांना याबाबत कल्पना दिली. हे समजताच प्रत्यक्ष भगवंताकडून सेवा करून घेतल्याचे नाथ महाराजांना फार वाईट वाटले. गिरिजा आईला रडू कोसळले.लागलीच श्रीखंड्याच्या रूपातील भगवंतांचा पैठणनगरीत शोध सुरू झाला; परंतु भगवंत कोठेच सापडेना. शेवटी नाथ महाराजांनी भगवंतांचा धावा करताना माझ्या हातून काय अपराध घडला म्हणून भगवंत आपण माझ्यावर रागावलात, अशा शब्दांत भगवंतांची विनवणी केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले व त्यांनी नाथ महाराज व द्वारकेच्या भक्तास दर्शन दिले. यावेळी नाथ महाराजांनी आपण पैठण सोडून जाऊ नये, अशी विनंती भगवंतांना केली. तेव्हा मी दरवर्षी येथे येईल असे सांगत भगवान श्रीकृष्ण तेथून निघून गेले.रांजणात भरले पाणीपैठण येथील गावातील नाथ मंदिरात पवित्र रांजण आहे. पूर्वी नाथ महाराज या मंदिरात राहत होते. नाथ महाराजांच्या या वाड्याचे रूपांतर आज मंदिरात करण्यात आले आहे. याच मंदिरात असलेल्या रांजणात भगवान श्रीकृष्णाने सलग १२ वर्षे गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरले.नाथवंशजांची गैरहजेरी खटकली आजच्या रांजण पूजेला नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी, सरदार महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी व इतर नाथवंशज गैरहजर होते. यामुळे भाविकांत मोठी चर्चा झाली. याबाबत नाथवंशज हरिपंडित महाराज गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता यंदाचे सालकरी रघुनाथबुआ पालखीवाले यांनी रांजणपूजेला या असे साधे बोलावणेसुद्धा पाठविले नाही, शिवाय प्रशासनाने आमच्यावर मोठा दबाव आणला असून आम्ही तणावाखाली असल्याने इच्छा असूनही आम्ही यंदा रांजणपूजेला मुकलो. आम्ही सर्व नाथ वंशजांनी मनोभावे रांजणपूजा केली असे गोसावी यांनी सांगितले.