शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ

By admin | Updated: March 26, 2016 00:57 IST

संजय जाधव , पैठण शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या गावातील मंदिरात असणाऱ्या पवित्र रांजणात शुक्रवारी (दि.२५) गोदावरीतून जल आणून भरण्यास सुरुवात करण्यात आली.

संजय जाधव , पैठणशांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या गावातील मंदिरात असणाऱ्या पवित्र रांजणात शुक्रवारी (दि.२५) गोदावरीतून जल आणून भरण्यास सुरुवात करण्यात आली. तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर या पवित्र रांजणाची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला .भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात पैठणनगरीत राहत सलग १२ वर्षे नाथ महाराजांच्या वाड्यातील या पवित्र रांजणात गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका आहे. हा रांजण भरण्यास प्रारंभ झाला म्हणजे नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ झाला असे मानले जाते. एकनाथ महाराज असे संत होते की भगवान श्रीकृष्णालादेखील नाथ महाराजांच्या घरी राहून नाथ महाराजांची सेवा करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. भगवंत ‘श्रीखंड्या’चे रूप धारण करून नाथांच्या घरी प्रकट झाले. नाथ महाराजांची भेट घेऊन सेवा करण्याचा मनोदय व्यक्त करीत ‘सांगाल ते, पडेल ते काम करीन, मला सेवा करू द्या,’ अशी विनंती केली व नाथ महाराजांची परवानगी मिळविली. नाथ महाराजांच्या घरी राहून भगवंत सर्व कामे करू लागले. सडा, भांडी, स्वयंपाक, उष्टावळी , गंध उगाळणे, स्नानाचे पाणी काढून देणे, गिरिजा आईला स्वयंपाकासाठी मदत करणे, नाथ महाराज कीर्तन करीत असताना धृपद म्हणणे, कीर्तनात नाचणे...असे नानाविध कामे करीत भगवंत नाथ महाराजांसोबत सावलीसारखे वावरू लागले.आवडीने कावडीने वाहिले पाणी।एकचि काय वदावे पडिल्या कार्यात वाहिले पाणी।।द्वारकेत तपश्चर्या.......भगवंताचे पैठणनगरीत पाणी भरण्याचे कार्य सुरू असताना द्वारकेत एका भक्ताने श्रीकृष्ण दर्शनासाठी खडतर तपश्चर्या सुरू केली होती. अखेर या भक्तास दृष्टांत झाला की भगवान श्रीकृष्ण हे नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात आहेत. त्या भक्तानेपैठणला येत नाथ महाराजांना याबाबत कल्पना दिली. हे समजताच प्रत्यक्ष भगवंताकडून सेवा करून घेतल्याचे नाथ महाराजांना फार वाईट वाटले. गिरिजा आईला रडू कोसळले.लागलीच श्रीखंड्याच्या रूपातील भगवंतांचा पैठणनगरीत शोध सुरू झाला; परंतु भगवंत कोठेच सापडेना. शेवटी नाथ महाराजांनी भगवंतांचा धावा करताना माझ्या हातून काय अपराध घडला म्हणून भगवंत आपण माझ्यावर रागावलात, अशा शब्दांत भगवंतांची विनवणी केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले व त्यांनी नाथ महाराज व द्वारकेच्या भक्तास दर्शन दिले. यावेळी नाथ महाराजांनी आपण पैठण सोडून जाऊ नये, अशी विनंती भगवंतांना केली. तेव्हा मी दरवर्षी येथे येईल असे सांगत भगवान श्रीकृष्ण तेथून निघून गेले.रांजणात भरले पाणीपैठण येथील गावातील नाथ मंदिरात पवित्र रांजण आहे. पूर्वी नाथ महाराज या मंदिरात राहत होते. नाथ महाराजांच्या या वाड्याचे रूपांतर आज मंदिरात करण्यात आले आहे. याच मंदिरात असलेल्या रांजणात भगवान श्रीकृष्णाने सलग १२ वर्षे गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरले.नाथवंशजांची गैरहजेरी खटकली आजच्या रांजण पूजेला नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी, सरदार महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी व इतर नाथवंशज गैरहजर होते. यामुळे भाविकांत मोठी चर्चा झाली. याबाबत नाथवंशज हरिपंडित महाराज गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता यंदाचे सालकरी रघुनाथबुआ पालखीवाले यांनी रांजणपूजेला या असे साधे बोलावणेसुद्धा पाठविले नाही, शिवाय प्रशासनाने आमच्यावर मोठा दबाव आणला असून आम्ही तणावाखाली असल्याने इच्छा असूनही आम्ही यंदा रांजणपूजेला मुकलो. आम्ही सर्व नाथ वंशजांनी मनोभावे रांजणपूजा केली असे गोसावी यांनी सांगितले.